शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

शिवसेनेच्या एकाच बाणात दोन शिकार; भाजपा सत्तेतून बाहेर, तर मनसेलाही बसला फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 20:45 IST

२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वबळावर लढले होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेना-भाजपची युती झाली.

कल्याण - राज्यातील सत्तासंघर्षात भाजपा-शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला. एकमेकांचे मित्रपक्ष असलेले दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावरुन भिडले आणि यांच्यात दुरावा निर्माण झाला. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं तर ५६ जागा जिंकून शिवसेनेनं राज्याचं मुख्यमंत्रिपद पटकावलं. मात्र राज्यातील सत्तानाट्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही होताना दिसत आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तेत असणारे शिवसेना-भाजपा यांच्यातील युती अखेर तुटली आहे. अनाधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजपात काही दिवसांपासून वाद विकोपाला गेला होता. भाजपाच्या माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी अनाधिकृत बांधकाम आणि प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यावरुन शिवसेना-भाजपा नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या वादाचा परिणाम इतका झाला की पालिकेतील शिवसेना-भाजपा युती संपुष्टात आली. मात्र याचा फटका मनसेला बसला. मनसेकडे असलेलं विरोधी पक्षनेते पद भाजपाकडे गेले. महापौर विनीता राणे यांनी राहुल दामले यांची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केली. 

२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वबळावर लढले होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेना-भाजपची युती झाली होती. त्यावेळी पाच वर्षांपैकी महापौरपद पहिले अडीच वर्षे शिवसेना, मधले दीड वर्षे भाजप तर, उर्वरित काळ पुन्हा शिवसेनेला दिले जाईल, असे ठरले होते. तसेच स्थायी समिती सभापतीपद भाजपला देण्याचा अलिखित करार झाला. मात्र, उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या समीकरणात केडीएमसीतील महापौरपद शिवसेनेने आपल्याकडे कायम ठेवले. दरम्यान, आता शेवटचे वर्षे भाजपला महापौरपद देण्याची वेळ आली असताना ते पद दिले नाही.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेला ५३, भाजपला ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे नगरसेवक निवडून आले. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाने युती करून सत्ता स्थापन केली. शिवसेनेला अपक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ ५७ आहे. मात्र राज्यातील सत्तास्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकीय गणित बदललं आहे.  

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसेBJPभाजपाShiv Senaशिवसेना