शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता, जिल्हा परिषद निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 3:25 AM

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे. भाजपाला १४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयाला आली आहेत.

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे. भाजपाला १४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयाला आली आहेत.मागील निवडणुकीवेळी ६६ जागा असलेल्या जिल्हा परिषदेत पालघर जिल्हा निर्मितीमुळे सदस्यसंख्या ५३ झाली आहे. या जिल्हा परिषदेसोबतच भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पंचायत समित्यांच्या एकूण १०६ जागांची निवडणूकही पार पडली. पाच पंचायत समित्यांपैकी फक्त मुरबाडची भाजपाच्या हाती पडली आहे. उरलेल्या भिवंडी, शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समित्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असेल.समृद्धी महामार्गासह ठाणे जिल्ह्यातून जाणाºया वेगवेगळ्या प्रकल्पांना ग्रामीण भागातून विरोध आहे. त्यातही शेतजमिनी देण्याविरोधात आंदोलनही झाले होते. त्यामुळे दीड वर्षाने होणाºया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचा कौल समजून घेण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळेच भाजपाने ती प्रतिष्ठेची केली. त्याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. त्यांना काँग्रेस, मनसे, कुणबी सेना, रिपब्लिकन पक्ष सेक्युलर यांनी साथ दिली. परिणामी, गावागावानुसार व गटा-गणानुसार लढतीचे स्वरूप बदलले. त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात हा प्रश्न होता. पण हे राजकीय समीकरण मतदारांनी स्वीकारल्याचे त्यांनी दिलेल्या कौलातून समोर आले.पक्षीय बलाबलठाणे जिल्हा परिषदएकूण जागा - ५३शिवसेना - २६राष्ट्रवादी - १०भाजपा - १४काँग्रेस - १ (बिनविरोध)अपक्ष - १एका जागेची मतमोजणी स्थगितपंचायतसमितीएकूण जागा - १०६शिवसेना - ४७राष्ट्रवादी - १६भाजपा - ३७काँग्रेस - २मनसे - १रिपब्लिकन पक्ष -१दोन गणांची मतमोजणी स्थगित

टॅग्स :thaneठाणे