शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजप- मनसेच्या टोलवादात सेनेची उडी; श्रेयवाद पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:11 IST

आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये यासाठी मनसेने मानवी साखळी आंदोलन केले होते.

ठाणे : ठाण्यातील टोलमुक्तीसाठी मागील काही दिवसांपासून भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगला होता. आता त्यात शिवसेनेने उडी घेतली असून ठाणे मुलुंड टोलनाक्यासह मीरा भार्इंदर दहिसर टोलनाका स्थानिक वाहनांसाठी मोफत करावा अशी लक्षवेधी हिवाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने श्रेयाचे राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये यासाठी मनसेने मानवी साखळी आंदोलन केले होते. दुसरीकडे भाजपचे ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांनी लवकरच एमएच ०४ च्या वाहनांना आनंदनगर टोलमुक्ती मिळेल, असे आश्वासन दिले होते. ते पाळले जात नसल्याने मनसेने दोन वेळा आंदोलन केले होते. ज्यावेळी २०१४ साली शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा त्या सरकारने टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले. त्यामुळे आता टोलमुक्तीसाठी श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.

पाच किमी परिघात टोलमुक्ती नाहीच

शिवसेनेचे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात थेट हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची तयारी केली आहे. मीरा भार्इंदर महापालिका येथील दहिसर व ठाणे महापालिका हद्दीतील मुलुंड टोलनाक्यावर अनेक वर्षापासून विविध पक्षांची आंदोलने झाली आहेत. या दोन्ही शहरातील वाहनांना टोलमधून सवलत द्यावी, यासाठी आम्हीही आंदोलने केली. परंतु, त्यावर निर्णय झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी टोलनाक्यांच्या निविदा प्रक्रिया करण्यात आल्या, त्यावेळी टोलनाक्यापासून पाच किमी परिसरातील रहिवाशांच्या वाहनांना या टोलमधून वगळण्याचा निर्णय झाला होता. निविदेतही तसे स्पष्ट करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असे सरनार्ईकांनी म्हटले आहे.

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपा