शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

भाजप- मनसेच्या टोलवादात सेनेची उडी; श्रेयवाद पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:11 IST

आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये यासाठी मनसेने मानवी साखळी आंदोलन केले होते.

ठाणे : ठाण्यातील टोलमुक्तीसाठी मागील काही दिवसांपासून भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगला होता. आता त्यात शिवसेनेने उडी घेतली असून ठाणे मुलुंड टोलनाक्यासह मीरा भार्इंदर दहिसर टोलनाका स्थानिक वाहनांसाठी मोफत करावा अशी लक्षवेधी हिवाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने श्रेयाचे राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये यासाठी मनसेने मानवी साखळी आंदोलन केले होते. दुसरीकडे भाजपचे ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांनी लवकरच एमएच ०४ च्या वाहनांना आनंदनगर टोलमुक्ती मिळेल, असे आश्वासन दिले होते. ते पाळले जात नसल्याने मनसेने दोन वेळा आंदोलन केले होते. ज्यावेळी २०१४ साली शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा त्या सरकारने टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले. त्यामुळे आता टोलमुक्तीसाठी श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.

पाच किमी परिघात टोलमुक्ती नाहीच

शिवसेनेचे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात थेट हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची तयारी केली आहे. मीरा भार्इंदर महापालिका येथील दहिसर व ठाणे महापालिका हद्दीतील मुलुंड टोलनाक्यावर अनेक वर्षापासून विविध पक्षांची आंदोलने झाली आहेत. या दोन्ही शहरातील वाहनांना टोलमधून सवलत द्यावी, यासाठी आम्हीही आंदोलने केली. परंतु, त्यावर निर्णय झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी टोलनाक्यांच्या निविदा प्रक्रिया करण्यात आल्या, त्यावेळी टोलनाक्यापासून पाच किमी परिसरातील रहिवाशांच्या वाहनांना या टोलमधून वगळण्याचा निर्णय झाला होता. निविदेतही तसे स्पष्ट करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असे सरनार्ईकांनी म्हटले आहे.

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपा