शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ठाणे जिल्ह्यातील शासकीय नोकरदारांची सर्वाधिक पसंती शिवसेनेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 23:12 IST

टपाली मतदानाचा निकाल । २१३ कर्मचाऱ्यांनी स्वीकारला ‘नोटा’चा पर्याय

पंकज रोडेकरठाणे : निवडणूक कामात व्यस्त राहणाºया शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील १८ विधानसभेच्या निवडणुकीत केलेल्या टपाली मतदानापैकी ५२ टक्के मते महायुतीला प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये शिवसेनेला भाजपपेक्षा दोन टक्के अधिक मतदान झाले आहे. एकूण झालेल्या ७ हजार २३६ टपाली मतदानांपैकी ३ हजार ७९९ मते महायुतीच्या पारड्यात गेली तर २१३ शासकीय कर्मचाºयांनी २१३ उमेदवारांना ‘नोटा’ करुन नाकारले आहे.

ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीत भाजप,शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, वंचित आघाडी या प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण २१३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यावेळी मतदात्यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपच्या आठ उमेदवारांना पुन्हा: एकदा विजयी केले. शिवसेना-५, राष्ट्रवादी -दोन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी आणि अपक्ष यांचे प्रत्येकी एक-एक उमेदवार निवडून दिले आहेत. निवडणुकीच्या कामाकाजाला जुंपलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभागामार्फत यावेळीही टपाली मतदान प्रक्रिया राबवली गेली. जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील शासकीय नोकरदार वर्गाने पहिली पसंती सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना दिली. पक्षनिहाय विचार केल्यास शिवसेनेच्या उमदेवारांना पहिली पसंती दिली आहे. त्यानंतर आघाडीला त्याच्या खालोखाल महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मतदान केले आहे.भिवंडी पश्चिमेत ‘नोटा’चा वापर नाहीशासकीय नोकरदारांपैकी २१३ जणांनी चक्क ‘नोटा’ला पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक ३६ जणांनी ‘नोटा’द्वारे ठाणे शहर मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नाकारले आहे. त्यापाठोपाठ कल्याण पश्चिम, मुंब्रा-कळवा आणि कल्याण पूर्व येथील उमेदवारांना नाकारले. तर, भिवंडी पश्चिम मतदारसंघात शासकीय नोकरदारांनी ‘नोटा’चा वापर केलेला नाही.ठाण्यात सर्वाधिक टपाली मतदान : जिल्ह्यात १८ मतदारसंघातून एकूण ७ हजार २३६ टपाली मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार ५८ टपाली मतदान हे ठाणे शहर मतदारसंघात झाले असून त्यापाठोपाठ कल्याण पश्चिम येथे ७९७ तर सर्वात कमी टपाली मतदान भिवंडी पश्चिम येथे ७३ इतके झाले आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे