शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शिवसेना-भाजपा पुन्हा समोरासमोर, रस्ते कामाला आधीच मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 04:07 IST

रस्त्याच्या श्रेयासाठी शिवसेना व सत्ताधारी भाजपा आघाडी आमने-सामने आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले.

उल्हासनगर : रस्त्याच्या श्रेयासाठी शिवसेना व सत्ताधारी भाजपा आघाडी आमने-सामने आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र भूमिपूजनाची कुणकूण लागताच शिवसेनेने दोन दिवसापूर्वी भूमिपूजन करून भाजपावर कुरघोडी केली. सरकारचा २० कोटीचा निधी व कामाला मंजुरी असताना महापालिकेने सहा महिने उशिराने रस्त्याचे काम का सुरू केले? अशी टीका शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे.उल्हासनगर महापालिका निवडणुकी दरम्यान तत्कालिन स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे यांनी चार रस्त्यासह इतर प्रस्तावांना मंजुरी दिली होती. महापालिका निवडणुकीनंतर मंजुरी दिलेल्या, व्हीटीसी ग्राऊंड ते मानेरे रस्ता, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन चौक, काजल पेट्रोलपंप ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक, जिजामाता ते उल्हासनगर स्थानक आदी चार रस्त्यांचे काम पावसाळयापूर्वी होणे गरजेचे होते. मात्र विकासकामात सत्ताधारी भाजपाने राजकारण आणून श्रेयासाठी जाणीवपूर्वक रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप चौधरी यांनी केला. भूमिपूजनाची कुणकूण शिवसेनेला लागताच त्यांनी दोन दिवसांपूर्वी भूमिपूजन उरकून घेतले.महापालिकेने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे याच रस्त्यांचे भूमिपूजन मंगळवारी राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, आयुक्त राजेंद्र निंबाळकर, अतिरीक्त आयुक्त विजया कंठे, उपायुक्त संतोष देहरकर, शहर अभियंता राम जैस्वाल यांच्या हस्ते झाले.निधी बँकेमध्ये पडूनशिवसेनेच्या प्रयत्नातून राज्य सरकारने ६ महिन्यांपूर्वी ४ मुख्य रस्त्यांसाठी २० कोटीचा निधी दिला. व्हीटीसी ते मानेरे रस्त्यासाठी साडेचार कोटी, काजल पट्रोलपंप ते विठ्ठलवाडी स्थानक रस्ता ५ कोटी, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन रस्त्यासाठी ६ कोटी तर जिजामाता ते स्थानक रस्त्यासाठी ५ कोटी असा एकूण २० कोटीचा निधी दिला आहे. मात्र निधीचा उपयोग वेळीच न केल्याने तो बँकेत पडून राहिला, अशी टीका शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना