शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सोशल मीडियावर शिवसेना-भाजप आमने-सामने; फाईल चोरी, अवैध बांधकामाचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 20:28 IST

Shivsena BJP : सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले की काय?. असा प्रश्न निर्माण झाला.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरात अनेक समस्या निर्माण झाले असताना दुसरीकडे सोशल मीडियावरशिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी विरुद्ध भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला. यामुळे एकच खळबळ उडाली. सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले की काय?. असा प्रश्न निर्माण झाला.

 उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता तर भाजपचे स्पष्ट बहुमत महापालिकेत असूनही ते पक्षातील ओमी टीम समर्थक बंडखोर नगरसेवकामुळे विरोधी बाकावर आहेत. महापालिका निवडणूक सहा ते सात महिन्यावर येऊन ठेपल्याने शहर विकासा बाबत भाजप-शिवसेना आमनेसामने उभे टाकल्याचे चित्र आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसा पासून शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यात अवैध बांधकामे, पालिकेतील फाईल चोरी आदी बाबत आरोप प्रत्यारोपचा सामना सोशल मीडियावर रंगला. दोघेही एकमेकाला आवाहन प्रतिआवाहन देत असल्याने, शहरात चालले तरी काय? असा प्रश्न नागरिकांना पडला. एकमेकांच्या आरोपा वरून शहरात अवैध बांधकामाला सुगीचे दिवस आल्याचे उघड होते. 

महापालिका अशा बांधकामावर पाडकाम कारवाई करीत नसल्याने, भूमाफिये, पालिका अधिकारी, स्थानिक नेते यांच्यात संगनमत तर नाही ना? असा संशय निर्माण झाला. शहरातील रस्त्याची दुरावस्था झाली असून दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. पाणी टंचाई, पालिकेतील विभागात सावळागोंधळ, साफसफाईचा बोजवारा, डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर. अवैध बांधकामे, आयुक्तांविरोधात उपोषण, अनधिकृत व धोकादायक इमारतीचा प्रश्न, उत्पन्नाचे स्रोतची मर्यादा आदी अनेक समस्याला शहर सामोरे जात आहे. असे असताना दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकाला आव्हान देण्याऐवजी शहरविकासात हातभार लावण्याचा सल्ला सर्वसामान्य नागरिक देत आहेत. उपमहापौर भगवान भालेराव यांच्या उपोषणामुळे पालिका आयुक्तांच्या मर्यादा उघड झाला असून शहर विकासासाठी आयुक्त बदलीची मागणी होत आहे. 

 आयुक्त बदलीचा सूर उमटत आहे

 उपमहापौर भगवान भालेराव यांनी आयुक्त डॉ. राजा दयानिधी याना निष्क्रिय ठरवून आयुक्त दालना समोर गेल्या आठवड्यात उपोषण केले. याप्रकारने महापालिका कारभाराची लक्तरे लटकले असून आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या बदलीची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका