शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिवसैनिकांना गृहीत धरल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 01:33 IST

नाराज शिवसैनिकांना विश्वासात घेऊन समजूत न घालता उलट काही झाले तरी शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश पाळतील आणि कामाला लागतील असे गृहीत धरल्यानेच त्याचा फटका शिवसेनेला बसून पांडुरंग बरोरा यांचा पराभव झाला.

शहापूर /भातसानगर : नाराज शिवसैनिकांना विश्वासात घेऊन समजूत न घालता उलट काही झाले तरी शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश पाळतील आणि कामाला लागतील असे गृहीत धरल्यानेच त्याचा फटका शिवसेनेला बसून पांडुरंग बरोरा यांचा पराभव झाला. २०१४ च्या निवडणुकीत त्या वेळेस राष्ट्रवादीत असलेले बरोरा यांनी शिवसेनेचे दौलत दरोडा यांचा अवघा ५ हजार ५४४ मतांनी पराभव केला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस होती ती पुढे वाढत गेली त्याचा परिणाम ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आला.

ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ तिवरे आणि पांडुरंग बरोरा यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कमी लागलेला निकाल हा आमदार बरोरा यांच्या साठी धोक्याची घंटा होती. राष्ट्रवादीतील वातावरण जर पुढे असेच राहिले तर विधानसभा निवडणूक आपल्याला जड जाईल हे लक्षात घेऊन बरोरा यांनी एकतर भाजप किंवा शिवसेनेत जाण्याचा पर्याय ठेवला होता. अखेर योग्य वेळ येताच बरोरा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेत असंतोष निर्माण झाला.

तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी पुढाकार घेत बरोरा यांचा शिवसेना प्रवेशाचा सोपस्कार घडवून आणला. त्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला. बरोरा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित होताच शिवसेनेत बंडाची ठिणगी पडली. दौलत दरोडा यांच्यासह इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यातील पसरलेली नाराजी दूर करता आली नाही . शिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपंचायत, खरेदी विक्र ी संघ तसेच अनेक ग्राम पंचायती आणि संघटनात्मक बांधणी असतानाही शिवसेनेत उमेदवार आयात करावा लागला हे निष्ठावान शिवसैनिकांच्या जिव्हारी लागले. नाराज शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा आणि नाराजी जाहीरपणे मांडली.

परंतु हा सगळा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे आणि शिवसेनेचा आदेश पाळला पाहिजे असे सांगण्यात आले. शिवसैनिकांना विश्वासात घेऊन नाराजी दूर करता आली असती तर कदाचित सेनेचे मताधिक्य वाढले असते. आपल्यावर राष्ट्रवादीचा उमेदवार लादला गेल्यामुळे नाराज शिवसैनिकांनी मतदानाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019shahapur-acशहापूर