शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

काव्यनिर्मिती होण्यासाठी अनुभवांची शिदोरी महत्वाची -  कवी अशोक बागवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 3:33 PM

शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी प्रसाद कुळकर्णी ( साद ) यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन मराठी ग्रंथ संग्रहालय , सरस्वती सभागृह,येथे कवी अशोक बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. महेश पाटील, आशा दोंदे , स्वरूपाराणी उबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ठळक मुद्देकाव्यनिर्मिती होण्यासाठी अनुभवांची शिदोरी महत्वाची -  कवी अशोक बागवेकवी प्रसाद कुळकर्णी ( साद ) यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशनशिदोरी काव्यसंग्रहातील कवितांचे केले काव्यगायन

ठाणे : " काळावर ठसा उमटविणारी कविता निर्माण होण्यासाठी  अनुभवांची ' शिदोरी ' महत्वाची आहे.' असे मत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशन आणि संवाद - सृजन प्रतिष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या कवी प्रसाद कुळकर्णी यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत  होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. महेश पाटील, आशा दोन्दे, स्वरूपाराणी उबाळे ,कवी प्रसाद कुळकर्णी, प्रकाशक संतोष राणे ई. मान्यवर उपस्थित होते.

          अशोक बागवे पुढे म्हणाले " , शोकाचे रूपांतर श्लोकात करण्याची प्रतिभा कविंमधे असते. दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जो अनुभव आपण घेतो तो योग्य अभिव्यक्तिद्वारे मांडणे म्हणजे कविता होय. कविने अनुभवांच्या वेणेतून गेल्याशिवाय  उत्कृष्ट काव्यनिर्मिती होणार नाही. केवळ नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी कवितेतून लागणारे फलक आणि ते लावणारे नंतर गायब होतात . कारण त्यात सिद्धिपेक्षा प्रसिद्धि महत्वाची असते. खरा कवी प्रसिद्धिच्या मागे लागत नाही . त्याची कविताच त्याला प्रसिद्ध करते." कवी प्रसाद कुळकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले ", शिदोरी काव्यसंग्रहातील विविध कविता मुंबईच्या ट्रैफिक मधे सुचल्या आहेत. ट्रैफिक मुळे तासनतास गाडीत अडकल्यानंतर चिड़चिड़ कण्यापेक्षा ' मना शांत हो'  असे शब्द उमटू लागले. त्यामधूनच कवितेच्या निर्मितीचे सूत्र गवसले. ट्रैफिकमुळे चिडूंन न जाता मनातल्या मनात स्फुरलेल्या ओळी पाठ करून घरी आल्यावर लिहून काढू लागलो . त्यामुळेच शिदोरी काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. यावेळी डॉ. महेश पाटील, आशा दोन्दे , स्वरूपाराणी उबाळे , प्रकाशक संतोष राणे यांचीही भाषणे झाली . सचिन पेंडसे, बलका मुखर्जी , प्राजक्ता देशमुख , योगेश कुळकर्णी , प्रसाद कुळकर्णी यांनी शिदोरी काव्यसंग्रहातील कवितांचे काव्यगायन केले .

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई