शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

शिंदेंची कामगिरीही सुमारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:48 IST

संख्याबळ एकने घटले; पालकमंत्रीपदावर येऊ शकते गंडांतर

ठाणे : विधानसभा निवडणुकीस शिवसेना, भाजप एकत्र सामोरे गेले असले, तरी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक फायदा भाजपला झाला आहे. शिवसेनेला नऊपैकी केवळ पाच जागा मिळवता आल्याने पक्षाची जिल्ह्यावरील पकड सैल झाली आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही शिवसेनेला आता भाजपचा छोटा भाऊ म्हणूनच राहावे लागणार आहे. या धक्कादायक निकालांमुळे एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेश नाईक हे जिल्ह्याचे नेतृत्व करतील, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले असून, एकूणच वाटचाल त्याच दिशेने सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ जागांपैकी प्रत्येकी नऊ-नऊ जागांवर भाजप आणि शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले होते. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपच्या गीता जैन यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंडखोराने भाजपला, तर कल्याण पश्चिमेत भाजपच्या बंडखोराने शिवसेनेला आव्हान दिले होते. यात मीरा-भार्इंदरमध्ये गीता जैन यांनी बाजी मारली असून, त्या आता भाजपबरोबरच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेची जागा भाजपने, तर कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेने राखली आहे. एकूणच एका ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी शिवसेनेला सरशी मिळाली आहे. परंतु, जिल्ह्यात भाजपला आठ जागा मिळाल्या असून, गीता जैन जोडल्यास भाजपच्या खात्यात नऊ जागा आहेत.

शिवसेनेचे मात्र या निवडणुकीत मोठे नुकसान झाले. यापूर्वी शिवसेनेचे जिल्ह्यात सहा, तर भाजपचे सात आमदार होते. याशिवाय, एका अपक्ष आमदाराने भाजपची कास धरली होती. आताच्या निवडणुकीनंतर मात्र चित्र बदलले आहे. त्यानुसार, भाजपने आठ जागांवर विजय मिळवला असून, मीरा-भार्इंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांची साथ गृहीत धरल्यास भाजपकडे जिल्ह्यात नऊ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात आणखी वाढली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे आधी सहा आमदार होते. आता या पक्षाकडे पाच आमदार आहेत.

एकूणच भाजपच्या पारड्यात आता नऊ आणि शिवसेनेच्या पारड्यात पाच जागा राहिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे पारडे मजबूत झाले असून भाजपकडे आता गणेश नाईक, रवींद्र चव्हाण आणि किसन कथोरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. शिवसेनेकडे केवळ एकनाथ शिंदे यांचीच ताकद मोठी आहे. परंतु, आता त्यांचा सामना या तिघांशी असणार आहे.

शिंदे यांनी आपला गड राखला असला तरी, जिल्ह्यात त्यांनी जी समीकरणे निश्चित केली होती, ती पहिल्यांदा चुकीची ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच आता जिल्ह्यातील शिंदेशाहीला धक्का देण्याचे तंत्र येत्या काळात अवलंबिले जाणार असून नाईक यांना भाजपमध्ये घेण्यामागचे मूळ कारणच ते होते, हे आता या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. यापूर्वी किंगमेकर म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांना पक्षानेदेखील एकाच वेळी पालकमंत्र्यासह सार्वजनिक बांधकाम खाते आणि आरोग्य खात्यासारखी महत्त्वाची खातीही दिली होती. आता नव्या मंत्रिमंडळात त्यांच्या पदरात काय पडणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

भिवंडीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार रूपेश म्हात्रे यांचा पराभव झाला. शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा यांना आपल्या पक्षात खेचून ती जागा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले. कल्याण ग्रामीणमध्ये ऐनवेळी सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आणि हे गणितही सपशेल चुकल्याचे स्पष्ट झाले.

ठाणे शहर विधानसभेत शिवसेनेची ताकद असतानाही ती भाजपच्या पाठीशी खंबीरपणे लावता आली नाही. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच भाव खाऊन गेली. एकूणच या सर्वांचा परिणाम म्हणून शिंदेशाहीलाही येत्या काळात जिल्ह्यात घरघर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची सुरुवातच त्यांचे पालकमंत्रीपद काढून गणेश नाईक यांना देण्याने होऊ शकते. याचा फटका शिंदेंना स्वत:ला तर बसणार आहेच, शिवाय जिल्ह्यात शिवसेनेला उतरती कळा लागणार असल्याचेही या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना