शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंची कामगिरीही सुमारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:48 IST

संख्याबळ एकने घटले; पालकमंत्रीपदावर येऊ शकते गंडांतर

ठाणे : विधानसभा निवडणुकीस शिवसेना, भाजप एकत्र सामोरे गेले असले, तरी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक फायदा भाजपला झाला आहे. शिवसेनेला नऊपैकी केवळ पाच जागा मिळवता आल्याने पक्षाची जिल्ह्यावरील पकड सैल झाली आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही शिवसेनेला आता भाजपचा छोटा भाऊ म्हणूनच राहावे लागणार आहे. या धक्कादायक निकालांमुळे एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेश नाईक हे जिल्ह्याचे नेतृत्व करतील, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले असून, एकूणच वाटचाल त्याच दिशेने सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ जागांपैकी प्रत्येकी नऊ-नऊ जागांवर भाजप आणि शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले होते. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपच्या गीता जैन यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंडखोराने भाजपला, तर कल्याण पश्चिमेत भाजपच्या बंडखोराने शिवसेनेला आव्हान दिले होते. यात मीरा-भार्इंदरमध्ये गीता जैन यांनी बाजी मारली असून, त्या आता भाजपबरोबरच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेची जागा भाजपने, तर कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेने राखली आहे. एकूणच एका ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी शिवसेनेला सरशी मिळाली आहे. परंतु, जिल्ह्यात भाजपला आठ जागा मिळाल्या असून, गीता जैन जोडल्यास भाजपच्या खात्यात नऊ जागा आहेत.

शिवसेनेचे मात्र या निवडणुकीत मोठे नुकसान झाले. यापूर्वी शिवसेनेचे जिल्ह्यात सहा, तर भाजपचे सात आमदार होते. याशिवाय, एका अपक्ष आमदाराने भाजपची कास धरली होती. आताच्या निवडणुकीनंतर मात्र चित्र बदलले आहे. त्यानुसार, भाजपने आठ जागांवर विजय मिळवला असून, मीरा-भार्इंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांची साथ गृहीत धरल्यास भाजपकडे जिल्ह्यात नऊ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात आणखी वाढली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे आधी सहा आमदार होते. आता या पक्षाकडे पाच आमदार आहेत.

एकूणच भाजपच्या पारड्यात आता नऊ आणि शिवसेनेच्या पारड्यात पाच जागा राहिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे पारडे मजबूत झाले असून भाजपकडे आता गणेश नाईक, रवींद्र चव्हाण आणि किसन कथोरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. शिवसेनेकडे केवळ एकनाथ शिंदे यांचीच ताकद मोठी आहे. परंतु, आता त्यांचा सामना या तिघांशी असणार आहे.

शिंदे यांनी आपला गड राखला असला तरी, जिल्ह्यात त्यांनी जी समीकरणे निश्चित केली होती, ती पहिल्यांदा चुकीची ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच आता जिल्ह्यातील शिंदेशाहीला धक्का देण्याचे तंत्र येत्या काळात अवलंबिले जाणार असून नाईक यांना भाजपमध्ये घेण्यामागचे मूळ कारणच ते होते, हे आता या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. यापूर्वी किंगमेकर म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांना पक्षानेदेखील एकाच वेळी पालकमंत्र्यासह सार्वजनिक बांधकाम खाते आणि आरोग्य खात्यासारखी महत्त्वाची खातीही दिली होती. आता नव्या मंत्रिमंडळात त्यांच्या पदरात काय पडणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

भिवंडीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार रूपेश म्हात्रे यांचा पराभव झाला. शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा यांना आपल्या पक्षात खेचून ती जागा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले. कल्याण ग्रामीणमध्ये ऐनवेळी सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आणि हे गणितही सपशेल चुकल्याचे स्पष्ट झाले.

ठाणे शहर विधानसभेत शिवसेनेची ताकद असतानाही ती भाजपच्या पाठीशी खंबीरपणे लावता आली नाही. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच भाव खाऊन गेली. एकूणच या सर्वांचा परिणाम म्हणून शिंदेशाहीलाही येत्या काळात जिल्ह्यात घरघर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची सुरुवातच त्यांचे पालकमंत्रीपद काढून गणेश नाईक यांना देण्याने होऊ शकते. याचा फटका शिंदेंना स्वत:ला तर बसणार आहेच, शिवाय जिल्ह्यात शिवसेनेला उतरती कळा लागणार असल्याचेही या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना