शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंची कामगिरीही सुमारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:48 IST

संख्याबळ एकने घटले; पालकमंत्रीपदावर येऊ शकते गंडांतर

ठाणे : विधानसभा निवडणुकीस शिवसेना, भाजप एकत्र सामोरे गेले असले, तरी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक फायदा भाजपला झाला आहे. शिवसेनेला नऊपैकी केवळ पाच जागा मिळवता आल्याने पक्षाची जिल्ह्यावरील पकड सैल झाली आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही शिवसेनेला आता भाजपचा छोटा भाऊ म्हणूनच राहावे लागणार आहे. या धक्कादायक निकालांमुळे एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेश नाईक हे जिल्ह्याचे नेतृत्व करतील, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले असून, एकूणच वाटचाल त्याच दिशेने सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ जागांपैकी प्रत्येकी नऊ-नऊ जागांवर भाजप आणि शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले होते. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपच्या गीता जैन यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंडखोराने भाजपला, तर कल्याण पश्चिमेत भाजपच्या बंडखोराने शिवसेनेला आव्हान दिले होते. यात मीरा-भार्इंदरमध्ये गीता जैन यांनी बाजी मारली असून, त्या आता भाजपबरोबरच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेची जागा भाजपने, तर कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेने राखली आहे. एकूणच एका ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी शिवसेनेला सरशी मिळाली आहे. परंतु, जिल्ह्यात भाजपला आठ जागा मिळाल्या असून, गीता जैन जोडल्यास भाजपच्या खात्यात नऊ जागा आहेत.

शिवसेनेचे मात्र या निवडणुकीत मोठे नुकसान झाले. यापूर्वी शिवसेनेचे जिल्ह्यात सहा, तर भाजपचे सात आमदार होते. याशिवाय, एका अपक्ष आमदाराने भाजपची कास धरली होती. आताच्या निवडणुकीनंतर मात्र चित्र बदलले आहे. त्यानुसार, भाजपने आठ जागांवर विजय मिळवला असून, मीरा-भार्इंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांची साथ गृहीत धरल्यास भाजपकडे जिल्ह्यात नऊ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात आणखी वाढली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे आधी सहा आमदार होते. आता या पक्षाकडे पाच आमदार आहेत.

एकूणच भाजपच्या पारड्यात आता नऊ आणि शिवसेनेच्या पारड्यात पाच जागा राहिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे पारडे मजबूत झाले असून भाजपकडे आता गणेश नाईक, रवींद्र चव्हाण आणि किसन कथोरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. शिवसेनेकडे केवळ एकनाथ शिंदे यांचीच ताकद मोठी आहे. परंतु, आता त्यांचा सामना या तिघांशी असणार आहे.

शिंदे यांनी आपला गड राखला असला तरी, जिल्ह्यात त्यांनी जी समीकरणे निश्चित केली होती, ती पहिल्यांदा चुकीची ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच आता जिल्ह्यातील शिंदेशाहीला धक्का देण्याचे तंत्र येत्या काळात अवलंबिले जाणार असून नाईक यांना भाजपमध्ये घेण्यामागचे मूळ कारणच ते होते, हे आता या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. यापूर्वी किंगमेकर म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांना पक्षानेदेखील एकाच वेळी पालकमंत्र्यासह सार्वजनिक बांधकाम खाते आणि आरोग्य खात्यासारखी महत्त्वाची खातीही दिली होती. आता नव्या मंत्रिमंडळात त्यांच्या पदरात काय पडणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

भिवंडीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार रूपेश म्हात्रे यांचा पराभव झाला. शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा यांना आपल्या पक्षात खेचून ती जागा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले. कल्याण ग्रामीणमध्ये ऐनवेळी सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आणि हे गणितही सपशेल चुकल्याचे स्पष्ट झाले.

ठाणे शहर विधानसभेत शिवसेनेची ताकद असतानाही ती भाजपच्या पाठीशी खंबीरपणे लावता आली नाही. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच भाव खाऊन गेली. एकूणच या सर्वांचा परिणाम म्हणून शिंदेशाहीलाही येत्या काळात जिल्ह्यात घरघर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची सुरुवातच त्यांचे पालकमंत्रीपद काढून गणेश नाईक यांना देण्याने होऊ शकते. याचा फटका शिंदेंना स्वत:ला तर बसणार आहेच, शिवाय जिल्ह्यात शिवसेनेला उतरती कळा लागणार असल्याचेही या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना