शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंची कामगिरीही सुमारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:48 IST

संख्याबळ एकने घटले; पालकमंत्रीपदावर येऊ शकते गंडांतर

ठाणे : विधानसभा निवडणुकीस शिवसेना, भाजप एकत्र सामोरे गेले असले, तरी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक फायदा भाजपला झाला आहे. शिवसेनेला नऊपैकी केवळ पाच जागा मिळवता आल्याने पक्षाची जिल्ह्यावरील पकड सैल झाली आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही शिवसेनेला आता भाजपचा छोटा भाऊ म्हणूनच राहावे लागणार आहे. या धक्कादायक निकालांमुळे एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेश नाईक हे जिल्ह्याचे नेतृत्व करतील, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले असून, एकूणच वाटचाल त्याच दिशेने सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ जागांपैकी प्रत्येकी नऊ-नऊ जागांवर भाजप आणि शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले होते. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपच्या गीता जैन यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंडखोराने भाजपला, तर कल्याण पश्चिमेत भाजपच्या बंडखोराने शिवसेनेला आव्हान दिले होते. यात मीरा-भार्इंदरमध्ये गीता जैन यांनी बाजी मारली असून, त्या आता भाजपबरोबरच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेची जागा भाजपने, तर कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेने राखली आहे. एकूणच एका ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी शिवसेनेला सरशी मिळाली आहे. परंतु, जिल्ह्यात भाजपला आठ जागा मिळाल्या असून, गीता जैन जोडल्यास भाजपच्या खात्यात नऊ जागा आहेत.

शिवसेनेचे मात्र या निवडणुकीत मोठे नुकसान झाले. यापूर्वी शिवसेनेचे जिल्ह्यात सहा, तर भाजपचे सात आमदार होते. याशिवाय, एका अपक्ष आमदाराने भाजपची कास धरली होती. आताच्या निवडणुकीनंतर मात्र चित्र बदलले आहे. त्यानुसार, भाजपने आठ जागांवर विजय मिळवला असून, मीरा-भार्इंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांची साथ गृहीत धरल्यास भाजपकडे जिल्ह्यात नऊ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात आणखी वाढली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे आधी सहा आमदार होते. आता या पक्षाकडे पाच आमदार आहेत.

एकूणच भाजपच्या पारड्यात आता नऊ आणि शिवसेनेच्या पारड्यात पाच जागा राहिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे पारडे मजबूत झाले असून भाजपकडे आता गणेश नाईक, रवींद्र चव्हाण आणि किसन कथोरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. शिवसेनेकडे केवळ एकनाथ शिंदे यांचीच ताकद मोठी आहे. परंतु, आता त्यांचा सामना या तिघांशी असणार आहे.

शिंदे यांनी आपला गड राखला असला तरी, जिल्ह्यात त्यांनी जी समीकरणे निश्चित केली होती, ती पहिल्यांदा चुकीची ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच आता जिल्ह्यातील शिंदेशाहीला धक्का देण्याचे तंत्र येत्या काळात अवलंबिले जाणार असून नाईक यांना भाजपमध्ये घेण्यामागचे मूळ कारणच ते होते, हे आता या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. यापूर्वी किंगमेकर म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांना पक्षानेदेखील एकाच वेळी पालकमंत्र्यासह सार्वजनिक बांधकाम खाते आणि आरोग्य खात्यासारखी महत्त्वाची खातीही दिली होती. आता नव्या मंत्रिमंडळात त्यांच्या पदरात काय पडणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

भिवंडीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार रूपेश म्हात्रे यांचा पराभव झाला. शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा यांना आपल्या पक्षात खेचून ती जागा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले. कल्याण ग्रामीणमध्ये ऐनवेळी सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आणि हे गणितही सपशेल चुकल्याचे स्पष्ट झाले.

ठाणे शहर विधानसभेत शिवसेनेची ताकद असतानाही ती भाजपच्या पाठीशी खंबीरपणे लावता आली नाही. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच भाव खाऊन गेली. एकूणच या सर्वांचा परिणाम म्हणून शिंदेशाहीलाही येत्या काळात जिल्ह्यात घरघर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची सुरुवातच त्यांचे पालकमंत्रीपद काढून गणेश नाईक यांना देण्याने होऊ शकते. याचा फटका शिंदेंना स्वत:ला तर बसणार आहेच, शिवाय जिल्ह्यात शिवसेनेला उतरती कळा लागणार असल्याचेही या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना