शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘शिंदे आणखी दोन उमेदवार बदलणार’ Vs ‘तुम्ही न झेपणारी वक्तव्ये करू नका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 11:26 IST

आता उमेदवारी जाहीर करूनही तीन खासदारांच्या जागा बदलल्या, आणखी दोन उमेदवार बदलतील, असेही ते म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजप ईशान्य मुंबईचा लोकसभा निडवणुकीचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत तीन उमेदवार बदलले आहेत. आणखी दोन उमेदवार बदलले जातील, असे भाकीत उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ईशान्य मुंबईत एका प्रचारफेरीदरम्यान आदित्य म्हणाले, महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. दक्षिण मुंबईची जागा मनसेला, भाजपला की शिंदे गटाला मिळणार  हा तिढा सुटलेला नाही. शिंदे गटाने आधी सांगितले होते की, एकही खासदार निवडून नाही आला तर राजीनामा देईन. आता उमेदवारी जाहीर करूनही तीन खासदारांच्या जागा बदलल्या, आणखी दोन उमेदवार बदलतील, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभा मतादरसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर कल्याणची जागा मिळवण्यासाठी सोबत असलेल्या पाच जणांचा बळी मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.

‘तुम्ही न झेपणारी वक्तव्ये करू नका’

डोंबिवली : कुवतीप्रमाणे वक्तव्ये करा, आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्ये झेपत नसतील तर करू नका, असा हल्लाबोल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केला. लोकसभेच्या कल्याणच्या जागेसाठी एकनाथ शिंदे यांनी पाच जणांचा बळी दिला, ज्यांनी शिंदेंना दिली साथ त्यांचाच केला घात, असा आरोप ठाकरेंनी केला होता. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून महायुतीचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा नागपुरात करताच रविवारी डोंबिवलीत महायुतीमधील घटक पक्षांचा मेळावा पार पडला. मेळाव्याला तिन्ही पक्षांचे स्थानिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मतदारसंघाच्या बूथवर तिन्ही पक्षांचे ८० हजार कार्यकर्ते काम करतील. या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता येईल, अशा शब्दात शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला उपस्थित आ. किसन कथोरे यांनी आम्ही भाजपसोबत आहोत असे सांगत कपिल पाटील यांच्याशी असलेल्या मतभेदांवर उत्तर देणे टाळले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा