शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Metro Carshed: शिंदे - भाजपा सरकार मेट्रो कारशेड राई-मुर्धा गावात करण्यावर ठाम 

By धीरज परब | Updated: September 28, 2022 15:27 IST

Metro Carshed: शासनाच्या नगरविकास विभागाने मीरारोड येथील ३२ हेक्टर जमीन कारशेड साठी पालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित करण्याचे आदेश जारी केले आहेत

- धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर मेट्रो कारशेड साठी आधीच एमएमआरडीए ने अधिसूचना काढून जमीन अधिग्रहणचा प्रयत्न चालवला असतानाच आता शासनाच्या नगरविकास विभागाने देखील येथील ३२ हेक्टर जमीन कारशेड साठी पालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित करण्याचे आदेश जारी केले आहेत . त्यामुळे स्थानिकांच्या भूमिपुत्र समन्वय संस्थेने राज्यातील शिंदे -  भाजपा सरकारवर विश्वासघाताचा आरोप करून आंदोलनासह कायदेशीर लढ्याचा इशारा दिला आहे .

दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्गाचे काम सुरु असून भाईंदर पश्चिमेस त्याचे शेवटचे स्थानक सुभाषचंद्र बोस मैदान येथे होते .  मात्र एमएमआरडीएने मेट्रोकारशेड साठी मुर्धा - राई गावा दरम्यानची जमीन निश्चित करून तशी अधिसूचना काढली आहे . जमीन अधिग्रहण साठी जमीन मालकांच्या सुनावणी सुद्धा घेतल्या गेल्या आहेत . तर ह्या प्रस्तावित मेट्रो कारशेड ला भूमिपुत्र संघटने सोबत शिवसेना , भाजपा , मनसे , काँग्रेस आदी सर्वच पक्षांनी विरोध केला  आहे . आमदार प्रताप सरनाईक यांनी सुद्धा कारशेड विरोधात भूमिका घेत त्यावेळी नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना सुद्धा तक्रारी केल्या होत्या.

त्यामुळे राज्यात शिंदे व भाजपा सरकार आल्या नंतर मेट्रो कारशेड रद्द होईल अशी अपेक्षा संघटने सह अनेक ग्रामस्थांना होती . परंतु नवीन सरकारने तर एक पाऊल पुढे जाऊन मेट्रो कारशेड साठी ३२ हेक्टर इतकी जागा पालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित करण्यासाठी फेरबदलाची सूचना १९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे . सध्याच्या मंजूर पालिका विकास आराखड्या नुसार सदर प्रस्तावित ३२ हेक्टर क्षेत्रातील सदर जागा भागशः ना विकास क्षेत्र , १८ मी रस्ता व भागशः रहिवास क्षेत्र आहे . ते रद्द करून मेट्रो कारशेड साठी आरक्षित केले जाणार आहे . शासनाचे कार्यासन अधिकारी पु. म. शिंदे यांनी राज्यपालांच्या मंजुरीने जारी केलेली सूचना प्रसिद्ध झाल्या पासून १ महिन्यात हरकती व सूचनांसाठी मुदत दिली आहे . 

अशोक पाटील ( अध्यक्ष , भूमिपुत्र समन्वय संस्था ) -  मेट्रोकार शेडचे आरक्षण विकास आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी  सूचना  प्रसिद्ध करून सरकारने आगरी भूमिपुत्र व शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे .  भाईंदर येथील अंतिम मेट्रो स्थानक जवळ शेकडो एकर जमीन खाजगी विकासक ,  राधा स्वामी सत्संग व केंद्राची उपलब्ध असताना ती न घेता केवळ आगरी भूमिपुत्रांना उध्वस्त करण्यासाठीचा विडा शासन व प्रशासनाने उचलला आहे . याचा कायदेशीर तसेच आंदोलनाच्या मार्गाने प्रखर विरोध करू.

भाईंदर येथील जमिनींवर मेट्रो कारडेपो आरक्षण टाकण्याची सूचना शासनाने प्रसिद्ध केली मात्र त्यात मीरा भाईंदर महापालिका ऐवजी ठाणे महापालिका नमूद केले .  सूचना , नकाशा  सुद्धा ठाणे महापालिकेच्या सूचना फलकांवर लावण्यास सांगितले . ठाणे महापालिकेचा संबंध नसताना शासनाने मीरा भाईंदर ऐवजी ठाणे महापालिकेचा उल्लेख करून भाईंदर मधील नागरिकांना  सदर बाब कळूच नये यासाठी पद्धतशीर हा प्रकार केल्याचा आरोप होऊ लागला आहे . कारण १ महिन्याची मुदतच हरकती व सूचनां साठी असल्याने त्या येऊच नये म्हणून हा खटाटोप केला गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे . 

 

टॅग्स :Metroमेट्रोmira roadमीरा रोड