शहरं
Join us  
Trending Stories
1
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
2
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
3
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
4
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
5
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
6
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
7
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
8
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
9
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
10
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
11
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
12
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
13
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
14
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
15
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
16
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
17
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
18
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
19
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
20
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
Daily Top 2Weekly Top 5

शीळफाटा-बदलापूर नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 03:41 IST

जिल्ह्यातील वाढती लोकवस्ती व वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांच्या सोयीसाठी नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जाईल.

भिवंडी : जिल्ह्यातील वाढती लोकवस्ती व वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांच्या सोयीसाठी नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जाईल. तसेच शीळफाटा ते बदलापूर मेट्रो मार्गासाठी आराखडा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भिवंडीत केली.मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग तसेच डोंबिवली ते वसई जलवाहतुकीचे पंधरा दिवसांत भूमिपूजन करून येत्या महिन्यात काम सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी जाहीर केले. त्याचप्रमाणे इटलीतील व्हेनिस विमानतळाच्या धर्तीवर विमानतळावर पोहोचण्यास जलमार्ग विकसीत करण्याच्या सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.भिवंडी तालुक्यातील वडपे ते ठाणे हा १ हजार १८३ कोटी रुपयांचा महामार्ग तसेच ४४५ कोटींच्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या नवीन महामार्गाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. खा. कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा ५० टक्के निधी व शीळफाटा ते बदलापूर मेट्रोमार्गाची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.मेट्रो व रस्ते मार्गाने भिवंडीचा विकास होईल. लॉजिस्टीक पार्कमुळे हजारो नोकऱ्या मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. माणकोली व रांजनोली पुलाचे लांबलेले काम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुर्गाडी पुलाच्या कामासाठी नव्याने निविदा काढल्या असून, ते कामही लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी जाहीर केले.मुंबई, ठाण्यासह कोकणात जलवाहतूक वेगाने होऊ शकेल. त्यादृष्टीने एमएमआर क्षेत्रात जलवाहतुकीच्या आराखड्याला पुढील आठवड्यात मंजुरी मिळेल. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या संमतीने दोन महिन्यांत रो-रो प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुंबई-बडोदा महामार्गाच्या निविदा काढल्या असून, पंधरा दिवसांत भूमिपूजनही करता येईल. जलवाहतुकीसाठी डोंबिवली ते वसईपर्यंत आठ जेट्टींना मंजुरी दिली आहे. ठाणे-वसई जलमार्गाचेही १५ दिवसांत भूमिपूजन होऊन, महिनाभरात काम सुरू होईल.जलवाहतुकीचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली. भिवंडी व कल्याण मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी मास रॅपीड ट्रान्सपोर्टचा फायदा होईल. माळशेज घाट रस्त्याचा डीपीआर तयार झाल्यानंतर त्याचे काम तातडीने सुरू होईल.मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेचे कामही सुरू असून, भूसंपादन झाले आहे. यासाठी अविकसीत भागातील जमीन संपादीत केल्याने, या भागाचा विकास होईल, असे गडकरी म्हणाले.>... तर मुंबईचा समुद्रही मॉरिशसप्रमाणे शुद्धगंगानदीचे शुद्धीकरण होऊ शकते, तर मुंबईचा अरबी समुद्रही मॉरिशसच्या समुद्राप्रमाणे शुद्ध करता येईल. मात्र, त्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज गडकरी यांनी अधोरेखित केली.