शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

शीळफाटा-बदलापूर नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 03:41 IST

जिल्ह्यातील वाढती लोकवस्ती व वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांच्या सोयीसाठी नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जाईल.

भिवंडी : जिल्ह्यातील वाढती लोकवस्ती व वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांच्या सोयीसाठी नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जाईल. तसेच शीळफाटा ते बदलापूर मेट्रो मार्गासाठी आराखडा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भिवंडीत केली.मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग तसेच डोंबिवली ते वसई जलवाहतुकीचे पंधरा दिवसांत भूमिपूजन करून येत्या महिन्यात काम सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी जाहीर केले. त्याचप्रमाणे इटलीतील व्हेनिस विमानतळाच्या धर्तीवर विमानतळावर पोहोचण्यास जलमार्ग विकसीत करण्याच्या सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.भिवंडी तालुक्यातील वडपे ते ठाणे हा १ हजार १८३ कोटी रुपयांचा महामार्ग तसेच ४४५ कोटींच्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या नवीन महामार्गाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. खा. कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा ५० टक्के निधी व शीळफाटा ते बदलापूर मेट्रोमार्गाची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.मेट्रो व रस्ते मार्गाने भिवंडीचा विकास होईल. लॉजिस्टीक पार्कमुळे हजारो नोकऱ्या मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. माणकोली व रांजनोली पुलाचे लांबलेले काम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुर्गाडी पुलाच्या कामासाठी नव्याने निविदा काढल्या असून, ते कामही लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी जाहीर केले.मुंबई, ठाण्यासह कोकणात जलवाहतूक वेगाने होऊ शकेल. त्यादृष्टीने एमएमआर क्षेत्रात जलवाहतुकीच्या आराखड्याला पुढील आठवड्यात मंजुरी मिळेल. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या संमतीने दोन महिन्यांत रो-रो प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुंबई-बडोदा महामार्गाच्या निविदा काढल्या असून, पंधरा दिवसांत भूमिपूजनही करता येईल. जलवाहतुकीसाठी डोंबिवली ते वसईपर्यंत आठ जेट्टींना मंजुरी दिली आहे. ठाणे-वसई जलमार्गाचेही १५ दिवसांत भूमिपूजन होऊन, महिनाभरात काम सुरू होईल.जलवाहतुकीचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली. भिवंडी व कल्याण मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी मास रॅपीड ट्रान्सपोर्टचा फायदा होईल. माळशेज घाट रस्त्याचा डीपीआर तयार झाल्यानंतर त्याचे काम तातडीने सुरू होईल.मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेचे कामही सुरू असून, भूसंपादन झाले आहे. यासाठी अविकसीत भागातील जमीन संपादीत केल्याने, या भागाचा विकास होईल, असे गडकरी म्हणाले.>... तर मुंबईचा समुद्रही मॉरिशसप्रमाणे शुद्धगंगानदीचे शुद्धीकरण होऊ शकते, तर मुंबईचा अरबी समुद्रही मॉरिशसच्या समुद्राप्रमाणे शुद्ध करता येईल. मात्र, त्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज गडकरी यांनी अधोरेखित केली.