शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

शरद पवार यांचे घर तटकरेंनी फोडले; आव्हाडांचा आरोप, राष्ट्रवादीचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 08:26 IST

देश वाचवायचा असेल तर सत्ताबदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शरद पवारांचे घर सुनील तटकरे यांनी फोडले, असा आरोप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केला. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही, असे आवाहनही ठाण्यात आयोजित शिमगोत्सवात त्यांनी कोकणवासीयांना केले.

देश वाचवायचा असेल तर सत्ताबदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड - कळवा येथे कोकणचा शिमगोत्सव व पालखी नृत्य स्पर्धा झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनीही त्यास हजेरी लावली. सुनील तटकरे हे कायम अजित पवारांच्या कानात सांगायचे काम करतात. तटकरे स्वतः आमदार-मंत्री, मुलगा-मुलगी-पुतण्या-भाऊ हेही आमदार अशा पाच जणांना शरद पवार यांनी पदं दिली. एवढी पदं मिळालेले महाराष्ट्रातील घराणे सांगा? असे ते म्हणाले.

ठाणे : जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून, ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले असल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सोमवारी केला. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर केली होती. 

आव्हाडांनी केलेल्या टीकेला परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. परांजपे म्हणाले, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करतो. शरद पवारांना आव्हाडांनी विचारावे की, २०१४ चा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला कोणी सांगितला?  शरद पवार यांना कायम खोटेनाटे सांगण्याचे काम आव्हाड यांनी केले. भिवंडीची जागा हट्टापायी घेतली असून, आता त्या जागेवर उमेदवार कसा निवडून येईल याची काळजी आव्हाड यांनी करावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार