शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शरद पवार यांचे घर तटकरेंनी फोडले; आव्हाडांचा आरोप, राष्ट्रवादीचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 08:26 IST

देश वाचवायचा असेल तर सत्ताबदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शरद पवारांचे घर सुनील तटकरे यांनी फोडले, असा आरोप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केला. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही, असे आवाहनही ठाण्यात आयोजित शिमगोत्सवात त्यांनी कोकणवासीयांना केले.

देश वाचवायचा असेल तर सत्ताबदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड - कळवा येथे कोकणचा शिमगोत्सव व पालखी नृत्य स्पर्धा झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनीही त्यास हजेरी लावली. सुनील तटकरे हे कायम अजित पवारांच्या कानात सांगायचे काम करतात. तटकरे स्वतः आमदार-मंत्री, मुलगा-मुलगी-पुतण्या-भाऊ हेही आमदार अशा पाच जणांना शरद पवार यांनी पदं दिली. एवढी पदं मिळालेले महाराष्ट्रातील घराणे सांगा? असे ते म्हणाले.

ठाणे : जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून, ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले असल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सोमवारी केला. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर केली होती. 

आव्हाडांनी केलेल्या टीकेला परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. परांजपे म्हणाले, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करतो. शरद पवारांना आव्हाडांनी विचारावे की, २०१४ चा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला कोणी सांगितला?  शरद पवार यांना कायम खोटेनाटे सांगण्याचे काम आव्हाड यांनी केले. भिवंडीची जागा हट्टापायी घेतली असून, आता त्या जागेवर उमेदवार कसा निवडून येईल याची काळजी आव्हाड यांनी करावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार