शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

धरणांचे ‘शहापूर’ पाणीटंचाईने त्रस्त! विहिरींनी तळ गाठला; आठ गावे, ४५ पाडे तहानलेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 11:15 IST

प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू

पंडित मसणे, लोकमत न्यूज नेटवर्क, वासिंद: उन्हाच्या चटक्याबरोबरच शहापूरमधील नागरिकांना पाणीटंचाईचे चटकेही सोसावे लागत आहेत. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. शहापूर तालुक्यातील आठ गावे आणि ४५ पाडे आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या गावपाड्यांतील महिलांना शेकडो किलोमीटर डोक्यावरूनच पाणी आणून तहान भागावावी लागत आहेत.

धरणांचा ताल शहापूर तालुक्यातील दरवर्षी फेब्रुवारी ते जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. तालुक्यातील गाव-पाड्यांत निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची समस्या सुटावी, यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने यापूर्वी पाणीटंचाई आराखडा तयार करून मंजुरीसाठी प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पाणी टंचाईवर उपाय योजना केल्या जात आहेत.

दरवर्षीचे रडगाणे

दरवर्षी अनेक गाव-पाड्यांत टंचाई जाणवते. या निर्माण होणाऱ्या टंचाईच्या समस्येसाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजना आखून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. २०२४-२५ या वर्षासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून प्रस्तावित केला. यंदा तालुक्यात जानेवारी ते जूनदरम्यान ३०६ गावे व ५६३ पाडे, असे एकूण ८६९ गाव-पाड्यांत टंचाई जाणवत आहे.

तालुक्यात ३३ टँकरची मागणी

ही टंचाईची समस्या सोडविण्यासाठी या गाव-पाड्यांत सरकारी पातळीवरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पाणीटंचाई म्हणून मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या २४ गावे व ११६ पाडे यासाठी एकूण ३३ टँकरची मागणी असून, या अनुषंगाने सध्या मिळालेल्या मंजुरीनुसार तालुक्यातील १६ गावे, ७१ पाड्यांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती गायकवाड यांनी दिली, तर पंचायत समिती स्तरावर दोन गावे व आठ पाड्यांसाठी दोन टँकर प्रस्तावित आहेत.

पंधरा कोटींचा आराखड्यावर खर्च

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा शहापूर उपविभागांनी विविध योजनांच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविला आहे. यामध्ये टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबर बुडक्या घेणे, गाळ काढून विहीर खोल करणे, विहीर अधिग्रहण व प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजना करणे.नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती, पूरक नळ पाणीपुरवठा योजना करून विंधन विहिरी घेणे व विहिरीची दुरुस्ती करणे, या विविध उपाययोजनांचा आराखड्यात समावेश केला आहे, तर या प्रस्तावित योजनाकामी १५ कोटी ४७ लाख ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Shahapurशहापूरwater shortageपाणीकपात