शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मलशुद्धीकरण केंद्र अद्यापही कार्यान्वित नाही, सांडपाणी थेट वालधुनी नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 22:36 IST

उल्हासनगरातील सांडपाण्यावर यापूर्वी शांतीनगर व खडगोलवली मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून, पाणी वालधुनी नदीत सोडले जात होते

ठळक मुद्देमहापुरात खडगोलवली व शांतीनगर येथील शुद्धीकरण केंद्राचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन सांडपाणी वाहून आणणारे बहुतांश पाईप वाहून गेले. काही अपवाद सोडल्यास दोन्ही केंद्र तेंव्हापासून बंद पडली.

सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील सांडपाणी प्रक्रिया विना थेट वालधुनी नदीत सोडले जात असल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. खेमानी नाल्यातील सांडपाणी पंपिंगद्वारे उचलून अंबिकानागर नाल्याद्वारे वालधुनी नदी पात्रात सोडले जाते. अमृत योजने अंतर्गत कोट्यवधी निधीतून उभारलेले मलशुद्धीकरण केंद्र अद्यापही कार्यान्वित झाले नसल्याने, त्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

उल्हासनगरातील सांडपाण्यावर यापूर्वी शांतीनगर व खडगोलवली मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून, पाणी वालधुनी नदीत सोडले जात होते. मात्र महापुरात खडगोलवली व शांतीनगर येथील शुद्धीकरण केंद्राचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन सांडपाणी वाहून आणणारे बहुतांश पाईप वाहून गेले. काही अपवाद सोडल्यास दोन्ही केंद्र तेंव्हापासून बंद पडली. दरम्यान वालधुनी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकल्यावर, वालधुनी नदीला प्रदूषित करणाऱ्या शहरातील ५०० पेक्षा जास्त जीन्स कारखान्यावर प्रदूषण मंडळाने कारवाई केली. त्यानंतरही नदीचे प्रदूषण थांबले नसून नदी पात्रात सांडपाणी सोडणाऱ्या अंबरनाथ येथील रासायनिक कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

शहरातील सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडले जात असल्याने, सर्व स्तरातून टीका झाली. अखेर केंद्राच्या अमृत योजने अंतर्गत वडोलगाव, शांतीनगर व खडगोलवली येथे मलजल शुद्धीकरण केंद्र उभे करण्यास मंजुरी मिळून सांडपाण्याचे मुख्य पाईप नव्याने टाकण्यात आले. वडोलगाव येथे उभारण्यात आलेल्या मलजल शुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन, गेल्या महिन्यात केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी दिली. तर शांतीनगर येथील मलजल शुद्धीकरण केंद्र मार्च मध्ये कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले. उल्हास नदीला प्रदूषित करणाऱ्या खेमानी नाल्यातील ४ एमएलडी सांडपाणी पंपिंगद्वारे उचलून अंबिकानगर सोडण्यात येते. नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शांतीनगर येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असून तेही दोन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. तर खडगोलवली येथील केंद्राचे काम सुरवात होणार असल्याची माहिती रहेजा यांनी दिली. 

वालधुनी व उल्हासनदी प्रदूषित

 उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न होता थेट सांडपाणी दोन्ही नदी पात्रात व उल्हास खाडीत सोडले जाते. यामुळे नदीचे प्रदूषण वाढले असून प्रदूषणामुळे उल्हास नदीला जलपर्णी वनस्पतींचा वेढा पडला. शासनाने शहरातुन व ग्रामीण परिसरातून सांडपाणी सोडणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरriverनदी