शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मलशुद्धीकरण केंद्र अद्यापही कार्यान्वित नाही, सांडपाणी थेट वालधुनी नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 22:36 IST

उल्हासनगरातील सांडपाण्यावर यापूर्वी शांतीनगर व खडगोलवली मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून, पाणी वालधुनी नदीत सोडले जात होते

ठळक मुद्देमहापुरात खडगोलवली व शांतीनगर येथील शुद्धीकरण केंद्राचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन सांडपाणी वाहून आणणारे बहुतांश पाईप वाहून गेले. काही अपवाद सोडल्यास दोन्ही केंद्र तेंव्हापासून बंद पडली.

सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील सांडपाणी प्रक्रिया विना थेट वालधुनी नदीत सोडले जात असल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. खेमानी नाल्यातील सांडपाणी पंपिंगद्वारे उचलून अंबिकानागर नाल्याद्वारे वालधुनी नदी पात्रात सोडले जाते. अमृत योजने अंतर्गत कोट्यवधी निधीतून उभारलेले मलशुद्धीकरण केंद्र अद्यापही कार्यान्वित झाले नसल्याने, त्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

उल्हासनगरातील सांडपाण्यावर यापूर्वी शांतीनगर व खडगोलवली मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून, पाणी वालधुनी नदीत सोडले जात होते. मात्र महापुरात खडगोलवली व शांतीनगर येथील शुद्धीकरण केंद्राचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन सांडपाणी वाहून आणणारे बहुतांश पाईप वाहून गेले. काही अपवाद सोडल्यास दोन्ही केंद्र तेंव्हापासून बंद पडली. दरम्यान वालधुनी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकल्यावर, वालधुनी नदीला प्रदूषित करणाऱ्या शहरातील ५०० पेक्षा जास्त जीन्स कारखान्यावर प्रदूषण मंडळाने कारवाई केली. त्यानंतरही नदीचे प्रदूषण थांबले नसून नदी पात्रात सांडपाणी सोडणाऱ्या अंबरनाथ येथील रासायनिक कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

शहरातील सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडले जात असल्याने, सर्व स्तरातून टीका झाली. अखेर केंद्राच्या अमृत योजने अंतर्गत वडोलगाव, शांतीनगर व खडगोलवली येथे मलजल शुद्धीकरण केंद्र उभे करण्यास मंजुरी मिळून सांडपाण्याचे मुख्य पाईप नव्याने टाकण्यात आले. वडोलगाव येथे उभारण्यात आलेल्या मलजल शुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन, गेल्या महिन्यात केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी दिली. तर शांतीनगर येथील मलजल शुद्धीकरण केंद्र मार्च मध्ये कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले. उल्हास नदीला प्रदूषित करणाऱ्या खेमानी नाल्यातील ४ एमएलडी सांडपाणी पंपिंगद्वारे उचलून अंबिकानगर सोडण्यात येते. नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शांतीनगर येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असून तेही दोन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. तर खडगोलवली येथील केंद्राचे काम सुरवात होणार असल्याची माहिती रहेजा यांनी दिली. 

वालधुनी व उल्हासनदी प्रदूषित

 उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न होता थेट सांडपाणी दोन्ही नदी पात्रात व उल्हास खाडीत सोडले जाते. यामुळे नदीचे प्रदूषण वाढले असून प्रदूषणामुळे उल्हास नदीला जलपर्णी वनस्पतींचा वेढा पडला. शासनाने शहरातुन व ग्रामीण परिसरातून सांडपाणी सोडणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरriverनदी