शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मलशुद्धीकरण केंद्र अद्यापही कार्यान्वित नाही, सांडपाणी थेट वालधुनी नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 22:36 IST

उल्हासनगरातील सांडपाण्यावर यापूर्वी शांतीनगर व खडगोलवली मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून, पाणी वालधुनी नदीत सोडले जात होते

ठळक मुद्देमहापुरात खडगोलवली व शांतीनगर येथील शुद्धीकरण केंद्राचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन सांडपाणी वाहून आणणारे बहुतांश पाईप वाहून गेले. काही अपवाद सोडल्यास दोन्ही केंद्र तेंव्हापासून बंद पडली.

सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील सांडपाणी प्रक्रिया विना थेट वालधुनी नदीत सोडले जात असल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. खेमानी नाल्यातील सांडपाणी पंपिंगद्वारे उचलून अंबिकानागर नाल्याद्वारे वालधुनी नदी पात्रात सोडले जाते. अमृत योजने अंतर्गत कोट्यवधी निधीतून उभारलेले मलशुद्धीकरण केंद्र अद्यापही कार्यान्वित झाले नसल्याने, त्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

उल्हासनगरातील सांडपाण्यावर यापूर्वी शांतीनगर व खडगोलवली मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून, पाणी वालधुनी नदीत सोडले जात होते. मात्र महापुरात खडगोलवली व शांतीनगर येथील शुद्धीकरण केंद्राचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन सांडपाणी वाहून आणणारे बहुतांश पाईप वाहून गेले. काही अपवाद सोडल्यास दोन्ही केंद्र तेंव्हापासून बंद पडली. दरम्यान वालधुनी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकल्यावर, वालधुनी नदीला प्रदूषित करणाऱ्या शहरातील ५०० पेक्षा जास्त जीन्स कारखान्यावर प्रदूषण मंडळाने कारवाई केली. त्यानंतरही नदीचे प्रदूषण थांबले नसून नदी पात्रात सांडपाणी सोडणाऱ्या अंबरनाथ येथील रासायनिक कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

शहरातील सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडले जात असल्याने, सर्व स्तरातून टीका झाली. अखेर केंद्राच्या अमृत योजने अंतर्गत वडोलगाव, शांतीनगर व खडगोलवली येथे मलजल शुद्धीकरण केंद्र उभे करण्यास मंजुरी मिळून सांडपाण्याचे मुख्य पाईप नव्याने टाकण्यात आले. वडोलगाव येथे उभारण्यात आलेल्या मलजल शुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन, गेल्या महिन्यात केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी दिली. तर शांतीनगर येथील मलजल शुद्धीकरण केंद्र मार्च मध्ये कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले. उल्हास नदीला प्रदूषित करणाऱ्या खेमानी नाल्यातील ४ एमएलडी सांडपाणी पंपिंगद्वारे उचलून अंबिकानगर सोडण्यात येते. नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शांतीनगर येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असून तेही दोन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. तर खडगोलवली येथील केंद्राचे काम सुरवात होणार असल्याची माहिती रहेजा यांनी दिली. 

वालधुनी व उल्हासनदी प्रदूषित

 उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न होता थेट सांडपाणी दोन्ही नदी पात्रात व उल्हास खाडीत सोडले जाते. यामुळे नदीचे प्रदूषण वाढले असून प्रदूषणामुळे उल्हास नदीला जलपर्णी वनस्पतींचा वेढा पडला. शासनाने शहरातुन व ग्रामीण परिसरातून सांडपाणी सोडणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरriverनदी