शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

"श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा"; रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांचे आवाहन

By जितेंद्र कालेकर | Updated: January 14, 2024 17:35 IST

कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प डॉ. मडके यांनी गुंफले.

ठाणे: श्वसनासाठी रोज शुद्ध हवा मिळणे हा आपला अधिकार आहे, आपल्याला अन्न आणि पाणी दर्जेदार हवे असते. पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदुषित ठरतोय. तरी आपण अनभिज्ञ असून आपल्याला याची काळजी किंवा तमा नाही. तेव्हा, श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा’, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी केले.

ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात आयोजित कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प डॉ. मडके यांनी गुंफले. व्याख्यानाच्या प्रारंभी मान्यवरांना वृक्ष भेट देऊन डॉ. अनिल मडके यांनी पर्यावरणाचा संदेश दिला. तसेच अनेक जागतिक संदर्भ देत, अग्नीचा शोध लागल्यावर पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर आणि विविध नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे वायु प्रदुषणाचा परिणाम जाणवु लागल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. यात निसर्ग अतिरेकी नाही तर माणुस अतिरिकी आहे. हवा प्रदुषणाला १० टक्के निसर्ग, तर ९० टक्के माणुस जबाबदार आहे. तेव्हा, वायु प्रदुषणाच्या धोक्यांवर आज जगभर चर्चा होत आहेत. मात्र आपण आजही दूर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले,  जगण्यात श्वसन एवढे महत्त्वाचे असताना आपण त्याबद्दल संवदेशनील, जागरुक नाही. आपली जीवनशैली, अगदी रोजचा स्वयंपाक, वाहन चालवणे, औद्योगिक क्षेत्रातील कामे, शेतात वापरली जाणारी किटकनाशके, डासांसाठी वापरले जाणारे मॉस्किटो रिपेलंट अशा अगणिक बाबींमुळे हवेचे प्रदूषण होत आहे. दुर्दैवाने हीच प्रदूषित हवा आपल्या अनारोग्यास मानसिक तणावास कारणीभूत ठरत आहे.  गेल्या चार दशकांमध्ये ग्लोबल वॉर्मिग वाढत आहे. २०२२ पर्यत कार्बन डायऑक्साइड वाढला आहे. भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन १.५ टन आहे. त्यामुळे वेदर (हवामान) नव्हे तर क्लायमेट (वातावरण) सुधारले पाहीजे. प्रदुषणात दिल्ली पाठोपाठ मुंबई असुन हवा प्रदुषणामुळे मानवाला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. हवा प्रदूषणाचे हे संकट थेट आपल्या श्वासाशी संबंधित असल्याने वेळीच जागे होऊन निर्सगाला जपण्याचे आवाहनही  डॉ. मडके यांनी केले.   

याप्रसंगी व्यासपिठावर या सत्राचे अध्यक्ष डॉ. महेश जोशी, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि प्रा. किर्ती आगाशे उपस्थित होत्या. प्रास्तविकात डॉ.महेश जोशी यांनी, कोविड आल्यानंतरच सर्वाना श्वासाचे महत्व पटल्याचे सांगितले.

टॅग्स :thaneठाणे