शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

"श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा"; रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांचे आवाहन

By जितेंद्र कालेकर | Updated: January 14, 2024 17:35 IST

कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प डॉ. मडके यांनी गुंफले.

ठाणे: श्वसनासाठी रोज शुद्ध हवा मिळणे हा आपला अधिकार आहे, आपल्याला अन्न आणि पाणी दर्जेदार हवे असते. पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदुषित ठरतोय. तरी आपण अनभिज्ञ असून आपल्याला याची काळजी किंवा तमा नाही. तेव्हा, श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा’, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी केले.

ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात आयोजित कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प डॉ. मडके यांनी गुंफले. व्याख्यानाच्या प्रारंभी मान्यवरांना वृक्ष भेट देऊन डॉ. अनिल मडके यांनी पर्यावरणाचा संदेश दिला. तसेच अनेक जागतिक संदर्भ देत, अग्नीचा शोध लागल्यावर पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर आणि विविध नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे वायु प्रदुषणाचा परिणाम जाणवु लागल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. यात निसर्ग अतिरेकी नाही तर माणुस अतिरिकी आहे. हवा प्रदुषणाला १० टक्के निसर्ग, तर ९० टक्के माणुस जबाबदार आहे. तेव्हा, वायु प्रदुषणाच्या धोक्यांवर आज जगभर चर्चा होत आहेत. मात्र आपण आजही दूर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले,  जगण्यात श्वसन एवढे महत्त्वाचे असताना आपण त्याबद्दल संवदेशनील, जागरुक नाही. आपली जीवनशैली, अगदी रोजचा स्वयंपाक, वाहन चालवणे, औद्योगिक क्षेत्रातील कामे, शेतात वापरली जाणारी किटकनाशके, डासांसाठी वापरले जाणारे मॉस्किटो रिपेलंट अशा अगणिक बाबींमुळे हवेचे प्रदूषण होत आहे. दुर्दैवाने हीच प्रदूषित हवा आपल्या अनारोग्यास मानसिक तणावास कारणीभूत ठरत आहे.  गेल्या चार दशकांमध्ये ग्लोबल वॉर्मिग वाढत आहे. २०२२ पर्यत कार्बन डायऑक्साइड वाढला आहे. भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन १.५ टन आहे. त्यामुळे वेदर (हवामान) नव्हे तर क्लायमेट (वातावरण) सुधारले पाहीजे. प्रदुषणात दिल्ली पाठोपाठ मुंबई असुन हवा प्रदुषणामुळे मानवाला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. हवा प्रदूषणाचे हे संकट थेट आपल्या श्वासाशी संबंधित असल्याने वेळीच जागे होऊन निर्सगाला जपण्याचे आवाहनही  डॉ. मडके यांनी केले.   

याप्रसंगी व्यासपिठावर या सत्राचे अध्यक्ष डॉ. महेश जोशी, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि प्रा. किर्ती आगाशे उपस्थित होत्या. प्रास्तविकात डॉ.महेश जोशी यांनी, कोविड आल्यानंतरच सर्वाना श्वासाचे महत्व पटल्याचे सांगितले.

टॅग्स :thaneठाणे