शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा"; रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांचे आवाहन

By जितेंद्र कालेकर | Updated: January 14, 2024 17:35 IST

कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प डॉ. मडके यांनी गुंफले.

ठाणे: श्वसनासाठी रोज शुद्ध हवा मिळणे हा आपला अधिकार आहे, आपल्याला अन्न आणि पाणी दर्जेदार हवे असते. पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदुषित ठरतोय. तरी आपण अनभिज्ञ असून आपल्याला याची काळजी किंवा तमा नाही. तेव्हा, श्वासागणिक धोका...वेळीच ओळखा’, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी केले.

ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात आयोजित कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प डॉ. मडके यांनी गुंफले. व्याख्यानाच्या प्रारंभी मान्यवरांना वृक्ष भेट देऊन डॉ. अनिल मडके यांनी पर्यावरणाचा संदेश दिला. तसेच अनेक जागतिक संदर्भ देत, अग्नीचा शोध लागल्यावर पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर आणि विविध नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे वायु प्रदुषणाचा परिणाम जाणवु लागल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. यात निसर्ग अतिरेकी नाही तर माणुस अतिरिकी आहे. हवा प्रदुषणाला १० टक्के निसर्ग, तर ९० टक्के माणुस जबाबदार आहे. तेव्हा, वायु प्रदुषणाच्या धोक्यांवर आज जगभर चर्चा होत आहेत. मात्र आपण आजही दूर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले,  जगण्यात श्वसन एवढे महत्त्वाचे असताना आपण त्याबद्दल संवदेशनील, जागरुक नाही. आपली जीवनशैली, अगदी रोजचा स्वयंपाक, वाहन चालवणे, औद्योगिक क्षेत्रातील कामे, शेतात वापरली जाणारी किटकनाशके, डासांसाठी वापरले जाणारे मॉस्किटो रिपेलंट अशा अगणिक बाबींमुळे हवेचे प्रदूषण होत आहे. दुर्दैवाने हीच प्रदूषित हवा आपल्या अनारोग्यास मानसिक तणावास कारणीभूत ठरत आहे.  गेल्या चार दशकांमध्ये ग्लोबल वॉर्मिग वाढत आहे. २०२२ पर्यत कार्बन डायऑक्साइड वाढला आहे. भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन १.५ टन आहे. त्यामुळे वेदर (हवामान) नव्हे तर क्लायमेट (वातावरण) सुधारले पाहीजे. प्रदुषणात दिल्ली पाठोपाठ मुंबई असुन हवा प्रदुषणामुळे मानवाला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. हवा प्रदूषणाचे हे संकट थेट आपल्या श्वासाशी संबंधित असल्याने वेळीच जागे होऊन निर्सगाला जपण्याचे आवाहनही  डॉ. मडके यांनी केले.   

याप्रसंगी व्यासपिठावर या सत्राचे अध्यक्ष डॉ. महेश जोशी, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि प्रा. किर्ती आगाशे उपस्थित होत्या. प्रास्तविकात डॉ.महेश जोशी यांनी, कोविड आल्यानंतरच सर्वाना श्वासाचे महत्व पटल्याचे सांगितले.

टॅग्स :thaneठाणे