शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

पाणी विकून शिवसैनिक घर चालवतात, राष्ट्रवादीच्या मोर्चात जितेंद्र आव्हाडांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:39 IST

कळवा-खारीगाव, विटावा भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईविरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

ठाणे - कळवा-खारीगाव, विटावा भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईविरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. त्यामध्ये कळवा पूर्वेतील भास्करनगर, वाघोबानगर, आतकोनेश्वरनगर, पौंडपाडा या डोंगरपट्ट्यातील सर्वाधिक नागरिक सहभागी झाले होते. गेली २५ वर्षे ज्या पक्षाकडे ठाण्याची सत्ता आहे, त्या शिवसेनेने केवळ टक्केवारी मिळाली नाही, म्हणून धरणासाठी पाठपुरावा केला नसल्याचा आरोप करून जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत बिल भरणार नसल्याचा इशारा आव्हाड यांनी दिला. नगरसेवकासह अनेक शिवसैनिक महापालिकेचे पाणी विकून आपली घरे चालवित असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष आहे. कळवा - खारीगाव - विटावावासीयांना आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे नियोजन होत नसल्याने ठाणेकरांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने या जनआक्र ोश मोर्चाचे आयोजन केले होते. यात अनेक महिलांनी आपल्या हातात आणि डोक्यावर रिकामी मडकी घेतली होती. ती प्रभाग समिती कार्यालयासमोर फोडून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. संपूर्ण ठाणे शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली असून तिला सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे. २००२ मध्ये आघाडी सरकारने ठाण्यासाठी शाई धरण मंजूर केले होते. मात्र, येथील सत्ताधाºयांनी टक्केवारी मिळत नसल्याने हे धरण बांधण्यासाठी तरतूद केली नाही. त्यामुळे हे धरण शासनाकडे गेले आहे. पाणी सोडणाºया व्हॉल्व्हमनची दादागिरी सर्वत्र सुरू असून ती आता सहन केली जाणार नाही. अशी दादागिरी करणाºयांची प्रभागातच धिंड काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या मोर्चामध्ये शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक मुकुंद केणी, प्रमिला केणी, महेश साळवी तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .आयुक्तांवरही टीका : शहरातील पाणीटंचाई दूर करायची असेल, तर इतर मोठे प्रकल्प बाजूला ठेवून आधी धरण बांधावे, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना केले. कळव्याबरोबरच संपूर्ण ठाणे शहरातच पाण्याची समस्या गंभीर असून मोठ्या प्रकल्पांवर पैसे खर्च करण्यापेक्षा धरण बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच कळवा पूर्व भागातील झोपड्या रंगवताना आयुक्तांबरोबर स्वत: उपस्थित असतानाही त्या रंगवण्यापेक्षा डोंगरपट्ट्यातील नागरिकांना पाणी द्या, अशी टीकाही आव्हाड यांनी आयुक्तांवर केली.सायलेन्स झोनची ऐशीतैशीसह्याद्री शाळेजवळ असलेल्या कावेरीसेतू या ठिकाणी मोर्चाला सुरु वात झाली. त्यानंतर, कळवानाक्यावरून कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी कळवा प्रभाग समितीच्या समोरच आव्हाड यांनी भाषण केले. कळवा प्रभाग समितीच्या बाजूला दोन शाळा असून पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय थोड्या अंतरावर आहे. त्यामुळे हा परिसर सायलेन्स झोन असतानादेखील या परिसरात पोलिसांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पाणी व कच-यातून शिवसेनेला पैसाकळव्यातील एक शिवसेनेचा एक नगरसेवक महापालिकेचे पाणी विकून आपले घर चालवित असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. तो आपला मित्र असल्याने त्याचे नाव घेत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांची घरे पाणी विकूनच चालत आहेत.पाणी, कचरा यामधून शिवसेना पैसे कमावत आहे. त्यामुळे सामान्य ठाणेकरांचे हाल होत आहेत. आता हे हाल आम्ही सहन करणार नाही. जर, कळवा-खारीगाव-विटाव्यासह संपूर्ण ठाणे शहराची पाणीसमस्या निकाली काढली नाही, तर लाखोंचा मोर्चा ठामपा मुख्यालयावर काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.पाण्यासाठी भगिनींच्या डोळ्यांत तरळणारे अश्रू आता आम्हाला पाहवत नाहीत. त्यामुळे आता आम्ही कायदा हातात घेऊन जनतेसाठी जेलमध्ये जाण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv Senaशिवसेना