शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

किन्हवलीत कापलेली रोपे पावसात भिजली; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 02:43 IST

हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, कापणीच्या हंगामास झाली सुरूवात

- वसंत पानसरे किन्हवली: तालुक्यातील किन्हवली भागासह ग्रामीण भागात भात कापणीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. परंतु चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने कापलेली भात रोपे भिजून ती कुजण्याच्या अवस्थेत आहेत. हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने शेतकरी धास्तावला आहे.

शहापूर तालुक्यात १४ हजार हेक्टर भू क्षेत्रात भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपिके पडतील अशी अपेक्षा असताना ऐन सुगीच्या हंगामात पाऊस पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भातपिकाला पूरक असा पाऊस झाल्याने गेल्या कित्येक वर्षांत शेतकऱ्यांना बघायला मिळाले नव्हते असे दर्जेदार पीक आले होते.

सहा ते सात दिवस पावसाने उघडीप दिल्याने भात कापणीच्या हंगामास सुरूवात झाली होती. पेरणीपासून१२० ते १३० दिवसांनी पिकणाºया गरवा प्रकारच्या भाताच्या प्रजातीसाठी पाण्याची थोडीफार गरज असली तरी १०० ते ११० दिवसांनी पिकणाºया हलवार जातीसाठी पाणी गरजेचे नाही.

शेतकºयांनी सोसायटीचे कर्ज काढून बि-बियाणे व खते विकत आणून शेती लावली आहे. कापलेली भातरोपे डोळ््यादेखत पाण्यावर तरंगत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेले पिकही जाणार असल्याने गोड घासही कडू लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय यंत्रणा कामात व्यस्त आहेत. यामुळे नुकसानीचे पंचनामे कोण करणार असा सवाल शेतकरी करत आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी कार्यालयातील सर्व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असून पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल देणे अशक्य आहे.- दिलीप कापडणीस, कृषी अधिकारी, शहापूर

सतत चार दिवस पडत असलेल्या पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. कापलेली रोपे भिजून पेंढा काळा पडेल व भाताचे दाणे कुजणार असल्याने निवडणुकीनंतर तरी पंचनामे व्हावेत.- मुकुंद गायकर, शेतकरी,चरीव

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस