शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

किन्हवलीत कापलेली रोपे पावसात भिजली; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 02:43 IST

हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, कापणीच्या हंगामास झाली सुरूवात

- वसंत पानसरे किन्हवली: तालुक्यातील किन्हवली भागासह ग्रामीण भागात भात कापणीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. परंतु चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने कापलेली भात रोपे भिजून ती कुजण्याच्या अवस्थेत आहेत. हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने शेतकरी धास्तावला आहे.

शहापूर तालुक्यात १४ हजार हेक्टर भू क्षेत्रात भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपिके पडतील अशी अपेक्षा असताना ऐन सुगीच्या हंगामात पाऊस पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भातपिकाला पूरक असा पाऊस झाल्याने गेल्या कित्येक वर्षांत शेतकऱ्यांना बघायला मिळाले नव्हते असे दर्जेदार पीक आले होते.

सहा ते सात दिवस पावसाने उघडीप दिल्याने भात कापणीच्या हंगामास सुरूवात झाली होती. पेरणीपासून१२० ते १३० दिवसांनी पिकणाºया गरवा प्रकारच्या भाताच्या प्रजातीसाठी पाण्याची थोडीफार गरज असली तरी १०० ते ११० दिवसांनी पिकणाºया हलवार जातीसाठी पाणी गरजेचे नाही.

शेतकºयांनी सोसायटीचे कर्ज काढून बि-बियाणे व खते विकत आणून शेती लावली आहे. कापलेली भातरोपे डोळ््यादेखत पाण्यावर तरंगत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेले पिकही जाणार असल्याने गोड घासही कडू लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय यंत्रणा कामात व्यस्त आहेत. यामुळे नुकसानीचे पंचनामे कोण करणार असा सवाल शेतकरी करत आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी कार्यालयातील सर्व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असून पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल देणे अशक्य आहे.- दिलीप कापडणीस, कृषी अधिकारी, शहापूर

सतत चार दिवस पडत असलेल्या पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. कापलेली रोपे भिजून पेंढा काळा पडेल व भाताचे दाणे कुजणार असल्याने निवडणुकीनंतर तरी पंचनामे व्हावेत.- मुकुंद गायकर, शेतकरी,चरीव

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस