शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात ‘सरपंच संवाद’; मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:20 IST

जिल्हा परिषद ठाणे यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील सरपंचांना प्रस्थापित केलेल्या कामाबद्दल राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर मते मांडण्याची अभूतपूर्व संधी डिजिटल, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध झाली आहे.

ठाणे : राज्यातील गावोगावी विकासाची नवी दृष्टी रुजवण्यासाठी राज्य शासनाने ‘सरपंच संवाद’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व सरपंचांशी थेट संवाद साधणार आहेत. याबाबतचे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेला शुक्रवारीच राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांनी आजपासून ‘सरपंच संवाद’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रमाची तयारी आदेशानुसार सुरू केली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनाेज रानडे, यांनी स्वतः उपस्थित राहूनजिल्ह्यातील सर्व ४३१ ग्राम पंचायतींच्या सरपंचांपर्यंत माहिती पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. या संवादात सहभागासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) शी सल्लामसलत करून प्रशिक्षण घेतलेल्या एक किंवा दोन सरपंचांची निवड करण्यात येणार आहे. त्यांना जिल्हा परिषद ठाणे यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील सरपंचांना प्रस्थापित केलेल्या कामाबद्दल राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर मते मांडण्याची अभूतपूर्व संधी डिजिटल, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध झाली आहे.

या कार्यक्रमाच्या संरचनेनुसार ‘क्यूसीआय’द्वारे दिलेल्या सरपंच संवाद प्रशिक्षणाचा उद्देश आणि त्यातून ग्रामविकासात निर्माण होणाऱ्या सकारात्मक बदलांची चर्चा होणार आहे. राज्यातील सहा महसूल विभागांमधील निवडलेल्या सरपंचांचे एक ते दोन मिनिटांचे अभिप्राय मुख्यमंत्र्यांना थेट सादर केले जातील. ठाणे जिल्ह्यातील निवडलेल्या सरपंचांचे नाव क्यूसीआय मार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's 'Sarpanch Samvad': Opportunity to Interact with Chief Minister

Web Summary : Maharashtra launches 'Sarpanch Samvad,' enabling direct interaction between village heads and the Chief Minister. Thane district prepares for this initiative, selecting representatives to share insights and contribute to rural development via digital platforms.