शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

भाजपाच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:09 IST

पक्षश्रेष्ठींना होती पराभवाची चाहूल; दिग्गजांचे पक्षप्रवेश ठेवले रोखून

- अनिकेत घमंडी डोंबिवली : धुळे, जळगाव, अहमदनगर येथील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले असतानाही त्याचा जल्लोष साजरा न करता, पाच राज्यांचे निकाल येईपर्यंत संयम ठेवण्याच्या सूचना कल्याण डोंबिवलीत पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बाजी मारल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाला उधाण आले; तर भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रचंड सन्नाटा पसरला होता.भाजपाच्या कल्याण जिल्हा स्तरावरील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता; परंतू राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावध पवित्रा घेत मंगळवारनंतर बघू, असे संकेत दिले होते. त्यामुळे रविवारच्या विश्व हिंदू परिषदेच्या निमित्ताने भाजपात होणारे अन्य पक्षांमधील प्रवेश काही काळ पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार भाजपाला यश मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे दिग्गजांना प्रवेश देऊन आधीच्या कार्यकर्त्यांना नाराज करु नये, अशी भूमिका राज्यमंत्र्यांसह त्यांच्या सहकारी आमदारांनी घेतली होती. पक्षप्रवेश करुन घेताना आयात नेत्यांना आश्वासने दिल्यास जुने कार्यकर्ते नाराज होतील. परिणामी पाच राज्यांच्या निकालानंतर पक्षात फूट पडू नये, यासाठी हे पक्षप्रवेश लांबवल्याचेही सूत्रांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत पक्ष फूटू नये, यासाठी त्यात्या ठिकाणच्या पक्षश्रेष्ठींना काळजी घेण्याचे संकेत उच्चस्तरावरुन देण्यात आले होते. पक्षामध्ये नव्यांना संधी दिली, पदे दिली, तर जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढावू शकते.अशातच मतदारांनी काँग्रेसच्या बाजुने कौल दिला आणि त्यानंतर लगेचच पक्षात फूट पडली तर ती पोकळी भरुन काढताना, जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करतांना नाकी नऊ येऊ शकतात, हे हेरुन प्रवेश लांबवण्यात आले. बदलापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आदीसह विविध भागांमधील घटक पक्षांच्या मातब्बरांचे प्रतिनिधी भाजपामध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मात्र मंगळवारच्या निकालानंतर आता हे प्रवेश पुन्हा कधी करायचे, हे सध्यातरी गुलदस्त्यात ठेवण्यात आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्र्रेस आणि मनसेमधीलही काही पदाधिकारी भाजपाच्या म्हणजेच आमदार व राज्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.काँग्रेसच्या विजयानंतर सोशल मीडियावर अंधभक्तांना उद्देशून अनेक संदेशांचा पाऊस पडला. भाजपाने केलेल्या मनमानी कारभाराचे वाभाडेही काढण्यात आले. त्यावर भक्तांनी काहीही बोलणे टाळले; पण विरोधकांनी ती संधीही न सोडता ‘इतना सन्नाटा क्यो है भाई’ असे म्हणत भक्तांवर शाब्दिक झोड घेतली. बालेकिल्ल्यातील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र यावेळी मौन बाळगल्याचे निदर्शनास आले.२५ डिसेंबर रोजी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. त्यादरम्यान काहींना प्रवेश दिला जाऊ शकतो. मात्र मंगळवारी पराभव चाखल्यानंतर इतर पक्षांमधील पदाधिकाºयांना पक्षात घेण्याचा निर्णय घ्यायचा की नाराज कार्यकर्त्यांनाच उभारी देऊन पक्षामध्ये एकजूट कायम ठेवायची, हा मोठा पेच कल्याण, ठाणे जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींसमोर आहे. त्यामुळे कुणाला पक्षप्रवेश देण्यापेक्षा कमकुवत कार्यकर्त्यांना वेळीच समज द्यावी आणि अन्य राज्यांतील पराभवाची जखम भरल्यानंतर आत्मविश्वास वाढवण्यासाठी, पक्ष स्थानिक पातळीवर बळकट करण्यासाठी सध्या थांबवलेले प्रवेश सोहळे आटोपून घ्यायचे, अशी रणनीती ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालthaneठाणेcongressकाँग्रेसBJPभाजपा