शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सत्ताधारी-विरोधकांचे मनोमीलन? युतीच्या घोषणेमुळे काँग्रेस एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 04:13 IST

मीरा-भार्इंदर महापालिका : भाजपा-सेना युतीमुळे सत्तेचा समतोल बिघडला, काँग्रेस एकाकी

राजू काळे।

भार्इंदर : येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा व शिवसेना या मित्रपक्षांनी एकत्रित लढवण्याची घोषणा केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेत जेथे भाजपा हा सत्ताधारी तर शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष आहे तेथील स्थानिक राजकारणात या दिलजमाईचे परिणाम लवकरच दिसून येण्याची चिन्हे आहेत. अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरुन एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आता हातात हात गुंफून प्रचार करायला लागणार असल्याने या दोन शहरांत काँग्रेसला एकाकी झुंज द्यावी लागणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.

केंद्रासह राज्य सरकारात भाजपासोबत असलेल्या शिवसेनेने गेल्या काही दिवसांत अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन परस्परांवर हल्ले सुरु केल्यानंतर मीरा-भाईंदर या महापालिकेत जेथे हे दोन्ही पक्ष सत्ताधारी व विरोधक आहेत तेथे उभयतांमधील संघर्ष अधिकच प्रखर झाला होता. अचानक परस्परविरोध व आक्रमक भाषा गुंडाळून भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहीर केल्याने मीरा-भाईंदरमधील राजकारणाचा समतोलच बिघडला आहे. २०१७ मधील मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत व तद्नंतर सतत एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या भाजपा व शिवसेनेत समझोता होणार असल्याचे सूतोवाच शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात केले होते. दोन्ही पक्षांची युती झाल्याने यापुढे भाजपाचे आ. नरेंद्र मेहता व शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांनी आपापसातील वादविवाद विसरुन काम करावे लागणार आहे.पालिका निवडणुकीत भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरल्याने पालिकेची सत्ता भाजपाच्या हाती आली तर शिवसेना विरोधी पक्ष झाली. भाजपाने हक्काच्या पदांसाठी तसेच आवश्यक दालनासाठी शिवसेनेला झुलत ठेवले. शिवसेनेची गळचेपी केल्याने स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये खुन्नस निर्माण झाली आहे. भाजपाने काही विकासकामे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात करण्याचा प्रयत्न केला.अर्थातच त्याला शिवसेनेने जोरदार विरोध करुन ती कामे रखडवली. जलकुंभ लोकार्पणावरुन उभय पक्षांमध्ये झालेला राडा असो की शिक्षणासाठी राखीव असलेल्या भूखंडावर बाजार थाटण्याचा प्रकार. शिवसेनेनी भाजपाला रोकठोक उत्तर दिले. आता युतीनंतर भाजपाच्या त्याच विकास कामांवर मते मागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.काँग्रेस मात्र एकाकी पडली आहे. सत्ताधारी भाजपा व शिवसेनेच्या एकत्रित ताकदीशी काँग्रेसला दोन हात करावे लागणार आहेत.भाजपाने शहराच्या हितासाठी आणलेल्या विषयांना शिवसेना नक्कीच पाठिंबा देईल. शहराच्या हितासाठी नसलेल्या पण स्वार्थासाठी आणलेल्या विषयांना शिवसेना सभागृहात तसेच सभागृहाबाहेर कायम विरोधच करील.- प्रताप सरनाईक,आमदार, शिवसेनायुतीमुळे भाजपाच्या सबका साथ, सबका विकास धोरणाला शिवसेना सहकार्य करुन स्थानिक पातळीवर युती धर्म पाळेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने भाजपाला सहकार्य केल्यास शहराचा विकास सहज होईल.- चंद्रकांत वैती, उपमहापौर,मीरा-भाईंदरयुती धर्म पाळण्यासाठी विरोधी पक्षातील शिवसेनेने भाजपाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस विरोधकांची भूमिका वठवेल. शहराच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध असल्याने काँग्रेस कधीच एकाकी पडली नाही व पडणारही नाही. यंदाची युती ही केवळ आगामी निवडणुकांतील अ‍ॅडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुन्हा दोघांत धुसफूस सुरूच राहणार आहे.- जुबेर इनामदार, काँग्रेस गटनेता

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे