शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सत्ताधारी भाजपावर ओढवली नामुश्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:34 IST

मीरा-भार्इंदरच्या विकास आराखड्यातील आरक्षण जागेवर कार्यक्र म, व्यवसाय करणाऱ्या जमीनमालक व संबंधित व्यक्तींना भाडे, दंड तसेच करआकारणी करण्याचा ठराव चार महिन्यांपूर्वी भाजपाने केला होता. परंतु, प्रशासनाने भाडे व करआकारणी केली तर आरक्षणाच्या जमिनी जागामालक देणार नाहीत, असे स्पष्ट केल्याने अवघ्या चार महिन्यांत ठरावावर फेरविचाराची नामुश्की सत्ताधारी भाजपावर ओढवली आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या विकास आराखड्यातील आरक्षण जागेवर कार्यक्र म, व्यवसाय करणाऱ्या जमीनमालक व संबंधित व्यक्तींना भाडे, दंड तसेच करआकारणी करण्याचा ठराव चार महिन्यांपूर्वी भाजपाने केला होता. परंतु, प्रशासनाने भाडे व करआकारणी केली तर आरक्षणाच्या जमिनी जागामालक देणार नाहीत, असे स्पष्ट केल्याने अवघ्या चार महिन्यांत ठरावावर फेरविचाराची नामुश्की सत्ताधारी भाजपावर ओढवली आहे.शहराच्या विकास आराखड्यातील आरक्षण असलेल्या जागा ताब्यात घेऊन विकसित करण्यात पालिका सपशेल अपयशी ठरली आहे. तर, आरक्षण असल्याने जमीनमालक वा अधिकारपत्रधारकालाही जागेचा मोबदला मिळत नाही, तर जागेवर काही कामही करता येत नसल्याने कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे काही आरक्षित जागा कार्यक्र मासाठी भाड्याने दिल्या जातात. तर, काही जागांवर नर्सरी, मार्बल, भंगार, फर्निचर असे व्यवसाय चालवले जातात. काहींनी गॅरेज, वाहने पार्किंगसाठी भाड्याने जागा दिल्या आहेत. परंतु, ८ डिसेंबर २०१७ च्या महासभेत प्रशासनाचा गोषवारा नसताना सत्ताधारी भाजपाने आरक्षणाच्या जागेत कार्यक्र म, व्यवसाय करणाºयांसाठी भाडे व करआकारणीचा ठराव मंजूर केला होता.ठरावात कार्यक्र मासाठी परवानगी घेतल्यास रोज १० हजार, तर परवानगी न घेतल्यास प्रतिदिवशी ३० हजार दंडासह परवानगी शुल्क आकारले जाण्याचे मंजूर केले होते. त्याशिवाय,परवानगी घेऊन व्यवसाय केल्यास प्रतिचौरसफूट १ रु पया किंवा करआकारणी न करताच व्यवसाय चालू असेल, तर प्रतिचौरसफूट ३ रु पये याप्रमाणे मालमत्ताकर आकारण्याचेदेखील मंजूर केले होते. त्यावेळी राजकीय व व्यावसायिक विरोधकांचे उट्टे काढण्यासह अर्थपूर्ण हेतूने सत्ताधारी यांनी मनमानीपणे व कुठलाही कायदेशीर आधार नसताना ठराव केल्याचा आरोप विरोधी पक्षासह काही संघटनांनी केला होता.या ठरावामुळे उत्पन्नात वाढ होईल, असा गाजावाजा भाजपाने केला होता. परंतु, आता अवघ्या ४ महिन्यांत हा ठराव रद्द करण्याची वेळ भाजपावर आली आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव १८ एप्र्रिलच्या महासभेत सादर होणार आहे. ज्या आरक्षित जागांवर मार्बल,नर्सरी व अन्य व्यावसायिक कारणांसाठी होत असेल त्यांनासुद्धा करआकारणी व दंडात्मक शुल्क आकारण्याची तरतूद या ठरावामध्ये होती. परंतु, असे काय घडले की, हा ठरावच रद्द करण्याची वेळ भाजपावर यावी, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी केला आहे.कोणतेही विषय प्रशासनाला द्यायचे, गोषवारा नसला तरी ठराव करायचे, प्रशासनाने दिलेल्या विषयाच्या किंवा गोषवाºयाच्या वेगळेच ठराव करायचे, अशा संशयास्पद गैरप्रकारांमुळे शहराचे नुकसान होत आहे. भाजपाचे स्थानिक नेतृत्व व त्यांचे नगरसेवक जनहिताचा विचार न करता कसेही ठराव करत असल्याने त्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण झाल्याचे सावंत म्हणाले. बरेच ठराव आयुक्तांनी रद्द करण्यासाठी सरकारकडे पाठवले आहे.आमची आढावा बैठक होईल, तेव्हा या विषयावर आमची भूमिका स्पष्ट करू. पण असे ऊठसूठ आरोप करण्यापेक्षा सक्षम प्राधिकरणाकडे तक्र ार करावी. - रोहिदास पाटील, सभागृह नेते

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा