शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या ‘समृद्धी’साठी नियमांत झाला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:41 IST

मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाचा फटका बसणा-या आणि एमएमआरडीए क्षेत्रात असल्याने कमी मोबदला मिळणा-या कल्याण आणि भिवंडी ग्रामीणमधील गावांना पाचपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कल्याण : मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाचा फटका बसणा-या आणि एमएमआरडीए क्षेत्रात असल्याने कमी मोबदला मिळणा-या कल्याण आणि भिवंडी ग्रामीणमधील गावांना पाचपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या अलीकडच्याच निर्णयाने प्रकल्पातील अडथळे दूर होतील आणि विरोध कमी होईल, असा विश्वास लोकप्रतिनिधींना वाटतो. तसेच जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीतही शेतकºयांचा रोष कमी होईल, असे मानले जाते.समृद्धी मार्गात कल्याण तालुक्यातील फळेगाव, उशीद, दानबाव, नडगाव, पितांबरे पाडा, निंबवली, गुरवली, चिंचवली, राया, वासुंद्री या दहा गावातील ७०० शेतकºयांची जमीन जाणार आहे. या शेतकºयांचे सामायिक क्षेत्र खातेदार पकडल्यास हा आकडा तीन हजारांच्या घरात जातो. प्रकल्पासाठी ११९४.४ हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. ही गावे मुरबाड मतदारसंघात येत असल्याने भाजपाचे आ. किसन कथोरे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला. बाधित गावे ही एमएमआरडीए कार्यक्षेत्रात येत असल्याने त्यांना मिळणारा जमिनीचा मोबदला अत्यल्प होता. अन्य ठिकाणी जमीन संपादनासाठी जो नियम लागू केला जातो, त्याचा विचार करून या शेतकºयांनाही भरीव मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ती विचारात घेऊन सरकारने वन, अर्थ आणि नगररचना विभागाच्या सचिवांची समिती स्थापन केली. तिच्या सूचनेनुसार मंत्रीमंडळाच्या बैठकीत एमएमआरडीए क्षेत्रातील गावांनाही अन्य क्षेत्राचाच दर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि सरकारने २७ नोव्हेंबरला त्याची अधिसूचना काढली. त्यामुळे आता या गावातील शेतकºयांना, जागा मालकांना पाचपट अधिक दर मिळणार आहे.या निर्णयाबाबत आ. किसन कथोरे यांनी सांगितले, या निर्णयाचा उपयोग समृद्धी मार्गासाठी होणार आहे. कल्याण तालुक्यातील दहा गावातील प्रकल्पबाधित शेतकºयांना त्याचा फायदा होईलच; तर भिवंडी तालुक्यातील बाधित गावांनाही हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर बडोदा एक्सप्रेस वे सुद्धा एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातून जातो. हे तिन्ही प्रकल्प मुरबाड मतदारसंघाशी निगडीत असल्याने त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला.अन्य प्राधिकरणांना लाभहा निर्णय एमएमआरडीएप्रमाणेच पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, पिंपरी- चिंचवड, नवनगर विकास प्राधिकरण, सिडको, नागपूर सुधार न्यास यांनाही लागू होईल. त्यामुळे विशेष व क्षेत्र प्राधिकरणामधील प्रकल्पासाठी लागणाºया जागेसाठी भूसंपादनातील अडथळा दूर होतील. प्राधिकरणांच्या हद्दीतील विविध प्रकल्पांचे भूसंपादन जलद गतीने होईल.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार