शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतक-यांच्या ‘समृद्धी’साठी नियमांत झाला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:41 IST

मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाचा फटका बसणा-या आणि एमएमआरडीए क्षेत्रात असल्याने कमी मोबदला मिळणा-या कल्याण आणि भिवंडी ग्रामीणमधील गावांना पाचपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कल्याण : मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाचा फटका बसणा-या आणि एमएमआरडीए क्षेत्रात असल्याने कमी मोबदला मिळणा-या कल्याण आणि भिवंडी ग्रामीणमधील गावांना पाचपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या अलीकडच्याच निर्णयाने प्रकल्पातील अडथळे दूर होतील आणि विरोध कमी होईल, असा विश्वास लोकप्रतिनिधींना वाटतो. तसेच जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीतही शेतकºयांचा रोष कमी होईल, असे मानले जाते.समृद्धी मार्गात कल्याण तालुक्यातील फळेगाव, उशीद, दानबाव, नडगाव, पितांबरे पाडा, निंबवली, गुरवली, चिंचवली, राया, वासुंद्री या दहा गावातील ७०० शेतकºयांची जमीन जाणार आहे. या शेतकºयांचे सामायिक क्षेत्र खातेदार पकडल्यास हा आकडा तीन हजारांच्या घरात जातो. प्रकल्पासाठी ११९४.४ हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. ही गावे मुरबाड मतदारसंघात येत असल्याने भाजपाचे आ. किसन कथोरे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला. बाधित गावे ही एमएमआरडीए कार्यक्षेत्रात येत असल्याने त्यांना मिळणारा जमिनीचा मोबदला अत्यल्प होता. अन्य ठिकाणी जमीन संपादनासाठी जो नियम लागू केला जातो, त्याचा विचार करून या शेतकºयांनाही भरीव मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ती विचारात घेऊन सरकारने वन, अर्थ आणि नगररचना विभागाच्या सचिवांची समिती स्थापन केली. तिच्या सूचनेनुसार मंत्रीमंडळाच्या बैठकीत एमएमआरडीए क्षेत्रातील गावांनाही अन्य क्षेत्राचाच दर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि सरकारने २७ नोव्हेंबरला त्याची अधिसूचना काढली. त्यामुळे आता या गावातील शेतकºयांना, जागा मालकांना पाचपट अधिक दर मिळणार आहे.या निर्णयाबाबत आ. किसन कथोरे यांनी सांगितले, या निर्णयाचा उपयोग समृद्धी मार्गासाठी होणार आहे. कल्याण तालुक्यातील दहा गावातील प्रकल्पबाधित शेतकºयांना त्याचा फायदा होईलच; तर भिवंडी तालुक्यातील बाधित गावांनाही हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर बडोदा एक्सप्रेस वे सुद्धा एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातून जातो. हे तिन्ही प्रकल्प मुरबाड मतदारसंघाशी निगडीत असल्याने त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला.अन्य प्राधिकरणांना लाभहा निर्णय एमएमआरडीएप्रमाणेच पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, पिंपरी- चिंचवड, नवनगर विकास प्राधिकरण, सिडको, नागपूर सुधार न्यास यांनाही लागू होईल. त्यामुळे विशेष व क्षेत्र प्राधिकरणामधील प्रकल्पासाठी लागणाºया जागेसाठी भूसंपादनातील अडथळा दूर होतील. प्राधिकरणांच्या हद्दीतील विविध प्रकल्पांचे भूसंपादन जलद गतीने होईल.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार