शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मीरा भार्इंदरमध्ये आरटीओचे शिबिर कार्यालय पाच दिवस राहणार

By जितेंद्र कालेकर | Published: December 03, 2020 5:12 PM

आठवडयातून पाच दिवस मीरा भार्इंदर येथे आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु केले जावे, अशी स्थानिक रहिवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर यापुढे मीरा भार्इंदर याठिकाणी पाच दिवस आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी दिली.

ठळक मुद्दे ठाण्यापर्यंत अनुज्ञप्तीसाठी येण्याचा त्रास वाचणारवाहन चालकांची होणार सोय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मीरा भार्इंदर महापालिका क्षेत्रात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे केवळ तीन दिवसांचे शिबिर कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. ते यापुढे आठवडयातून पाच दिवस सुरु राहणार असल्याची माहिती ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी दिली.तब्बल २० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मीरा भार्इंदर येथील नागरिकांना वाहन परवाना किंवा शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) तसेच पक्के अनुज्ञप्ती काढण्यासाठी थेट ठाणे गाठावे लागत होते. घोडबंदर रोडने ठाण्यात येतांना या वाहन धारकांना मोठया वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागत असल्यामुळे अनेकांचा यात मोठा वेळ खर्ची होत होता. त्यामुळेच आठवडयातून पाच दिवस मीरा भार्इंदर येथे आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु केले जावे, अशी स्थानिक रहिवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. याच मागणीचा पाठपुरावा ओवळा माजीवडा येथील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही राज्य शासनाकडे तसेच ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड यांच्याकडे केली होती. याच मागणीची दखल घेऊन आता आठवडयातील पाच दिवस आरटीओचे हे शिबिर कार्यालय मीरा भार्इंदर येथे १ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. हे कार्यालय घोडबंदर रोडवरील घोडबंदर व्हिलेज, मीरा भार्इंदर बस डेपो, मीरा रोड पूर्व याठिकाणी सुरु राहणार आहे. या शिबिर कार्यालयामुळे मीरा भार्इंदर भागातून केवळ अनुज्ञप्ती काढण्यासाठी ठाण्याकडे येणाऱ्या वाहन धारकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. शिवाय, अनुज्ञप्तीचा कोटाही वाढविण्यात आल्यामुळे शिकाऊ अनुज्ञप्ती घेणाऱ्यांनाही चाचणी देण्याची वेळ लवकर दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेRto officeआरटीओ ऑफीस