शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

मनमानी लूटप्रकरणी डोंबिवलीत आरटीओची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 10:05 IST

आरटीओचे सकाळपासूनच पथक शहरात आल्याने भाडेवाढ घ्यायची की नाही या संभ्रमात रिक्षा चालक होते. त्यावर जादाचे भाडे घेतले तर दंडात्मक कारवाई होणारच असे आरटीओ मोटार वाहन निरिक्षक राजेश परदेशी यांनी स्पष्ट केले.

डोंबिवली - इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या रिक्षा चालकांना आरटीओकडे वेळोवेळी दरवाढ मागूनही वाढ मिळत नसल्याने स्वत:हूनच दोन रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय डोंबिवलीमध्ये आदर्श रिक्षा चालक मालक संघटना, तसेच अन्य संघटनेने घेतला होता. त्या परस्पर निर्णयाची कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत बुधवारी नोटीस बजावल्या आणि गुरुवारी पहाटेच रामनगर रिक्षा स्टँडजवळ धडक कारवाई केली.

आरटीओचे सकाळपासूनच पथक शहरात आल्याने भाडेवाढ घ्यायची की नाही या संभ्रमात रिक्षा चालक होते. त्यावर जादाचे भाडे घेतले तर दंडात्मक कारवाई होणारच असे आरटीओ मोटार वाहन निरिक्षक राजेश परदेशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काही काळ रिक्षा चालकांचीही भंबेरी उडाली होती. प्रवाशांनीही जादाचे भाडे न देण्याचे सांगत रिक्षा चालकांनाही नियमाप्रमाणेच वागण्याचे आदेश आरटीओ अधिकाऱ्यांनी दिले. तसेच आदर्श रिक्षा चालक मालक संघटनेने जे दरवाढीचे फलक लावले होते ते तातडीने काढण्यास सांगितले. त्यानूसार काढलेले फलक रामनगर पोलिसांकडे जमा करण्यात आले. त्यापुढेही जर नियमांचे उल्लंघन करून भाडेवाढ आकारण्यात आली तर मात्र कठोर कारवाईचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिले होते. त्यामुळे शहरात सकाळपासूनच विविध रिक्षा स्टँडवर आरटीओची करडी नजर होती. प्रवाशांना कुठेही त्रास होऊ नये यासाठी आरटीओचे पथक पहाटेपासूनच दक्ष होते. त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. या कारवाईला डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रक विभागाचे अधिकारी एम.एच.जाधव यांनीही पुढाकार घेत वाहतूकीवर परिणाम होऊ देऊ नका अशी तंबी रिक्षा चालकांना दिली होती.

दरम्यान लाल बावटा रिक्षा संघटनेचे संस्थापक काळू कोमास्कर, आणि आदर्श रिक्षा चालक मालक संघटनेला आरटीओ अधिकारी ससाणे यांनी बुधवारी नोटीस बजावत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संघटनांची राहील असे आदेशात केले होते. त्याची दखल घेत काही ठिकाणचे फलक संघटनांनी रातोरात काढले होते, रामनगर येथील फलक मात्र तसाच असल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत तो काढण्यास सांगितला.

दरवाढीची त्यांची मागणी एमएमआरटीएकडे पाठवली. त्यावर दोन बैठका झाल्या असून निर्णय प्रतिक्षेत आहे. त्यामुळे असा मनमानी कारभार करून जनतेला कोणालाही वेठीस धरता येणार नाही. मागणी पुन्हा मांडायची असेल तर बैठकीसाठी यावे, चर्चा करावी असे आवाहन ससाणे यांनी केले होते. त्यानूसार संबंधित संघटनांच्या पदाधिका-यांना समज देण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी आरटीओ अधिकाऱ्यांनी बोलावल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीRto officeआरटीओ ऑफीसkalyanकल्याण