शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलच्या तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची उधळपट्टी, मनसेने केला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 16:45 IST

संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलच्या तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची उधळपट्टी केल्याचा आरोप करत मनसेने केला महापौरांचा निषेध केला आहे. 

ठळक मुद्देमनसेने केला महापौरांचा निषेधस्कृती आर्टस् फेस्टिव्हलच्या तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची उधळपट्टी :मनसेआधी शैक्षणिक गरजा पुर्ण करा :  संदीप पाचंगे

ठाणे: मुंबई विद्यापिठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिका आयुक्तांनी 20 कोटीदेण्याची घोषणा केलेली असताना ठाणे महापौरांनी त्यास विरोध केला आहे. मात्र, आता त्यांच्याच स्वपक्षाच्या आमदाराने संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलसाठी उपवन तलावात तयार करण्यात येणाऱया तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे असा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणात महापौरांनी मौन बाळगले असून ठाणे जिह्यातीलविद्यार्थ्यांच्या हितासाठी आयुक्तांनी दिलेल्या निधीला विरोध करणाऱया महापौरांचा मनसेने निषेध केला आहे. 

ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याचा त्रास वाचावा व ठाणेकर विद्यार्थ्यांना विद्यापिठ उपकेंद्रात नवनवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास करता यावा, चांगल्या सुविधाउपकेंद्रात मिळाव्यात या उदात्त हेतूने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वालयांनी उपकेंद्रासाठी 20 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या निधीला ठाणेमहापौरांनी विरोध केला होता. आता संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट ने आपल्यासांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपवन तलावात तरंगता रंगमंच बांधण्यासाठी 10 कोटींचीलेखी मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमावर10 कोटीची उधळपट्टी केलेली महापौरांना चालते मात्र विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्नअसलेल्या विद्यापिठाला निधी देण्यास महापौरांचा आक्षेप आहे. या अगोदरही ठाण्यातबॉलीवूड पार्क, थीम पार्क, सुगंधी झाडे इत्यादी कल्पक तसेच आकर्षक प्रकल्पांच्यानावाखाली भ्रष्टाचार झालेला आहेच त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना याचीकाळजी घेण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, असा सवाल मनविसेचे ठाणेजिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. उपवन तलावातील माशांच्या अस्तित्वाला या रंगमंचामुळे काही धोका नाही याचीखात्री केली आहे का? आयुक्त व महापौर यांच्यातील संघर्षामुळे ठाणेकरांची करमणूकहोतेच आहे. तरी मुंबई विद्यापिठ उपकेंद्रासाठी दिलेला निधी ठाणे जिह्यातीलविद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. आधी शैक्षणिक गरजा पुर्ण करा त्यानंतरकरमणुकीसाठी नवनवीन प्रयोग करा, असा सल्लाही मनविसेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेPoliticsराजकारण