शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलच्या तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची उधळपट्टी, मनसेने केला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 16:45 IST

संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलच्या तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची उधळपट्टी केल्याचा आरोप करत मनसेने केला महापौरांचा निषेध केला आहे. 

ठळक मुद्देमनसेने केला महापौरांचा निषेधस्कृती आर्टस् फेस्टिव्हलच्या तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची उधळपट्टी :मनसेआधी शैक्षणिक गरजा पुर्ण करा :  संदीप पाचंगे

ठाणे: मुंबई विद्यापिठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिका आयुक्तांनी 20 कोटीदेण्याची घोषणा केलेली असताना ठाणे महापौरांनी त्यास विरोध केला आहे. मात्र, आता त्यांच्याच स्वपक्षाच्या आमदाराने संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलसाठी उपवन तलावात तयार करण्यात येणाऱया तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे असा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणात महापौरांनी मौन बाळगले असून ठाणे जिह्यातीलविद्यार्थ्यांच्या हितासाठी आयुक्तांनी दिलेल्या निधीला विरोध करणाऱया महापौरांचा मनसेने निषेध केला आहे. 

ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याचा त्रास वाचावा व ठाणेकर विद्यार्थ्यांना विद्यापिठ उपकेंद्रात नवनवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास करता यावा, चांगल्या सुविधाउपकेंद्रात मिळाव्यात या उदात्त हेतूने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वालयांनी उपकेंद्रासाठी 20 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या निधीला ठाणेमहापौरांनी विरोध केला होता. आता संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट ने आपल्यासांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपवन तलावात तरंगता रंगमंच बांधण्यासाठी 10 कोटींचीलेखी मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमावर10 कोटीची उधळपट्टी केलेली महापौरांना चालते मात्र विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्नअसलेल्या विद्यापिठाला निधी देण्यास महापौरांचा आक्षेप आहे. या अगोदरही ठाण्यातबॉलीवूड पार्क, थीम पार्क, सुगंधी झाडे इत्यादी कल्पक तसेच आकर्षक प्रकल्पांच्यानावाखाली भ्रष्टाचार झालेला आहेच त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना याचीकाळजी घेण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, असा सवाल मनविसेचे ठाणेजिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. उपवन तलावातील माशांच्या अस्तित्वाला या रंगमंचामुळे काही धोका नाही याचीखात्री केली आहे का? आयुक्त व महापौर यांच्यातील संघर्षामुळे ठाणेकरांची करमणूकहोतेच आहे. तरी मुंबई विद्यापिठ उपकेंद्रासाठी दिलेला निधी ठाणे जिह्यातीलविद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. आधी शैक्षणिक गरजा पुर्ण करा त्यानंतरकरमणुकीसाठी नवनवीन प्रयोग करा, असा सल्लाही मनविसेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेPoliticsराजकारण