शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

औद्योगिक परिसरातील वाट खडतर, काँक्रिटच्या रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 11:48 PM

काँक्रिटच्या रस्त्यांची दुर्दशा : मालाच्या नुकसानीमुळे डोंबिवलीतील कारखानदार त्रस्त

डोंबिवली : शहरातील औद्योगिक निवासी परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली असताना कारखान्यांच्या आवारातील रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. बहुतांश रस्ते काँक्रिटचे आहेत. परंतु, पेव्हरब्लॉक खचल्याने तसेच काँक्रिटच न राहिल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. कारखान्यांमधील तयार झालेल्या मालाची या रस्त्याने वाहतूक करताना त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कारखानदार त्रस्त झाले आहेत.

केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर १ जून २०१५ ला २७ गावांचा औद्योगिक परिसरासह महापालिकेत समावेश झाला. परंतु, येथील नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? यावरून केडीएमसी व एमआयडीसी प्रशासनात मतभेद आहेत. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या प्रवृत्तीमुळे औद्योगिक भागातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे.निवासी विभागातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. कचराही वेळेत उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचून स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर ठिकठिकाणी पाण्याची डबकी निर्माण होत आहेत. परिणामी, घराघरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचे नुकसान झाल्याचेही यंदाच्या पावसाळ्यात पाहायला मिळाले. त्याचबरोबर औद्योगिक परिसरातील कारखान्यांच्या भोवतालचे रस्तेही सुस्थितीत नाहीत. या भागात सुमारे ४५० कारखाने आहेत. कारखान्यांच्या परिसरातील बहुतांश रस्ते हे काँक्रिटचे आहेत. परंतु, काही ठिकाणी पेव्हरब्लॉकचा वापरही करण्यात आला आहे. मात्र, हे पेव्हरब्लॉक कारखान्यांमध्ये अवजड वाहनांमुळे पूर्णपणे खचलेले आणि तुटलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांमध्ये मोठी डबकी निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यातून वाहन नेताना वाहनचालकांची कसरत होत असून दुचाकी अडकून पडल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत.दुसरीकडे काँक्रिटच्या रस्त्याला लागून असलेले डांबरी रस्तेही खचले आहेत. दोघांच्या पातळीत उंचसखल भाग झाल्याने याठिकाणीही वाहने जोरदार आदळत आहेत.रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. रस्त्यावरील डांबरही निघून गेल्याने धुळीचा त्रासही चालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने हे चित्र औद्योगिक कारखान्यांलगतच्या सर्व्हिस रोडवर पाहायला मिळते.मुख्यमंत्र्यांनाहीदिले पत्ररस्त्यांच्या दुरवस्थेबाबत एमआयडीसी, केडीएमसी यांच्याशी पत्रव्यवहार केले आहेत. याप्रकरणी उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्रे पाठविली आहेत. परंतु, अद्यापही रस्त्यांची सुधारणा झालेली नाही. या खड्डेमय रस्त्यांमुळे मालाचेही मोठे नुकसान होत आहे. या रस्त्यांवरून शाळेच्या बसही जात असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षाही धोक्यात आली आहे, असे कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले.रस्त्यावर पसरलेल्या सांडपाण्यातून करावी लागली येजाऔद्योगिक निवासी भागातील सर्व्हिस रोडवर सांडपाणी वाहून नेणारे गटार तुंबल्याने तेथील रस्त्याच्या बहुतांश भागात सांडपाणी साचले होते. अन्य पर्याय नसल्याने गेले दोन दिवस या घाणेरड्या पाण्यातून वाहनचालक आणि पादचारी ये-जा करीत होते. दरम्यान, सोमवारी दुपारी गटार साफसफाईचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू करण्यात आले होते. येथील लगतच्या रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण केली असताना सांडपाण्यातून वाट काढणे स्थानिकांसाठी जिकिरीचे होऊन बसले होते. 

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी