शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ठाणे, पालघर, रायगडमध्ये रस्त्यांची दुरवस्था, खड्डे असूनही टोलवसुली दोन्ही जिल्ह्यांत सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 01:06 IST

गणपतीबाप्पांचे खड्ड्यांतून आगमन झाले व त्यांना निरोप देतानाही रस्त्यांना खड्डे होते. आता नवरात्रोत्सवात देवीचे आगमनही खड्ड्यांतून होणार आहे.

ठाणे : गणपतीबाप्पांचे खड्ड्यांतून आगमन झाले व त्यांना निरोप देतानाही रस्त्यांना खड्डे होते. आता नवरात्रोत्सवात देवीचे आगमनही खड्ड्यांतून होणार आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणे आणि पालघर व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तिन्ही जिल्ह्यांमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे १० दिवसांच्या आत बुजवण्याचे आदेश दिले होते. अन्यथा टोल वसुली बंद केली जाईल असेही स्पष्ट केले होते. आज ही दहा दिवसांची मुदत उलटून गेली असतांनाही या परिसरातील खड्डे तसेच आहेत आणि टोल वसुलीही सुरु असल्याने पालकमंत्र्यांचे आदेश हवेत विरले का, असा सवाल खड्ड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी उपस्थित करीत आहेत.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे ठाण्यासह, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर टीका झाली. सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच रायगड व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत नवरात्रोत्सवापूर्वी हे सर्व खड्डे बुजवले जावेत, असे आदेश संबधींत यंत्रणांना देण्यात आले होते.रविवारपासून नवरात्रोत्सव सुरु होणार असून देवींचे आगमन हे खड्ड्यांतून झाले आहे. ठाणे शहरातील सर्वच महत्त्वांच्या रस्त्यांवरील खड्डे आजही कायम आहेत. नितीन कंपनी, तीनहात नाका, मल्हार सिनेमा, पालिकेचे तीनही उड्डाणपूल, कापुरबावडी, घोडबंदर भागातील सेवा रस्ते आदींसह शहरातील इतर रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. कल्याण - डोंबिवली किंवा रायगड अथवा पालघर आदी भागांतील रस्त्यांचीही चाळण झाली आहे. काही ठिकाणी तात्पुरती ठिगळ लावण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने हे प्रयत्न धुवून गेले. १० दिवसांत खड्डे बुजवले नाही, तर टोल वसुली बंद करण्यात येईल असे जे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र हे दोघे पालकमंत्री आपल्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे खड्ड्यांमुळे त्रस्त मतदारांना सुखावण्याकरिता हे आश्वासन दिले होते का, असा सवाल केला जात आहे.निर्णय धाब्यावर?यापूर्वी जेव्हा जेव्हा सणासुदीला मुंबई बाहेर जाताना किंवा मुंबईकडे येताना टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागून प्रवासी कोंडीत अडकतील, तेव्हा पिवळ्या पट्ट्यापलिकडे वाहनांची रांग गेल्यास टोल न आकारता वाहने सोडण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी कधीच फारशी झाली नाही.टोलवसूल करणाºया कंपन्यांच्या दबावापोटी असे निर्णय अंमलात येत नाहीत. खड्ड्यांमुळे टोलवसूल न करण्याचा निर्णयही अशाच दबावापोटी धाब्यावर बसवला असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणेRaigadरायगडpalgharपालघर