शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तीन प्रवाशांना घेऊन डोंबिवलीत सर्रास वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 23:47 IST

रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेला इंदिरा गांधी चौकातून मानपाडा रस्त्यावर जाण्यासाठी पूर्वी शेअरपद्धतीने १८ ते २० रुपये आकारले जायचे. आता मात्र ३० रुपये आकारले जातात.

डोंबिवली : कोरोनाच्या कालावधीत रिक्षा प्रवासासाठी राज्य सरकारने परिवहन विभागामार्फत नियम, अटी घालून व्यवसायाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये रिक्षात शेअरपद्धतीने तीनऐवजी दोन प्रवासी असावेत, ही प्रमुख अट असून तो नियम धाब्यावर बसवून तीन वेळप्रसंगी चार प्रवासी घेऊन रिक्षा प्रवास सुरू असल्याचे डोंबिवलीत निदर्शनास येत आहे.

रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेला इंदिरा गांधी चौकातून मानपाडा रस्त्यावर जाण्यासाठी पूर्वी शेअरपद्धतीने १८ ते २० रुपये आकारले जायचे. आता मात्र ३० रुपये आकारले जातात. खरेतर, दोन प्रवासी घेऊन तिसऱ्या सीटचे भाडे विभागून घ्यावे, असे संकेत असतानाही रिक्षाचालक मात्र सर्रासपणे तीन सीट घेऊन तिघांकडून प्रतिप्रवासी ३० रुपये घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड पडत असून आरटीओने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. इंदिरा गांधी चौकातून पलावा येथे जाण्यासाठी पूर्वी २५ ते ३० रुपये घेतले जात होते. आता मात्र तीन प्रवाशांकडून प्रत्येकी ५० रुपये भाडे आकारले जात आहे. रिक्षाचालकांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्या कुटुंबीयांचे हाल सुरू असल्याची कैफियत चालकांनी मांडली, पण त्याचा फटका प्रवाशांना का? तेही सामान्य नागरिक असून त्यांनाही लॉकडाऊनचा फटका बसला आहेच, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

डोंबिवली जिमखाना येथून स्टेशनकडे येण्यासाठी लॉकडाऊनआधी स्वतंत्र रिक्षा केल्यास ३० रुपये आकारले जायचे. आता मात्र थेट ५० रुपये आकारण्यात येतात. कल्याण-शीळ रस्त्यावरून सुयोग हॉटेलसमोरून रिक्षा केल्यास शेअरपद्धतीने १५ रुपये घेण्यात येत होते. आता त्यात वाढ करण्यात आली असून दोनऐवजी तीन प्रवासी घेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिक हैराण असून कोरोना दूर होणार कसा, असा सवाल करत आहेत. स्वतंत्र रिक्षा केल्यास ३०, ५०, १०० रुपयेही घेतले जात आहेत. कल्याण येथे जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातून दोन सीट घेणे अपेक्षित असते, पण तसे होत नाही. अनेकदा तीन सीट घेतले जातात. त्या सगळ्यांकडून प्रत्येकी ५० रुपये आकारले जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. रिक्षाचालक मास्क लावून असतात, पण रिक्षात सॅनिटायझर वगैरे नसल्याचे निदर्शनास आले.मीटरप्रमाणे रिक्षा कुणीही चालवत नाही. आरटीओची कारवाई अनेक महिन्यांत झाली नाही, डोंबिवलीत लॉकडाऊनपासून आरटीओ अधिकारी आलेही नसल्याचे रिक्षाचालकांनीच सांगितले. त्यामुळे तक्रार, दाद कोणाकडे मागायची, असा सवाल प्रवाशांना पडला आहे.- संबंधित वृत्त/३प्रवाशांसाठी ताटकळत राहावे लागतेमुळात रिक्षा पाच महिने बंद होत्या. त्या कालावधीत रिक्षाचालकांचे हाल झाले असून अनेक जण कर्जबाजारी झाले. आता राज्य सरकारने रिक्षा व्यवसाय सुरू केला आहे, पण तरीही रेल्वे नसल्याने तो नावालाच आहे. कोणीही नागरिक पूर्वीसारखा घराबाहेर पडत नाही, त्यामुळे रिक्षा प्रवासाला चाप बसला आहे. अशा सर्व स्थितीत जरी दोन प्रवासी घ्यावेत, असे अपेक्षित असले तरी रिक्षाचालकांना एखाद्या स्टॅण्डवर दीड ते दोन तासांनी भाडे मिळते. प्रवाशांचीही तीन सीट बसवायला हरकत नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून रिक्षात तीन प्रवासी बसत असल्याचे आमच्याही निदर्शनास आले आहे.- दत्ता माळेकर, वाहतूक सेल, कल्याण जिल्हाध्यक्ष, भाजपकुणीही प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये, जे जादा आसन घेतात, त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी. भाडेही नियमानुसारच आकारायला हवे. तसेच जादा भाडे कोणी घेऊ नये. आरटीओ अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.- प्रकाश पेणकर, अध्यक्ष, कोकण विभाग,रिक्षा-टॅक्सी महासंघयंत्रणांचा धाकउरलेला नाहीसरकारी आणि प्रशासकीय यंत्रणा खुजी झाली आहे. नियमाप्रमाणे काही करायचे नाही. कुणालाही काहीही पडले नाही. शिस्त लावायची कोणी? आरटीओ, वाहतूक शाखा हे फक्त केसेस करण्यात दंग आहेत. सरकारी यंत्रणा केवळ वसुली करण्यात व्यस्त आहेत का? असा सवाल आहे. त्यामुळे कुणाला या यंत्रणांचा धाक उरलेला नाही.- काळू कोमास्कर, अध्यक्ष, लाल बावटा रिक्षा युनियन 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस