शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

तीन प्रवाशांना घेऊन डोंबिवलीत सर्रास वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 23:47 IST

रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेला इंदिरा गांधी चौकातून मानपाडा रस्त्यावर जाण्यासाठी पूर्वी शेअरपद्धतीने १८ ते २० रुपये आकारले जायचे. आता मात्र ३० रुपये आकारले जातात.

डोंबिवली : कोरोनाच्या कालावधीत रिक्षा प्रवासासाठी राज्य सरकारने परिवहन विभागामार्फत नियम, अटी घालून व्यवसायाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये रिक्षात शेअरपद्धतीने तीनऐवजी दोन प्रवासी असावेत, ही प्रमुख अट असून तो नियम धाब्यावर बसवून तीन वेळप्रसंगी चार प्रवासी घेऊन रिक्षा प्रवास सुरू असल्याचे डोंबिवलीत निदर्शनास येत आहे.

रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेला इंदिरा गांधी चौकातून मानपाडा रस्त्यावर जाण्यासाठी पूर्वी शेअरपद्धतीने १८ ते २० रुपये आकारले जायचे. आता मात्र ३० रुपये आकारले जातात. खरेतर, दोन प्रवासी घेऊन तिसऱ्या सीटचे भाडे विभागून घ्यावे, असे संकेत असतानाही रिक्षाचालक मात्र सर्रासपणे तीन सीट घेऊन तिघांकडून प्रतिप्रवासी ३० रुपये घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड पडत असून आरटीओने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. इंदिरा गांधी चौकातून पलावा येथे जाण्यासाठी पूर्वी २५ ते ३० रुपये घेतले जात होते. आता मात्र तीन प्रवाशांकडून प्रत्येकी ५० रुपये भाडे आकारले जात आहे. रिक्षाचालकांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्या कुटुंबीयांचे हाल सुरू असल्याची कैफियत चालकांनी मांडली, पण त्याचा फटका प्रवाशांना का? तेही सामान्य नागरिक असून त्यांनाही लॉकडाऊनचा फटका बसला आहेच, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

डोंबिवली जिमखाना येथून स्टेशनकडे येण्यासाठी लॉकडाऊनआधी स्वतंत्र रिक्षा केल्यास ३० रुपये आकारले जायचे. आता मात्र थेट ५० रुपये आकारण्यात येतात. कल्याण-शीळ रस्त्यावरून सुयोग हॉटेलसमोरून रिक्षा केल्यास शेअरपद्धतीने १५ रुपये घेण्यात येत होते. आता त्यात वाढ करण्यात आली असून दोनऐवजी तीन प्रवासी घेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिक हैराण असून कोरोना दूर होणार कसा, असा सवाल करत आहेत. स्वतंत्र रिक्षा केल्यास ३०, ५०, १०० रुपयेही घेतले जात आहेत. कल्याण येथे जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातून दोन सीट घेणे अपेक्षित असते, पण तसे होत नाही. अनेकदा तीन सीट घेतले जातात. त्या सगळ्यांकडून प्रत्येकी ५० रुपये आकारले जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. रिक्षाचालक मास्क लावून असतात, पण रिक्षात सॅनिटायझर वगैरे नसल्याचे निदर्शनास आले.मीटरप्रमाणे रिक्षा कुणीही चालवत नाही. आरटीओची कारवाई अनेक महिन्यांत झाली नाही, डोंबिवलीत लॉकडाऊनपासून आरटीओ अधिकारी आलेही नसल्याचे रिक्षाचालकांनीच सांगितले. त्यामुळे तक्रार, दाद कोणाकडे मागायची, असा सवाल प्रवाशांना पडला आहे.- संबंधित वृत्त/३प्रवाशांसाठी ताटकळत राहावे लागतेमुळात रिक्षा पाच महिने बंद होत्या. त्या कालावधीत रिक्षाचालकांचे हाल झाले असून अनेक जण कर्जबाजारी झाले. आता राज्य सरकारने रिक्षा व्यवसाय सुरू केला आहे, पण तरीही रेल्वे नसल्याने तो नावालाच आहे. कोणीही नागरिक पूर्वीसारखा घराबाहेर पडत नाही, त्यामुळे रिक्षा प्रवासाला चाप बसला आहे. अशा सर्व स्थितीत जरी दोन प्रवासी घ्यावेत, असे अपेक्षित असले तरी रिक्षाचालकांना एखाद्या स्टॅण्डवर दीड ते दोन तासांनी भाडे मिळते. प्रवाशांचीही तीन सीट बसवायला हरकत नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून रिक्षात तीन प्रवासी बसत असल्याचे आमच्याही निदर्शनास आले आहे.- दत्ता माळेकर, वाहतूक सेल, कल्याण जिल्हाध्यक्ष, भाजपकुणीही प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये, जे जादा आसन घेतात, त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी. भाडेही नियमानुसारच आकारायला हवे. तसेच जादा भाडे कोणी घेऊ नये. आरटीओ अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.- प्रकाश पेणकर, अध्यक्ष, कोकण विभाग,रिक्षा-टॅक्सी महासंघयंत्रणांचा धाकउरलेला नाहीसरकारी आणि प्रशासकीय यंत्रणा खुजी झाली आहे. नियमाप्रमाणे काही करायचे नाही. कुणालाही काहीही पडले नाही. शिस्त लावायची कोणी? आरटीओ, वाहतूक शाखा हे फक्त केसेस करण्यात दंग आहेत. सरकारी यंत्रणा केवळ वसुली करण्यात व्यस्त आहेत का? असा सवाल आहे. त्यामुळे कुणाला या यंत्रणांचा धाक उरलेला नाही.- काळू कोमास्कर, अध्यक्ष, लाल बावटा रिक्षा युनियन 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस