शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

भाईंदरमध्ये रिक्षा चालकांची दांडगाई; रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाईचा इशारा दिला म्हणून रिक्षा चालकांचा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 21:15 IST

भाईंदर पश्चिमेस बालाजी नगर येथे रेल्वे स्थानक जवळ रिक्षा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटना व रिक्षा चालकांची बैठक घेऊन केवळ १० रिक्षा उभ्या करायच्या आणि अरुंद रस्त्यात रिक्षा उभ्या करायच्या नाहीत, असे वेळोवेळी सांगितले आहे.

मीरारोड - अरुंद रस्त्यात मनाई करूनदेखील रिक्षा उभ्या केल्याने कारवाईचा इशारा दिला, म्हणून भाईंदरच्या रिक्षा चालकांनी शुक्रवारी अचानक रिक्षा बंद करून नागरिकांना वेठीस धरले. नंतर रस्त्यात जमून गोंधळ घालणाऱ्या रिक्षा चालकांना अखेर पोलिसांनी हुसकावून लावले. 

भाईंदर पश्चिमेस बालाजी नगर येथे रेल्वे स्थानक जवळ रिक्षा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटना व रिक्षा चालकांची बैठक घेऊन केवळ १० रिक्षा उभ्या करायच्या आणि अरुंद रस्त्यात रिक्षा उभ्या करायच्या नाहीत, असे वेळोवेळी सांगितले आहे. तरी देखील अरुंद रस्त्यात २५ ते ३५ रिक्षा उभ्या करून रिक्षा चालक रस्ता अडवतात. यामुळे बालाजी नगर मधील नागरिकांच्या गाडयांना तसेच लोकांचा चालण्यास त्रास होतो. रिक्षा चालकास सांगितल्यास ते भांडायला येतात. त्यामुळे येथील सर्व इमारतींच्या सोसायटीने व नागरिकांनी वारंवार वाहतूक पोलिसां पासून शासन व पालिकेस लेखी तक्रारी केल्या आहेत. 

गुरुवारी सायंकाळी देखील रिक्षा रस्त्यात उभ्या असल्याने नागरिकांच्या तक्रारी नंतर वाहतूक पोलीस कर्मचारी व सहायक पोलीस निरीक्षक मंगेश कड हे बालाजी नगर येथे आले. त्यांनी रस्त्यात अडथळा करणाऱ्या बेकायदा लावलेल्या रिक्षा काढण्यास सांगितले.  त्यावेळी पुन्हा रिक्षा चालक व संघटनांचे प्रतिनिधी जमावाने जमले आणि कारवाईचा विरोध करू लागले . येथे १० पेक्षा जास्त रिक्षा लावायच्या नाहीत व रस्त्यात रिक्षा उभ्या करू नये असे ठरले असल्याची पोलिसांनी पुन्हा आठवण करू देत रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाई करणार असे सांगितले. त्यावर रिक्षा चालक व संघटनाचे प्रतिनिधींनी पोलिसांशी हुज्जत घालत कारवाईला विरोध केला आणि रिक्षा आम्ही बंद करतो असे सांगत गुरुवारी रात्री बालाजी नगर येथील रिक्षा स्वतःच बंद केल्या. 

शुक्रवारी रिक्षा चालक व संघटना यांनी भाईंदर रेल्वे स्थानक येथील रिक्षा देखील अचानक बंद केल्या. रिक्षा चालक रस्त्यात जमावाने जमले तसेच रिक्षा बंद करण्यास सांगत होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर अचानक रिक्षा बंद केल्याने सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. रिक्षा नसल्याने वृद्ध, महिला व मुलांसह पुरुषांना नायक पायपीट करावी लागली. रिक्षा चालक बालाजी नगर येथे झुंडीने उभे असल्याने व समजावून सांगून देखील ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी आक्रमक पवित्र घेत त्यांना पिटाळून लावले. त्या ठिकाणी पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. सायंकाळी रिक्षा चालकांनी स्वतःहूनच पुन्हा रिक्षा सेवा सुरु केली. 

दरम्यान अचानक रिक्षा बंद करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या, रस्त्यात जमावाने जमून रहदारीला बाधा आणणाऱ्या रिक्षा चालक व संघटनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस