शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

भाईंदरमध्ये रिक्षा चालकांची दांडगाई; रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाईचा इशारा दिला म्हणून रिक्षा चालकांचा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 21:15 IST

भाईंदर पश्चिमेस बालाजी नगर येथे रेल्वे स्थानक जवळ रिक्षा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटना व रिक्षा चालकांची बैठक घेऊन केवळ १० रिक्षा उभ्या करायच्या आणि अरुंद रस्त्यात रिक्षा उभ्या करायच्या नाहीत, असे वेळोवेळी सांगितले आहे.

मीरारोड - अरुंद रस्त्यात मनाई करूनदेखील रिक्षा उभ्या केल्याने कारवाईचा इशारा दिला, म्हणून भाईंदरच्या रिक्षा चालकांनी शुक्रवारी अचानक रिक्षा बंद करून नागरिकांना वेठीस धरले. नंतर रस्त्यात जमून गोंधळ घालणाऱ्या रिक्षा चालकांना अखेर पोलिसांनी हुसकावून लावले. 

भाईंदर पश्चिमेस बालाजी नगर येथे रेल्वे स्थानक जवळ रिक्षा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटना व रिक्षा चालकांची बैठक घेऊन केवळ १० रिक्षा उभ्या करायच्या आणि अरुंद रस्त्यात रिक्षा उभ्या करायच्या नाहीत, असे वेळोवेळी सांगितले आहे. तरी देखील अरुंद रस्त्यात २५ ते ३५ रिक्षा उभ्या करून रिक्षा चालक रस्ता अडवतात. यामुळे बालाजी नगर मधील नागरिकांच्या गाडयांना तसेच लोकांचा चालण्यास त्रास होतो. रिक्षा चालकास सांगितल्यास ते भांडायला येतात. त्यामुळे येथील सर्व इमारतींच्या सोसायटीने व नागरिकांनी वारंवार वाहतूक पोलिसां पासून शासन व पालिकेस लेखी तक्रारी केल्या आहेत. 

गुरुवारी सायंकाळी देखील रिक्षा रस्त्यात उभ्या असल्याने नागरिकांच्या तक्रारी नंतर वाहतूक पोलीस कर्मचारी व सहायक पोलीस निरीक्षक मंगेश कड हे बालाजी नगर येथे आले. त्यांनी रस्त्यात अडथळा करणाऱ्या बेकायदा लावलेल्या रिक्षा काढण्यास सांगितले.  त्यावेळी पुन्हा रिक्षा चालक व संघटनांचे प्रतिनिधी जमावाने जमले आणि कारवाईचा विरोध करू लागले . येथे १० पेक्षा जास्त रिक्षा लावायच्या नाहीत व रस्त्यात रिक्षा उभ्या करू नये असे ठरले असल्याची पोलिसांनी पुन्हा आठवण करू देत रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाई करणार असे सांगितले. त्यावर रिक्षा चालक व संघटनाचे प्रतिनिधींनी पोलिसांशी हुज्जत घालत कारवाईला विरोध केला आणि रिक्षा आम्ही बंद करतो असे सांगत गुरुवारी रात्री बालाजी नगर येथील रिक्षा स्वतःच बंद केल्या. 

शुक्रवारी रिक्षा चालक व संघटना यांनी भाईंदर रेल्वे स्थानक येथील रिक्षा देखील अचानक बंद केल्या. रिक्षा चालक रस्त्यात जमावाने जमले तसेच रिक्षा बंद करण्यास सांगत होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर अचानक रिक्षा बंद केल्याने सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. रिक्षा नसल्याने वृद्ध, महिला व मुलांसह पुरुषांना नायक पायपीट करावी लागली. रिक्षा चालक बालाजी नगर येथे झुंडीने उभे असल्याने व समजावून सांगून देखील ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी आक्रमक पवित्र घेत त्यांना पिटाळून लावले. त्या ठिकाणी पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. सायंकाळी रिक्षा चालकांनी स्वतःहूनच पुन्हा रिक्षा सेवा सुरु केली. 

दरम्यान अचानक रिक्षा बंद करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या, रस्त्यात जमावाने जमून रहदारीला बाधा आणणाऱ्या रिक्षा चालक व संघटनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस