शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये मीटरडाऊन करण्यास रिक्षा चालकांची नकारघंटा, प्रवाशांकडून केली जाते मनमानी भाडेवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 18:42 IST

किमान भाडे मीटर प्रमाणे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये उकळतात . अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत .

मीरारोड - कायद्याने प्रवासी भाडे मीटर प्रमाणे नेणे बंधनकारक असून देखील भाईंदर मध्ये मात्र रिक्षाचालक सर्रास मीटर प्रमाणे भाडे नेण्यास मनाई करत मनमानी भाडे वसुली करत आहेत . किमान भाडे मीटर प्रमाणे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये उकळतात . अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत . 

प्रवाश्याच्या रिक्षाचे भाडे हे मीटर प्रमाणे नेणे कायद्याने बंधनकारक आहे . परंतु भाईंदर पूर्व , पश्चिम आणि थेट उत्तन - चौक पर्यंतच्या परिसरात मात्र रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे नेण्याच्या नियमास वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत . मीटर प्रमाणे किमान भाडे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये वसूल करतात . काहीजण तर थेट ४० ते ५० रुपये पण मागतात . 

मीटर प्रमाणे भाडे घेणे बंधनकारक असूनही भाईंदर मधील रिक्षा चालक मात्र मनमानीपणे प्रवाश्यांना मीटर प्रमाणे जाण्यास सरळ नकार देतात . भाईंदर मध्ये मीटर पद्धतच नाही असे सांगतात . त्यामुळे प्रवासी देखील वाद नको म्हणून नाईलाजाने मागेल ते भाडे देऊन प्रवास करतात . 

मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास तयारी असल्याचे काही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी सांगतात . तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास विरोध असल्याचे सांगितले जाते म्हणून मीटर प्रमाणे रिक्षा चालवल्या जात नाहीत असे सूत्र सांगतात . 

मीटर प्रमाणे भाईंदर मध्ये भाडे घेत नसल्याचे जगजाहीर असताना देखील आरटीओ, वाहतूक पोलीस आदीं कडून स्वतःहून ठोस कारवाई होताना दिसत नाही . राजकारणी आणि लोकप्रतिनिधी देखील या प्रश्नी आवाज काढत नाही . या मुळे ह्या मनमानी भाड्याच्या वसुली विरोधात नागरिक देखील हतबलता व्यक्त करून गप्प बसतात . आरटीओने भाईंदर मध्ये जे शेअर भाड्याचे मार्ग मंजूर केले आहेत त्या नुसार शेअर प्रवासी घ्या पण प्रवाशाने मीटर प्रमाणे सांगितल्यास त्यानुसार भाडे पण घ्या अशी नागरिकांची भूमिका आहे . 

शेअर भाड्यात देखील प्रवाश्यांवरच भुर्दंड 

भाईंदर मध्ये शेअर पद्धतीने आरटीओ ने काही मार्ग ठरवून दिले असले तरी त्या व्यतिरिक्त देखील शेअर रिक्षा चालवल्या जातात . त्यातच सध्या तर दोनच प्रवासी घेणे बंधनकारक असताना अनेक ठिकाणी जास्त प्रवासी घेतले जातातच शिवाय शेअर भाडे सुद्धा मनमानी आकारले जात आहे . भाईंदर वरून उत्तनला जाण्यासाठी ५० रुपये , काका बाप्टिस्टा चौक ४० रुपये , मोरवा २५  रु , मुर्धा - राई २० रु . प्रति प्रवासी शेअर भाडे घेतले जात आहे . तर किमान शेअर भाडे १० रुपये प्रति सीट असताना आता दोनच सीट घ्यायच्या नावाखाली प्रति प्रवाश्या कडून थेट १५ रुपये भाडे घेतले जात आहे . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे