शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

भाईंदरमध्ये मीटरडाऊन करण्यास रिक्षा चालकांची नकारघंटा, प्रवाशांकडून केली जाते मनमानी भाडेवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 18:42 IST

किमान भाडे मीटर प्रमाणे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये उकळतात . अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत .

मीरारोड - कायद्याने प्रवासी भाडे मीटर प्रमाणे नेणे बंधनकारक असून देखील भाईंदर मध्ये मात्र रिक्षाचालक सर्रास मीटर प्रमाणे भाडे नेण्यास मनाई करत मनमानी भाडे वसुली करत आहेत . किमान भाडे मीटर प्रमाणे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये उकळतात . अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत . 

प्रवाश्याच्या रिक्षाचे भाडे हे मीटर प्रमाणे नेणे कायद्याने बंधनकारक आहे . परंतु भाईंदर पूर्व , पश्चिम आणि थेट उत्तन - चौक पर्यंतच्या परिसरात मात्र रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे नेण्याच्या नियमास वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत . मीटर प्रमाणे किमान भाडे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये वसूल करतात . काहीजण तर थेट ४० ते ५० रुपये पण मागतात . 

मीटर प्रमाणे भाडे घेणे बंधनकारक असूनही भाईंदर मधील रिक्षा चालक मात्र मनमानीपणे प्रवाश्यांना मीटर प्रमाणे जाण्यास सरळ नकार देतात . भाईंदर मध्ये मीटर पद्धतच नाही असे सांगतात . त्यामुळे प्रवासी देखील वाद नको म्हणून नाईलाजाने मागेल ते भाडे देऊन प्रवास करतात . 

मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास तयारी असल्याचे काही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी सांगतात . तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास विरोध असल्याचे सांगितले जाते म्हणून मीटर प्रमाणे रिक्षा चालवल्या जात नाहीत असे सूत्र सांगतात . 

मीटर प्रमाणे भाईंदर मध्ये भाडे घेत नसल्याचे जगजाहीर असताना देखील आरटीओ, वाहतूक पोलीस आदीं कडून स्वतःहून ठोस कारवाई होताना दिसत नाही . राजकारणी आणि लोकप्रतिनिधी देखील या प्रश्नी आवाज काढत नाही . या मुळे ह्या मनमानी भाड्याच्या वसुली विरोधात नागरिक देखील हतबलता व्यक्त करून गप्प बसतात . आरटीओने भाईंदर मध्ये जे शेअर भाड्याचे मार्ग मंजूर केले आहेत त्या नुसार शेअर प्रवासी घ्या पण प्रवाशाने मीटर प्रमाणे सांगितल्यास त्यानुसार भाडे पण घ्या अशी नागरिकांची भूमिका आहे . 

शेअर भाड्यात देखील प्रवाश्यांवरच भुर्दंड 

भाईंदर मध्ये शेअर पद्धतीने आरटीओ ने काही मार्ग ठरवून दिले असले तरी त्या व्यतिरिक्त देखील शेअर रिक्षा चालवल्या जातात . त्यातच सध्या तर दोनच प्रवासी घेणे बंधनकारक असताना अनेक ठिकाणी जास्त प्रवासी घेतले जातातच शिवाय शेअर भाडे सुद्धा मनमानी आकारले जात आहे . भाईंदर वरून उत्तनला जाण्यासाठी ५० रुपये , काका बाप्टिस्टा चौक ४० रुपये , मोरवा २५  रु , मुर्धा - राई २० रु . प्रति प्रवासी शेअर भाडे घेतले जात आहे . तर किमान शेअर भाडे १० रुपये प्रति सीट असताना आता दोनच सीट घ्यायच्या नावाखाली प्रति प्रवाश्या कडून थेट १५ रुपये भाडे घेतले जात आहे . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे