शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये मीटरडाऊन करण्यास रिक्षा चालकांची नकारघंटा, प्रवाशांकडून केली जाते मनमानी भाडेवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 18:42 IST

किमान भाडे मीटर प्रमाणे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये उकळतात . अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत .

मीरारोड - कायद्याने प्रवासी भाडे मीटर प्रमाणे नेणे बंधनकारक असून देखील भाईंदर मध्ये मात्र रिक्षाचालक सर्रास मीटर प्रमाणे भाडे नेण्यास मनाई करत मनमानी भाडे वसुली करत आहेत . किमान भाडे मीटर प्रमाणे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये उकळतात . अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत . 

प्रवाश्याच्या रिक्षाचे भाडे हे मीटर प्रमाणे नेणे कायद्याने बंधनकारक आहे . परंतु भाईंदर पूर्व , पश्चिम आणि थेट उत्तन - चौक पर्यंतच्या परिसरात मात्र रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे नेण्याच्या नियमास वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत . मीटर प्रमाणे किमान भाडे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये वसूल करतात . काहीजण तर थेट ४० ते ५० रुपये पण मागतात . 

मीटर प्रमाणे भाडे घेणे बंधनकारक असूनही भाईंदर मधील रिक्षा चालक मात्र मनमानीपणे प्रवाश्यांना मीटर प्रमाणे जाण्यास सरळ नकार देतात . भाईंदर मध्ये मीटर पद्धतच नाही असे सांगतात . त्यामुळे प्रवासी देखील वाद नको म्हणून नाईलाजाने मागेल ते भाडे देऊन प्रवास करतात . 

मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास तयारी असल्याचे काही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी सांगतात . तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास विरोध असल्याचे सांगितले जाते म्हणून मीटर प्रमाणे रिक्षा चालवल्या जात नाहीत असे सूत्र सांगतात . 

मीटर प्रमाणे भाईंदर मध्ये भाडे घेत नसल्याचे जगजाहीर असताना देखील आरटीओ, वाहतूक पोलीस आदीं कडून स्वतःहून ठोस कारवाई होताना दिसत नाही . राजकारणी आणि लोकप्रतिनिधी देखील या प्रश्नी आवाज काढत नाही . या मुळे ह्या मनमानी भाड्याच्या वसुली विरोधात नागरिक देखील हतबलता व्यक्त करून गप्प बसतात . आरटीओने भाईंदर मध्ये जे शेअर भाड्याचे मार्ग मंजूर केले आहेत त्या नुसार शेअर प्रवासी घ्या पण प्रवाशाने मीटर प्रमाणे सांगितल्यास त्यानुसार भाडे पण घ्या अशी नागरिकांची भूमिका आहे . 

शेअर भाड्यात देखील प्रवाश्यांवरच भुर्दंड 

भाईंदर मध्ये शेअर पद्धतीने आरटीओ ने काही मार्ग ठरवून दिले असले तरी त्या व्यतिरिक्त देखील शेअर रिक्षा चालवल्या जातात . त्यातच सध्या तर दोनच प्रवासी घेणे बंधनकारक असताना अनेक ठिकाणी जास्त प्रवासी घेतले जातातच शिवाय शेअर भाडे सुद्धा मनमानी आकारले जात आहे . भाईंदर वरून उत्तनला जाण्यासाठी ५० रुपये , काका बाप्टिस्टा चौक ४० रुपये , मोरवा २५  रु , मुर्धा - राई २० रु . प्रति प्रवासी शेअर भाडे घेतले जात आहे . तर किमान शेअर भाडे १० रुपये प्रति सीट असताना आता दोनच सीट घ्यायच्या नावाखाली प्रति प्रवाश्या कडून थेट १५ रुपये भाडे घेतले जात आहे . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे