शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

भाडेकपातीला रिक्षाचालकही सहमत

By admin | Updated: October 13, 2016 03:29 IST

डोंबिवली ते उल्हासनगर परिसरात चार सीएनजीपंप सुरू झाल्याने येथील रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव कल्याण आरटीओने परिवहन

डोंबिवली : डोंबिवली ते उल्हासनगर परिसरात चार सीएनजीपंप सुरू झाल्याने येथील रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव कल्याण आरटीओने परिवहन विभागातील वरिष्ठांना पाठवला आहे. या भाडेकपातीला रिक्षाचालक-मालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांचीही संमती आहे. परंतु, त्यासाठी अगोदर सीएनजीपंपांची संख्या वाढवा आणि नंतर भाडेकपात करा, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.‘रिक्षाप्रवास दोन रुपये स्वस्त’ या शीर्षकाखाली शुक्रवारी ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावर, कल्याण-डोंबिवलीतील युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वरील मत व्यक्त केले. सरकारचा निर्णय मान्यच असेल, पण त्यासाठी सीएनजीपंपांची संख्या वाढवायला हवी. कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एक पंप आहे. तो अपुरा पडत आहे, असे रिक्षाचालक युनियनचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी सांगितले.कल्याणमध्ये शेअर रिक्षाभाड्यात आधीच कपात केली आहे. पुरेसे पंप झाल्यावर हकीम समितीच्या निकषांनुसार भाडेकपात करावी लागल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. आधी निर्णय तर होऊ द्या, असे रिक्षा-टॅक्सीचालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले. रिपब्लिकन रिक्षा युनियनचे अध्यक्ष रामा काकडे यांनी सीएनजीपंप वाढवावेत, त्यानंतर सरकारच्या निर्णयाबाबत संघटना विचार करेल, असे मत व्यक्त केले. सीएनजी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात फरक आहे, हे मान्य आहे. त्यानुसार, आता बहुतांशी रिक्षा सीएनजीवर झाल्या आहेत. पण, त्या प्रमाणात पंप नाहीत. हकीम समितीच्या निकषांच्या आधारे जो निर्णय होईल, तो मान्य असेल, असे डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)