शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत परतीच्या पावसाने भात पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 17:14 IST

Bhiwandi : परतीच्या पावसाने बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे.

- नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडी तालुक्यात सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. शेतात पीक जोमाने आल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र शेतातील ही भातपिके शेतात डौलाने डोलत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने हैदोस घालीत बळीराजाच्या शेतातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. परतीच्या पावसाने बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला असून परतीच्या पावसामुळे भिजलेली पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. 

शेतात कुटुंबियांसह काबाडकष्ट करून पिकविलेले व हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हिरावल्याने हे पीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क रस्त्याच्या दुभाजकावर पीक आणून ठेवली आहेत. भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली , वडवली, अनगांव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगांव ,मुठवळ,चिंबीपाडा,कुहे ,धामणे ,खारबांव ,पाये ,पायगांव ,खार्डी ,एकसाल ,सागांव ,जुनांदुर्खी ,टेंभवली ,पालीवली ,गाणे ,फिरिंगपाडा ,बासे ,मैदे ,पाश्चापूर, वडुनवघर , खारबाव ,  या भागात हजारो एकर भातशेती पिकविली जात असून यंदा भातपिक ही चांगले आल्याने शेतकरी आनंदित होता मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला भात पिकाचा घास हिरावून मातीमोल केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून तब्बल १६ हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.  तर शेतात कापून ठेवलेले भाताचा एकएक दाणा वाचवण्यासाठी भिजलेले भात पीक सुकवण्यासाठी चक्क भिवंडी - वाडा रोडवरील रस्ते दुभाजकावर ठेवण्याची  शेतकऱ्याची धडपड पाहावयास मिळत आहे . शेतकरी हवालदिल झालेला असताना कृषी व महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या या हतबलतेकडे दुर्लक्ष करीत असल्याने जगावं की मरावं अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

दरम्यान, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे यांनी शनिवारी अंबाडी खरिवली परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे म्हणत त्यांना दिलासा दिला व कृषी व महसूल अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत करण्याचे निर्देश आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज आपण स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून तसे निर्देश देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत . अशी प्रतिक्रिया भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीFarmerशेतकरी