शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

नव्या कळवा खाडीपुलामुळे वाहतूक कोंडीत पडणार भर चिंचोळ््या बोगद्याचा परिणाम : घोडबंदर रोडची होणारा पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 5:14 PM

कळवा खाडीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी हा पुल खाली उतरविण्यात आला आहे. तेथून हाकेच्या अंतरावर विटावा सबवे असून तो अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी पुन्हा कोंडी फुटण्याऐवजी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपुलाचा मार्ग वाढविण्याची मागणीवाहनांची वर्दळ अधिक संख्येने वाढणार

ठाणे : ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या  तिसऱ्या पुलाचे काम आता मार्गी लागत असले तरी हा पूल जेथे उतरत आहे तेथून पुढे असलेल्या विटावा बोगद्याच्या चिंचोळ्या मार्गामुळे पुन्हा कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. घोडबंदर मार्गावरील पूल जेथे संपतात व नवा पूल सुरु होतो त्या जंक्शनपाशी वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे ठाणे-कळवा खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच यावर तोडगा काढला जावा, अशी आशा व्यक्त होत आहे.                    मुंबईतील सी लिंकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने विटावा पुलाखालील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी या कळवा खाडी पुलावर तिसरा नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये मांडला होता. सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटीशकालीन आणि आणखी एक पूल आहे. परंतु ब्रिटीशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या  पुलावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हा दुसरा पूल वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसऱ्या  पुलाचा पर्याय मांडला. महापालिकेने २०११-१२ या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.          जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर हा पूल उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वन-वे पूल असणार आहे तर विटाव्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय उपलब्ध आहे. या तिसऱ्या पुलामुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे - बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने हा पूल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पूल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. तसेच आता यात थोडा बदल करण्यात आला असून, आत्माराम चौकापर्यंत रस्ता या पुलाला जोडण्यात येणार आहे.केबल स्टेड टाईपचा हा पूल असणार असून तो दीड कि.मी. लांबीचा असणार आहे. यामुळे विटाव्या पुलाखालील आणि कळवा नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.       आजच्या घडीला या मार्गावरुन विटावा नवी मुंबईकडे जाणाºया वाहनांची संख्या ही दिवसाला ५० ते ६० हजारांच्या आसपास आहे. ऐरोली मार्गे जावे लागल्यास त्या ठिकाणी दोन टोल भरावे लागत आहेत. त्यामुळे भविष्यात या फ्रीवेचाच वापर अधिक होणार आहे. नवा ब्रीज सुरु झाल्यानंतर वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवा ब्रीज हा कळवा हॉस्पिटलच्या ठिकाणी उतरवण्यात येणार असून तेथून पुढे विटाव्या पुलाचा चिंचोळा मार्ग आहे. या पुलावरुन येणारी वाहतुक येथे येऊन तिला ब्रेक लागणार आहे. त्यामुळे या नव्या पुलावरुन आतापासूनच तर्कविर्तक केले जाऊ लागले आहेत. घोडबंदर मार्गावर रस्ते चार पदरी असतांना या ठिकाणी जेथे पूल खाली उतरतात, त्याठिकाणी वाहतूक कोंडी होतांना दिसते. भविष्यात या नव्या पुलामुळे हीच परिस्थितीत विटावा बोगद्याजवळ उदभवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाkalwaकळवा