शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मीरा-भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी निर्बंध पायदळी; मास्क, साेशल डिस्टन्सिंगचाही विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 23:50 IST

Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये शासनाने कोरोना रोखण्यासाठी अमलात आणलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी बुधवार रात्री ८ नंतर सुरू झाली. गुरुवारी सकाळपासून शहरात वर्दळ सुरू होती.

मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे मीरा-भाईंदरमध्ये काही ठिकाणी पालन केले गेले़ तर अनेक ठिकाणी उघडपणे उल्लंघन सुरू हाेते. मात्र त्याकडे पालिका, पोलीस व नगरसेवक-राजकारणी यांनी कानाडोळा केला. जेणेकरून भाजीपाला व अन्य वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांसह रस्ते-दुकानातून खाद्य - पेयपदार्थ विकणाऱ्यांकडे गर्दी झाली. मास्क घालणे व नियमांचे पालन तर सर्रास धाब्यावर बसवल्याचे ठिकठिकाणी दिसत होते. मीरा-भाईंदरमध्ये शासनाने कोरोना रोखण्यासाठी अमलात आणलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी बुधवार रात्री ८ नंतर सुरू झाली. गुरुवारी सकाळपासून शहरात वर्दळ सुरू होती.  महापालिकेने भाजीपाला-फळे यासाठी मैदानात सकाळची ७ ते ११ वेळ जाहीर केली असताना त्याला न जुमानता शहरातील मुख्य रस्ते, पदपथ आणि गल्ल्यांमध्ये त्यांची विक्री सुरू हाेती. बहुतांश फेरीवाल्यांनी मास्क हे नका-तोंडाच्या खाली घातले होते तर काहींनी घातले नव्हते. त्याठिकाणी लोकांची खरेदीसाठी गर्दी उसळली होती. गर्दीतील अनेक बेजबाबदार नागरिकांनीही मास्क नाकातोंडाच्या खाली घातले होते.  शहरात संचारबंदी लागू असूनही नागरिकांना शहाणपण सुचलेले नसल्याचेच चित्र हाेते. त्यामुळे काेराेनाला कसे राेखायचे हा प्रश्नच आहे.

खाद्यपदार्थांच्या गाड्या, हाॅटेलमध्ये गर्दीरस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या, हाॅटेल, दुकानांतही नागरिकांनी गर्दी केली हाेती. मात्र, बहुतांश दुकाने बंद हाेती. गल्लीबाेळातील काही दुकाने अर्धे शटर उघडे ठेवून सुरू हाेती. रिक्षांचे प्रमाण जास्त नसले तरी वाहनांची वर्दळ फारशी कमी झालेली नव्हती. त्यामुळे एकूण संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत हाेता.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस