शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

अंबरनाथच्या बारवीतून ३०५ क्सेसक पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 6:26 PM

रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीत वाढली आहे. धरणात आतापर्यंत सरासरी दोन हजार १०५ मिमी पाऊस पडलेला आहे. शनिवारी धरण क्षेत्रात २१ मिमी .सरासरी पाऊस झाला.

ठळक मुद्देपावसाच्या श्रावण सरींचा जोर वाढल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्यात १०० टक्के वाढधरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीओसंडून वाहणारे पाणी सुमारे १५ दिवसांपासून बंद होते३०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणाच्या दरवाज्यातून पुन्हा

ठाणे : जिल्ह्यातील  शहरांसह औद्योगिक क्षेत्रातील कारखाने व कंपन्यांना पाणी पुरवठा करणारे अंबरनाथच्या बारवी धरण सुमारे महिन्यांपूर्वीच भरले होते. पण मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे ओसंडून वाहणारे पाणी सुमारे १५ दिवसांपासून बंद होते. पण रात्रीपासून जिल्ह्यासह या धरण क्षेत्रात पावसाच्या श्रावण सरींचा जोर वाढल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्यात १०० टक्के वाढ झाली. उर्वरित ३०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणाच्या दरवाज्यातून पुन्हा ओसंडून वाहू लागला आहे.रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीत वाढली आहे. धरणात आतापर्यंत सरासरी दोन हजार १०५ मिमी पाऊस पडलेला आहे. शनिवारी धरण क्षेत्रात २१ मिमी .सरासरी पाऊस झाला. यातील ठाकूरवाडीत २० मिमी,कान्होळला १४ मिमी, खानिवरेला ३२ आणि पाटगांवला १६ मिमी पाऊस पडल्याची नोंद बारवी धरण व्यवस्थापन प्रशासनाने घेतली आहे.बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने जोर पकडला. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या दरम्यान सकाळी शहापूर तालुक्यातील धुपारवाडी येथे शॉकसर्किटमुळे एकाच राहते घर जळाले. तर बारवी धरणातील बंद झालेला पाण्याचा विसर्ग या सततच्या रिपरिपमुळे पुन्हा सुरू झाला.जिल्ह्यात ९०.४० मिमी पाऊस पडला. या दरम्यान शहापूरच्या धुपारवाडीतील दुर्घना वगळता कोठेही अनुचित घटना घडली नाही. ठाणे शहरात या पावसा दरम्यान वेगवेगळ्या ११ घटना घडल्या. यामध्ये चार वृक्ष उन्मळून पडली. तर तीन झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही अनुचित घटना नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्पष्ट केले. जिल्हह्हयात आतापर्यंत दोन हजार १९९ मिमी सरासरी पाऊस पडला. यात आज केवळ ९०.४० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस शहापूर तालुक्यात ३० मिमी पाऊस पडला. तर सर्वात कमी मुरबाडला केवळ २ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी