शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

बायोगॅसला विरोध :राजूनगरमधील रहिवाशांनी घेतली न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:58 AM

प्रकल्प उभारायचा कुठे? केडीएमसीचा सवाल

मुरलीधर भवार कल्याण : केडीएमसीने डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर येथे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्यासाठी १० टनाचा प्रकल्प उभारला आहे. मात्र, या प्रकल्पाविरोधात तेथील पांडुरंग टॉवर या सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर, दुसरीकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने न्यायलयात सादर करण्यासाठी तयार केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा प्रकल्प कुठे उभारयचा, असा सवाल केला आहे.

राजूनगरमधील रहिवाशांचा बायोगॅस प्रकल्पास विरोध आहे. तेथील पांडुरंग टॉवर या सोसायटीने उच्च न्यायालयात प्रकल्पाविरोधात याचिका दाखल करून हा प्रकल्प तेथे राबवू नये. तो अन्यत्र राबवावा, अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील नागरिक ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण करत नाहीत. ती त्यांची जबाबदारी असतानाही ते ती पार पाडत नाहीत. त्यामुळे ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. मात्र, त्याला नागरिकांचा विरोध आहे. ते कचरा वर्गीकरण करून देत नाहीत. या उलट महापालिका राबवत असलेल्या प्रकल्पाला ते विरोध करत आहेत. प्रकल्प आमच्या घराशेजारी नको, अशी त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे प्रकल्प राबवायचा कुठे, असा पेच पडला आहे. तसेच अन्य ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरू आहे. त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यताही आहे, याकडेही प्रशासनाने लक्ष वेधले आहे.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर दररोज ५७० मेट्रीक टन कचरा आणून टाकला जातो. मात्र, ओल्या कचºयामुळे आधारवाडी परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच आधारवाडी डम्पिंग बंद करण्याच्या उद्देशाने कचºयावरील प्रक्रियेचे विघटन आणि प्रकल्पांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी महापालिकेने आपल्या हद्दीत विविध १३ ठिकाणी प्रत्येकी १० मेट्रिक टन क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर झालेल्या ११४ कोटी रुपयांमधून हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यापैकी कल्याण पश्चिमेतील उंबर्डे, बारावे, डोंबिवली पूर्वेतील आयरे आणि पश्चिमेत राजूनगर येथे प्रकल्प उभे राहिले आहेत. तर, कल्याण पूर्वेतील कचोरे येथील प्रकल्पाचे काम सुरू आहे. बारावे येथे गोदरेज कंपनीच्या सीएसआर फंडातील नऊ कोटी रुपयांमधून पाच टनाचा प्लॅस्टिक कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित केला गेला आहे.

ओल्या कचऱ्याची कमतरतासध्या महापालिकेकडे १० टन क्षमतेचे चार बायोगॅस प्रकल्प तयार आहेत. या प्रकल्पांना एकूण ४० टन ओला कचरा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कचºयाचे वर्गीकरण होत नसल्याने या प्रकल्पांना केवळ १२ ते १५ टन ओला कचरा मिळत आहे. त्यामुळे उर्वरित आठ बायोगॅस प्रकल्प उभारायचे की नाही, अशा द्विधा मनस्थितीत महापालिका आहे. महापालिका हद्दीतून गोळा होणाºया एकूण ५७० मेट्रिक टन कचºयापैकी ३२५ मेट्रिक टन ओल्या कचºयाचे प्रमाण असते.अडथळ्यांची शर्यत कायम१) उंबर्डे प्रकल्पास स्थानिक नगरसेवकाचा विरोध आहे. अन्य ठिकाणचे प्रकल्प कधी राबविले जाणार, असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत. बारावे घनकचरा प्रकल्पास मांडा भरावभूमीला नागरिकांचा विरोध आहे.२) उंबर्डे येथील जैववैद्यकीय कचºयाचा प्रकल्प बांधून तयार आहे. त्याला पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखला. मात्र, आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यात त्रुटी काढल्या आहेत.३) कचराप्रकरणी याचिका हरित लवादाकडे न्याय प्रविष्ट आहे. बारावेप्रकरण राज्य सरकारच्या देवधर समितीकडे सोपवण्यात आले आहे.४) उंबर्डे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ सप्टेंबर तर, बारावेसाठी १५ जानेवारीची डेडलाइन दिली आहे. आयुक्तांनी घनकचरा विभागातील २३ जणांचे पगार रोखले आहेत. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरून कचरा प्रकल्पांच्या अडथळ्यांची शर्यत संपत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयkdmcकल्याण डोंबिवली महापालिका