शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘टोरंट’विरोधात रहिवासी आज उतरणार रस्त्यावर; साखळी उपोषणाच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:19 IST

कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात तीव्र असंतोष

ठाणे : कळवा-मुंब्रा-शीळ-देसाई-दिवा विभागातील वीजवितरण आणि वीजबिल वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले असून त्याचे कंत्राट टोरंट या कंपनीला दिले आहे. यामुळे महावितरणला सक्षम करून टोरंट कंपनीला हद्दपार करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून या भागात आंदोलन सुरू असून आता त्याची धार अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी टोरेन्ट हटाव, वीज ग्राहक बचाव अशी मागणी करून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती टोरंट हटाव कृती समितीने दिली.

टोरंट हटाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. टोरेन्ट संदर्भात यापूर्वी वारंवार बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तीन वेळा बैठका लावण्यात आल्या. मात्र, त्या रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मध्यतंरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्यावर योग्य तो तोडगा निघालेला नाही. भिवंडीतील रहिवासी या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत, त्यामुळे उद्या या भागात खाजगीकरण झाले तर येथील समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे.या उलट महावितरणचे सक्षमीकरण करण्यात यावे, नवीन भरती प्रक्रिया राबवावी, प्रिपेड मीटर लावावेत अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.तर नोव्हेंबरपासून उपोषणआता विविध आंदोलने, मोर्चे काढूनही कळवा आणि मुंब्रा भागात या कंपनीच्या माध्यमातून कामे सुरू झाली आहेत. तसेच येत्या ३१ आॅक्टोबरच्या रात्रीपासून ते खऱ्या अर्थाने वेगाने काम सुरूअसल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळेच आम्ही हा मोर्चा काढत असल्याचे सांगितले. यानंतरही शासनाला जाग आली नाही तर मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड, राजू पाटील हेदेखील सहभागी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्रा