शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पुन्हा वेध डायघर प्रकल्पाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:44 AM

कच-याच्या विल्हेवाटीवरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका प्रशासनाला चांगलेच फटकारले असतांना आता महापालिकेने डायघर येथील

ठाणे : कच-याच्या विल्हेवाटीवरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका प्रशासनाला चांगलेच फटकारले असतांना आता महापालिकेने डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या दिशेने पुन्हा एकदा पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या नागरिकांच्या विरोधामुळे गेली १२ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. याठिकाणी वृक्ष लागवड सुरु असून लवकरच या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरु होईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.ठाणे शहरात आजच्या घडीला सुमारे ७५० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. पालिका स्थापन झाल्यापासून, डम्पींगचा प्रश्न सुटलेला नाही. सुमारे १२ वर्षांपूर्वी डायघर येथे पालिकेने शास्त्रोक्त पध्दतीने कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु स्थानिकांचा विरोध झाल्याने पालिकेला हा प्रकल्प अर्ध्यावरच गुंडाळावा लागला. त्यानंतर कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मग कधी गायमुख, कधी खर्डी, कधी वागळे इस्टेट असा प्रवास करीत सध्या दिवा भागात कचरा टाकला जात आहे. शीळफाटा येथील वन विभागाची जागाही पालिकेच्या ताब्यात येत असून या जागेवर कचरा टाकण्यास वनविभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.या ठिकाणी १०० मेट्रीक टन कचºयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन त्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. परंतु या सर्वांवर तोडगा निघावा म्हणून पालिकेने तळोजा येथील सामूहिक भराव भूमीमध्येही सहभाग घेण्याचे निश्चित केले होते. परंतु, एमएमआरडीएकडून आलेले दर आणि पालिकेने दिलेले दर यावरुन पालिकेने या प्रकल्पातून माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा शहरात कचºयाचा प्रश्न डोके वर काढू लागल्याने पालिकेने पुन्हा या योजनेत सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु आता ही योजनात बारगळल्याने कचरा कुठे टाकायचा, असा पेच पालिकेसमोर उभा राहिला आहे.दरम्यान सध्या पालिकेकमार्फत शहरात निर्माण होणाºया विविध प्रकारच्या कचºयाचे वर्गीकरण करुन प्लास्टीक वेस्ट, वुड वेस्ट, डेब्रीज वेस्ट आदींसह इतर छोटेखानी प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. तसेच, १०० मेट्रीक टन कचºयावर काही सोसायटींच्या माध्यमातून प्रक्रिया सुरु झाली आहे.