शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अतिक्रमणे १५ दिवसांत काढा; अंबरनाथ पालिकेला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:19 AM

रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन पुढाकार घेत नसल्याने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले.

अंबरनाथ : अंबरनाथमधील पाच प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने निधी दिला आहे. मात्र निधी असतानाही या रस्त्यांचे काम सुरू करण्यात अडचणी येत आहेत. केवळ एकाच रस्त्याचे काम सुरू असून उर्वरित चारही रस्त्यांचे काम अजूनही कागदावरच आहे. रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन पुढाकार घेत नसल्याने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत पालिकेला दिली आहे.शहरातील पाच मुख्य रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने ५५ कोटींचा निधी दिला आहे. त्यातील शिवाजी चौक ते लोकनगरी या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हा रस्ताही काही ठिकाणी अतिक्रमणांचा मुद्दा आल्याने तसाच रखडलेला आहे. तर उर्वरित चार रस्त्यांचे अजूनही काम सुरू झालेले नाही. त्यातील बेथल चर्च ते फुलेनगर रस्त्याचे काम अतिक्रमणांमुळे थांबले आहे. या रस्त्याचे अतिक्रमण काढण्याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. तसेच खांबकर वाडी रस्ता, स्वामी समर्थ चौक रस्त्यांचीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील मुख्य रस्त्यांसाठी निधी आलेला असतानाही या रस्त्याचे काम होत नसल्याने एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी बैठक घेतली. या प्रकरणात पालिकेला रस्त्यांसदर्भात खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत शहरातील या पाच रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतलेला नाही ही बाब समोर आली.पालिका प्रशासनाची उदासीनता कारणीभूतरस्त्याचे प्रस्ताव मंजूर झाल्यावर पालिकेने अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही करण्याची गरज होती. मात्र ते न केल्याने आज हे अतिक्रमण निघत नाही आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्ता मोकळा न केल्याने कंत्राटदारानेही रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही. अखेर या प्रकरणी एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी पालिका अधिकाºयांना १५ दिवसात अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणambernathअंबरनाथ