शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गातील वनविभागाचा अडसर दूर; औरंगाबादला वृक्षलागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 06:36 IST

पर्यायी ३८५ हेक्टर जागेच्या प्रस्तावाला मंजुरी । विधानसभा निवडणुकीआधी काम सुरू होण्याची शक्यता

ठाणे : समृद्धी महामार्गामधील ठाणे जिल्ह्यात येणारा वनविभागाच्या मान्यतेचा मुख्य अडसर आता दूर झाला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन हस्तांतरणाचे काम पूर्ण होत आले असतानाच वनविभागाने ठाणे जिल्ह्यात जाणाऱ्या वनजमिनीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात दिलेल्या ३८५ हेक्टर पर्यायी जागेच्या बदल्यात या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात देण्यात आलेल्या पर्यायी जागेवर वृक्षलागवड करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ८० कोटी ४१ लाख २५ हजार ७५७ रुपये संबंधित वनसंरक्षकांकडे सुपूर्द केले आहे. येत्या जुलै महिन्यात याठिकाणी वृक्षलागवड सुरू होणार असल्याचे कळते. समृद्धी महामार्ग प्रकल्पानंतर मुंबई-नागपूर हे अंतर सात तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जमीन देण्यास सुुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी स्थानिकांची आंदोलनेसुद्धा झाली. मात्र, बाजारभावाने जमिनीचा मोबदला शेतकºयांच्या थेट बँक खात्यावर जमा केला जाऊ लागल्याने हळूहळू या प्रकल्पाला असलेला विरोध मावळला.

बहुतेक बाधित शेतकºयांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या. आता जमीन हस्तांतरण प्रक्रि या पूर्ण होत असतानाच वनविभागानेही या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ३८५ हेक्टर वनजमीन यात येत आहे. त्याबदल्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी आणि फुलंब्री तालुक्यांतील जातवा आणि उमरावती या गावांमधील जागा वनलागवडीसाठी दिली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अखत्यारीत असलेली ही महसुली जमीन वनविभागाला सुपूर्द केली आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्येमुंबई-नागपूर हे अंतर ८१२ किलोमीटर असून ते पार करण्यासाठी सध्या १४ तास लागतात. समृद्धी महामार्गाने ते अंतर ७०० किमी होऊन ते आठ तासांत कापता येणार आहे. औरंगाबाद येथून मुंबई, नागपूरला जाण्यासाठी चार तास लागणार आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हा रस्ता बांधण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पावर देखरेख करणार आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदर आणि नागपूर विमानतळ ही महत्त्वाची केंद्रे या रस्त्यामुळे जोडली जाणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात या महामार्गामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभागSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग