शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गातील वनविभागाचा अडसर दूर; औरंगाबादला वृक्षलागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 06:36 IST

पर्यायी ३८५ हेक्टर जागेच्या प्रस्तावाला मंजुरी । विधानसभा निवडणुकीआधी काम सुरू होण्याची शक्यता

ठाणे : समृद्धी महामार्गामधील ठाणे जिल्ह्यात येणारा वनविभागाच्या मान्यतेचा मुख्य अडसर आता दूर झाला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन हस्तांतरणाचे काम पूर्ण होत आले असतानाच वनविभागाने ठाणे जिल्ह्यात जाणाऱ्या वनजमिनीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात दिलेल्या ३८५ हेक्टर पर्यायी जागेच्या बदल्यात या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात देण्यात आलेल्या पर्यायी जागेवर वृक्षलागवड करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ८० कोटी ४१ लाख २५ हजार ७५७ रुपये संबंधित वनसंरक्षकांकडे सुपूर्द केले आहे. येत्या जुलै महिन्यात याठिकाणी वृक्षलागवड सुरू होणार असल्याचे कळते. समृद्धी महामार्ग प्रकल्पानंतर मुंबई-नागपूर हे अंतर सात तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जमीन देण्यास सुुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी स्थानिकांची आंदोलनेसुद्धा झाली. मात्र, बाजारभावाने जमिनीचा मोबदला शेतकºयांच्या थेट बँक खात्यावर जमा केला जाऊ लागल्याने हळूहळू या प्रकल्पाला असलेला विरोध मावळला.

बहुतेक बाधित शेतकºयांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या. आता जमीन हस्तांतरण प्रक्रि या पूर्ण होत असतानाच वनविभागानेही या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ३८५ हेक्टर वनजमीन यात येत आहे. त्याबदल्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी आणि फुलंब्री तालुक्यांतील जातवा आणि उमरावती या गावांमधील जागा वनलागवडीसाठी दिली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अखत्यारीत असलेली ही महसुली जमीन वनविभागाला सुपूर्द केली आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्येमुंबई-नागपूर हे अंतर ८१२ किलोमीटर असून ते पार करण्यासाठी सध्या १४ तास लागतात. समृद्धी महामार्गाने ते अंतर ७०० किमी होऊन ते आठ तासांत कापता येणार आहे. औरंगाबाद येथून मुंबई, नागपूरला जाण्यासाठी चार तास लागणार आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हा रस्ता बांधण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पावर देखरेख करणार आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदर आणि नागपूर विमानतळ ही महत्त्वाची केंद्रे या रस्त्यामुळे जोडली जाणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात या महामार्गामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभागSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग