रिलायन्स जिओ,बच्चो मरो हेच सरकारचे नवे धोरण - विवेक पंडित
By Admin | Updated: September 14, 2016 13:48 IST2016-09-14T13:48:46+5:302016-09-14T13:48:46+5:30
आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्याने हजारो बालकं कुपोषणांने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहेत.

रिलायन्स जिओ,बच्चो मरो हेच सरकारचे नवे धोरण - विवेक पंडित
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मोखाडा, दि. १४ - आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्याने हजारो बालकं कुपोषणांने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहेत. असे असताना हे सरकार मात्र स्मार्ट आणि डिजिटल इंडिया सारखे उपक्रम प्राध्यान्य कामावर घेऊन भांडवलदारांचे हिताचे बनले आहे.
नुकताच रिलायन्स जिओ (JIO) च्या जाहिरतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो प्रसिद्ध झाला होता. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी संताप व्यक्त केला. नुकताच राज्याच्या आदिवासी विकास मंत्री यांच्या गावातच एका कुपोषित मुलीचा मृत्यू झाला. रिलायंस जिओ(JIO) और बच्चो मरो असेच सरकारचे धोरण असल्याची सडेतोड टीका विवेक पंडित यांनी केली.
पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे सत्र अजूनही थांबलेले नाही. मोखाड्यातील सागर वाघ आणि ईश्वर सवरा यांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना ताजी असतानाच नंतर नुकताच वाडा शहरानाजीक पेठरंजणी या पाड्यात राहणाऱ्या एक मुलीचा कुपोषणाने दुर्दैवी अंत झाला.
विशेष म्हणजे याच वाडा शहरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे निवासस्थान आहे. या वर्षभरात पालघर जिल्ह्यात 600 बालमृत्यू झाले आहेत त्यातील अर्ध्याहून अधिक बालमृत्यू हे सवरा यांच्या मतदारसंघातील आहेत. याबाबत वारंवार आंदोलन आणि मागण्या होऊनही सवरा यांनी कानावर हात दिले आहेत.
आता सावरा यांच्याकडून जनतेच्या कोणत्याही अपेक्षा उरल्या नसल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. कुपोषणाच्या भयाण वास्तवाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रत्यक्ष कल्पना देऊनही त्यांच्याकडूनहि अपेक्षाभंग झाल्याची खंत पंडित यांनी व्यक्त केली.
हे सरकार भांडवलदारधार्जिणे झाले असून गरिबांच्या वेदनेच्या संवेदना या सरकार मध्ये शिल्लक नसल्याचा आरोप पंडित यांनी केला. पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले असून अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगितले आहे, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक कार्यक्रमाची अजून काही काळ वाट पाहू. त्यानंतरही सरकारच्या संवेदना जागृत झाल्या नाही तर अत्यंत आंदोलनास सुरुवात करू असा इशारा विवेक पंडीत यांनी दिला आहे.