रिलायन्स जिओ, बच्चे मरो हे धोरण

By Admin | Updated: September 15, 2016 02:09 IST2016-09-15T02:09:18+5:302016-09-15T02:09:18+5:30

आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्यानं हजारो कुपोषित बालके मृत्यूशी झुंज देत आहेत, असे असतांना मोदी व फडणवीस सरकार मात्र स्मार्ट आणि डिजटल इंडिया सारखे भांडवलदार धार्जिणे

Reliance Jiao, die this policy | रिलायन्स जिओ, बच्चे मरो हे धोरण

रिलायन्स जिओ, बच्चे मरो हे धोरण

रवींद्र साळवे , मोखाडा
आदिवासी गरिबांना पोटभर खायला नसल्यानं हजारो कुपोषित बालके मृत्यूशी झुंज देत आहेत, असे असतांना मोदी व फडणवीस सरकार मात्र स्मार्ट आणि डिजटल इंडिया सारखे भांडवलदार धार्जिणे उपक्रम राबवित आहेत. या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओच्या जाहिरातीत पंतप्रधानांचा फोटो पाहिला की, ‘रिलायन्स जिओ और बच्चे मरो’ असेच सरकारचे धोरण असल्याची टीका विवेक पंडित यांनी केली.
पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे सत्र अजूनही थांबलेले नाही. मोखाड्यातील सागर वाघ आणि ईश्वर सवरा यांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना ताजी असतानांच वाडा शहरानाजीक पेठरंजणी पाड्यातील मुलीचा कुपोषणाने अंत झाला. विशेष म्हणजे याच वाडा शहरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे निवासस्थान आहे. या वर्षभरात पालघर जिल्ह्यात ६०० बालमृत्यू झाले आहेत त्यातील अर्ध्याहून अधिक बालमृत्यू हे त्यांच्या मतदारसंघातील आहेत. याबाबत वारंवार आंदोलन आणि मागण्या होऊनही त्यांनी कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या कोणत्याही अपेक्षा उरल्या नसल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.

Web Title: Reliance Jiao, die this policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.