शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

खाजगी मालकीत खितपत पडलेल्या गोपाळगडाची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:49 IST

पुरातत्त्वाचा लागला फलक; आठ वर्षांच्या लढ्याला आले यश; महसूल खात्याच्या चुकीमुळे ऐतिहासिक ठेवा झाला होता खाजगी मालमत्ता

कल्याण : शिवाजी महाराजांच्या आरमाराचा साक्षीदार असलेला गुहागर येथील गोपाळगडाची अखेर सरकारदरबारी नोंद झाली आहे. पुरातत्त्व खात्याने २३ जानेवारीला या गडावर फलक झळकवला आहे. महसूल खात्याच्या चुकीमुळे हा ऐतिहासिक ठेवा खाजगी मालमत्ता झाला होता. कल्याणच्या अक्षय पवार या तरुणाच्या आठ वर्षांच्या पाठपुराव्याला यश येऊ न खाजगी मालकीत खितपत पडलेल्या या गडाची अखेर मुक्तता झाली आहे. गडप्रेमींना या गडावर फिरून त्याचा इतिहास अभ्यासण्याची संधी मिळणार आहे.गुहागरमधील अंजनवेल बंदराला लागून असलेला गोपाळगड हा विजापूरच्या निजामांनी बांधला होता. आरमार उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये हा गड जिंकला. महाराजांच्या मृत्यूनंतर सिद्धी खैरत खान याने हा गड ताब्यात घेतला. त्यानंतर तुळोजी आंग्रे यांनी पुन्हा या गडावर भगवा फडकविला. मात्र, पुढे पेशव्यांनी आंग्रे यांच्याकडून गडाचे अधिकार काढून घेतले. पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांनी या गडाचा ताबा घेतला. स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये महसूल खात्याने या गडाचा लिलाव करून तो हुसेन मणियार नावाच्या व्यक्तीला विकला. मणियार यांनी ३०० रुपयांत हा गड विकत घेतला होता. मूळचा अंजनवेलचा असलेला पवार हा गावी गेला होता. पवार हा एका खाजगी एजन्सीत काम करतो. त्याच्या नजरेत हा गड आल्याने त्याने उत्सुकता म्हणून तेथे असलेल्या व्यक्तीकडे विचारपूस केली. तेव्हा त्याने आम्हाला नको, तर सरकारला जाऊन विचारा असे सांगितले. हा ऐतिहासिक ठेवा खाजगी मालकीचा कसा होऊ शकतो, या प्रश्नाने पवार याला शांत बसू दिले नाही. विशेष म्हणजे, या गडावरील रचनेत अनेक बदल करून नवीन बांधकाम करण्यात आले आहे. त्यासाठी खंदक बुजवून या ऐतिहासिक खुणा बुजवल्या आहेत. पुरातत्त्व विभागाची परवानगी न घेताच हे फेरबदल केल्याचे लक्षात आल्याने पवार यांनी माहिती अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालय व केंद्र व राज्य सरकारकडे माहिती मागितली. तसेच या गडाच्या नोंदीसाठी २०१० पासून पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा सुरू केला.सरकारने त्याच्या पाठपुराव्याची दखल घेत गोपाळगड सरकार व पुरातत्त्व मालकीचा असल्याची अधिसूचना २०१६ मध्ये काढली. सरकारने अधिसूचना काढून दोन वर्षे उलटूनही त्याठिकाणी खाजगी मालकाचा फलक होता. ही बाबही पवार यांनी पुरातत्त्व विभागाच्या निदर्शनास आणून दिली. अखेरीस २३ जानेवारीला पुरातत्त्व विभागाने त्याठिकाणी फलक लावला आहे. या फलकाचे अनावरण एन्रॉन संघर्ष लढ्याचे नेतृत्व केलेल्या प्रा. सदानंद पवार यांनी केले.खाजगी मालकीत खितपत पडलेला हा गड मुक्त केल्याने गडप्रेमींना तो खुला होणार आहे. त्यांना इतिहास जवळून अनुभवता येणार आहे. पवार यांच्या लढ्यात पंकज दळवी, अनिकेत चाळके, साहिल जांभळे, संकेत चव्हाण, सिद्धेश जालगावकर यांचाही सहभाग होता. कल्याण पूर्वेत झालेल्या कोकण महोत्सवात पवार याचा विशेष सत्कार करण्यात आला.सातबारावरील नोंदीमुळे झाला होता घोळ!महसूल खात्याच्या चुकीमुळे हा गड खाजगी मालकीत अडकून पडला होता. या विभागाने या जागेच्या सातबारा उताऱ्यावर कातळवन जमीन अशी नोंद केल्याने त्यांचा लिलाव झाला होता. महसूल खात्याच्या या अजब कारभारामुळे अनेक वर्षे हा ऐतिहासिक ठेवा गडप्रेमींपासून दूर होता. खाजगी मालकीतून त्याची मुक्तता झाल्याने आता गडप्रेमींना हा इतिहास जवळून अनुभवता येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Fortगडkalyanकल्याण