शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

खाजगी मालकीत खितपत पडलेल्या गोपाळगडाची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:49 IST

पुरातत्त्वाचा लागला फलक; आठ वर्षांच्या लढ्याला आले यश; महसूल खात्याच्या चुकीमुळे ऐतिहासिक ठेवा झाला होता खाजगी मालमत्ता

कल्याण : शिवाजी महाराजांच्या आरमाराचा साक्षीदार असलेला गुहागर येथील गोपाळगडाची अखेर सरकारदरबारी नोंद झाली आहे. पुरातत्त्व खात्याने २३ जानेवारीला या गडावर फलक झळकवला आहे. महसूल खात्याच्या चुकीमुळे हा ऐतिहासिक ठेवा खाजगी मालमत्ता झाला होता. कल्याणच्या अक्षय पवार या तरुणाच्या आठ वर्षांच्या पाठपुराव्याला यश येऊ न खाजगी मालकीत खितपत पडलेल्या या गडाची अखेर मुक्तता झाली आहे. गडप्रेमींना या गडावर फिरून त्याचा इतिहास अभ्यासण्याची संधी मिळणार आहे.गुहागरमधील अंजनवेल बंदराला लागून असलेला गोपाळगड हा विजापूरच्या निजामांनी बांधला होता. आरमार उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये हा गड जिंकला. महाराजांच्या मृत्यूनंतर सिद्धी खैरत खान याने हा गड ताब्यात घेतला. त्यानंतर तुळोजी आंग्रे यांनी पुन्हा या गडावर भगवा फडकविला. मात्र, पुढे पेशव्यांनी आंग्रे यांच्याकडून गडाचे अधिकार काढून घेतले. पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांनी या गडाचा ताबा घेतला. स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये महसूल खात्याने या गडाचा लिलाव करून तो हुसेन मणियार नावाच्या व्यक्तीला विकला. मणियार यांनी ३०० रुपयांत हा गड विकत घेतला होता. मूळचा अंजनवेलचा असलेला पवार हा गावी गेला होता. पवार हा एका खाजगी एजन्सीत काम करतो. त्याच्या नजरेत हा गड आल्याने त्याने उत्सुकता म्हणून तेथे असलेल्या व्यक्तीकडे विचारपूस केली. तेव्हा त्याने आम्हाला नको, तर सरकारला जाऊन विचारा असे सांगितले. हा ऐतिहासिक ठेवा खाजगी मालकीचा कसा होऊ शकतो, या प्रश्नाने पवार याला शांत बसू दिले नाही. विशेष म्हणजे, या गडावरील रचनेत अनेक बदल करून नवीन बांधकाम करण्यात आले आहे. त्यासाठी खंदक बुजवून या ऐतिहासिक खुणा बुजवल्या आहेत. पुरातत्त्व विभागाची परवानगी न घेताच हे फेरबदल केल्याचे लक्षात आल्याने पवार यांनी माहिती अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालय व केंद्र व राज्य सरकारकडे माहिती मागितली. तसेच या गडाच्या नोंदीसाठी २०१० पासून पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा सुरू केला.सरकारने त्याच्या पाठपुराव्याची दखल घेत गोपाळगड सरकार व पुरातत्त्व मालकीचा असल्याची अधिसूचना २०१६ मध्ये काढली. सरकारने अधिसूचना काढून दोन वर्षे उलटूनही त्याठिकाणी खाजगी मालकाचा फलक होता. ही बाबही पवार यांनी पुरातत्त्व विभागाच्या निदर्शनास आणून दिली. अखेरीस २३ जानेवारीला पुरातत्त्व विभागाने त्याठिकाणी फलक लावला आहे. या फलकाचे अनावरण एन्रॉन संघर्ष लढ्याचे नेतृत्व केलेल्या प्रा. सदानंद पवार यांनी केले.खाजगी मालकीत खितपत पडलेला हा गड मुक्त केल्याने गडप्रेमींना तो खुला होणार आहे. त्यांना इतिहास जवळून अनुभवता येणार आहे. पवार यांच्या लढ्यात पंकज दळवी, अनिकेत चाळके, साहिल जांभळे, संकेत चव्हाण, सिद्धेश जालगावकर यांचाही सहभाग होता. कल्याण पूर्वेत झालेल्या कोकण महोत्सवात पवार याचा विशेष सत्कार करण्यात आला.सातबारावरील नोंदीमुळे झाला होता घोळ!महसूल खात्याच्या चुकीमुळे हा गड खाजगी मालकीत अडकून पडला होता. या विभागाने या जागेच्या सातबारा उताऱ्यावर कातळवन जमीन अशी नोंद केल्याने त्यांचा लिलाव झाला होता. महसूल खात्याच्या या अजब कारभारामुळे अनेक वर्षे हा ऐतिहासिक ठेवा गडप्रेमींपासून दूर होता. खाजगी मालकीतून त्याची मुक्तता झाल्याने आता गडप्रेमींना हा इतिहास जवळून अनुभवता येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Fortगडkalyanकल्याण