शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कमी काळात गुन्ह्यांचा आलेख घटवल्याचे समाधान!

By admin | Updated: April 29, 2017 01:40 IST

ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून काम करताना वेगवेगळ्या आघाड्यांवर परिश्रम घेतले. वेळ फार कमी मिळाला; पण मागे वळून बघितले

ठाणे : ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून काम करताना वेगवेगळ्या आघाड्यांवर परिश्रम घेतले. वेळ फार कमी मिळाला; पण मागे वळून बघितले, तर समाधानाची भावना निर्माण होते. अतिशय कमी वेळेत ठाण्यातील गुन्ह्यांचा आलेख कमी करता आला. दीड वर्षाच्या परिश्रमाचे हेच फलित असल्याची भावना ठाण्याचे मावळते सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शासनाने गुरुवारी जारी केले. डुंबरे यांची बदली मुंबई शहरात आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. राज्याच्या राजधानीत काम करण्याचा अनुभव आयुष्यात एकदा तरी मिळावा, असे सर्वच अधिकाऱ्यांना वाटते. या बदलीमुळे डुंबरे यांची ती इच्छा पूर्ण होणार असली, तरी ठाणेकर एका मनमिळाऊ, परिश्रमी आणि तेवढ्याच कुशल अधिकाऱ्याला मुकणार आहेत. पोलीस आयुक्तालयात कधीही हमखास भेटणाऱ्या आणि तक्रारदारांचे पूर्ण समाधान करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या डुंबरे यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात विविध आघाड्या उत्तम हाताळल्या. नोकरी सेंटरच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणारे डुंबरे कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी तेवढेच कठोर दिसून आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली ठाणे पोलिसांनी बोगस कॉल सेंटरपासून सैन्य भरती, पेपरफुटीसारखे मोठमोठे घोटाळे कुशलपणे उघडकीस आणले. ठाण्यातील गुन्ह्यांचा आलेख झपाट्याने वाढत असताना तो तब्बल २0 टक्क्यांनी कमी करण्यात त्यांना यश आले. अल्पावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे कमी करणारे ठाणे एकमेव शहर ठरले. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना, कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास आणि महत्त्वाचे म्हणजे पोलिसांचे अस्तित्व ठाणेकरांना दाखवून देण्याचे काम केले, याबाबत डुंबरे यांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)ठाणेकरांच्या अपेक्षापूर्तीचे समाधान -ठाणे : ठाण्यातील अडीच वर्षांच्या कार्यकाळात सर्वच आघाड्यांवर काम करण्याची संधी मिळाली. उपायुक्त म्हणून काम करताना ठाणेकरांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याचे समाधान शब्दांत सांगण्यापलीकडे असल्याचे ठाण्याच्या मावळत्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर म्हणाल्या.डॉ. करंदीकर यांची मुंबई शहरात पोलीस उपायुक्त म्हणून गुरुवारी बदली झाली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या नवीन ठिकाणी रुजू होणार आहेत. डॉ. करंदीकर यांनी त्यांच्या कार्यकाळातील विविध योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ठाण्याच्या वाहतूक शाखेची धुरा सांभाळणे कठीण काम होते. पण, ती यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्याच कार्यकाळात ठाण्याच्या वाहतूक शाखेला आयएसओ मानांकन मिळाले. हे मानांकन मिळवणारी ठाण्याची वाहतूक शाखा देशातील पहिली ठरली. २०१४ मध्ये साकेत पुलाचे काम महापालिकेने हाती घेतले होते. या पुलावरून दररोज जवळपास दीड लाख वाहनांची वाहतूक होत असते. जवळपास २ वर्षे या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य डॉ. करंदीकर यांनी दाखवले. प्रवाशांच्या, विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील ३४ हजार रिक्षांना स्मार्ट ओळखपत्रे देण्यात आली. त्यातून या रिक्षांची माहिती पोलीसदफ्तरी संकलित झाली. याचे बरेच फायदे झाले. प्रवासी रिक्षेत पैसे अथवा सामान विसरले, तर रिक्षाचालक परत देऊ लागले. या उपक्रमाचे ठाणेकरांनी मनस्वी कौतुक केले. मुख्यालयाची जबाबदारी सांभाळताना पोलीस आयुक्त, सहआयुक्तांच्या मार्गदर्शनात अनेक अभिनव योजना राबवता आल्या.