शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

ठाणे जिल्हा रुग्णालयात अग्निरोधक यंत्रे कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:14 IST

अंधेरीतील दुर्घटना : कळव्याच्या महापालिका रुग्णालयात पुरेशी काळजी

ठाणे : मुंबईतील अंधेरी येथील कामगार रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर ठाण्यातील महत्त्वाच्या आणि नेहमीच गजबजलेल्या ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राज्य शासनाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा (सामान्य) रुग्णालय येथे प्रस्तुत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत कळव्याच्या रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा पुरेशी आहे. तर, जिल्हा रुग्णालयात त्याची कमतरता दिसून आली. मात्र, अंधेरीतील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही रुग्णालयांतील प्रशासनाकडून काळजी घेण्यात येणार असल्याचा दावा ‘लोकमत’कडे करण्यात आला.

जिल्हा रुग्णालयात कमतरताब्रिटिशकालीन जिल्ह्याच्या विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य (शासकीय) रुग्णालयात ठाणे व पालघर या जिल्ह्यांतून वाडा, मोखाडा, जव्हार, पालघर, कर्जत, कसारा आदी या ग्रामीण आणि आजूबाजूच्या परिसरांतून दिवसाला सुमारे १२०० ते १५०० रुग्ण येतात. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात एकूण १९ वॉर्ड आहेत. पाच जुन्या इमारतींसह अपघात विभागाचा तसेच इतर दोन ते तीन इमारतींत रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. येथील काही इमारती दोन आणि तीन मजली आहेत. तसेच हे रुग्णालय स्थलांतराच्या वाटेवर आहे. या रुग्णालयात काहीच ठिकाणी अग्निरोधक यंत्र असल्याचे पाहण्यास मिळाले. रुग्णालयाच्या तुलनेत अग्निरोधक यंत्रांची कमतरता असल्याचे दिसून आले.यंदा जानेवारीत, रुग्णालयाच्या आवारातील भंगारात काढलेल्या गाड्यांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यावेळी चार गाड्या जळून खाक झाल्या. त्यानंतर, रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेचे फायर आॅडिट केल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.कळवा रुग्णालयात पुरेशी यंत्रे, दररोज सुमारे १६०० ते १७०० रुग्णकळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही ठाणे ग्रामीण भागांमधील शहापूर, मुरबाड आणि पालघर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. दररोज सुमारे १६०० ते १७०० रुग्ण येतात. ही संख्या ग्रामीण रुग्णालयापेक्षा जास्त आहे. हे रुग्णालय तीन मजली असून त्याची क्षमता ५०० बेड इतकी आहे. त्याला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय आहे. रुग्णालय आवारात फेरफटका मारला असता प्रत्येक ठिकाणी अग्निरोधक यंत्र पाहण्यास मिळत असून त्याचेही नूतनीकरण केल्याचे दिसते.रुग्णालयातील फायर सिस्टीमबाबत आॅडिट करण्यात आले. तसेच संबंधित यंत्रणेबाबत एनओसी घेतलेली आहे. तसेच अग्निरोधक यंत्रांचे नूतनीकरण केले. जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आॅडिट केले आहे की नाही, याची चाचपणी करण्यास सांगितले आहे. काही अग्निरोधक यंत्र-यंत्रणेची गरज असून त्याच्या खरेदीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणेआगीसंदर्भात रुग्णालयात अलीकडेच मॉकड्रील करून येथील यंत्रणा किती सज्ज आहे, याची चाचपणी केली होती. तसेच आग लागल्यावर काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत येथील क र्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. मुंबईतील घटनेत, रुग्ण घाबरल्याचे दिसते. अशा घटना घडल्यास रुग्णांना सुरक्षित बाहेर नेण्यासाठी रुग्णालयातील दरवाजे सुस्थितीत आहेत की नाही, याचीही चाचपणी केली जाते. येथील यंत्रणा सुसज्ज आहे.- डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, कळवा, ठामपा 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका