शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

ठाणे जिल्हा रुग्णालयात अग्निरोधक यंत्रे कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:14 IST

अंधेरीतील दुर्घटना : कळव्याच्या महापालिका रुग्णालयात पुरेशी काळजी

ठाणे : मुंबईतील अंधेरी येथील कामगार रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर ठाण्यातील महत्त्वाच्या आणि नेहमीच गजबजलेल्या ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राज्य शासनाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा (सामान्य) रुग्णालय येथे प्रस्तुत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत कळव्याच्या रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा पुरेशी आहे. तर, जिल्हा रुग्णालयात त्याची कमतरता दिसून आली. मात्र, अंधेरीतील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही रुग्णालयांतील प्रशासनाकडून काळजी घेण्यात येणार असल्याचा दावा ‘लोकमत’कडे करण्यात आला.

जिल्हा रुग्णालयात कमतरताब्रिटिशकालीन जिल्ह्याच्या विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य (शासकीय) रुग्णालयात ठाणे व पालघर या जिल्ह्यांतून वाडा, मोखाडा, जव्हार, पालघर, कर्जत, कसारा आदी या ग्रामीण आणि आजूबाजूच्या परिसरांतून दिवसाला सुमारे १२०० ते १५०० रुग्ण येतात. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात एकूण १९ वॉर्ड आहेत. पाच जुन्या इमारतींसह अपघात विभागाचा तसेच इतर दोन ते तीन इमारतींत रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. येथील काही इमारती दोन आणि तीन मजली आहेत. तसेच हे रुग्णालय स्थलांतराच्या वाटेवर आहे. या रुग्णालयात काहीच ठिकाणी अग्निरोधक यंत्र असल्याचे पाहण्यास मिळाले. रुग्णालयाच्या तुलनेत अग्निरोधक यंत्रांची कमतरता असल्याचे दिसून आले.यंदा जानेवारीत, रुग्णालयाच्या आवारातील भंगारात काढलेल्या गाड्यांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यावेळी चार गाड्या जळून खाक झाल्या. त्यानंतर, रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेचे फायर आॅडिट केल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.कळवा रुग्णालयात पुरेशी यंत्रे, दररोज सुमारे १६०० ते १७०० रुग्णकळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही ठाणे ग्रामीण भागांमधील शहापूर, मुरबाड आणि पालघर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. दररोज सुमारे १६०० ते १७०० रुग्ण येतात. ही संख्या ग्रामीण रुग्णालयापेक्षा जास्त आहे. हे रुग्णालय तीन मजली असून त्याची क्षमता ५०० बेड इतकी आहे. त्याला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय आहे. रुग्णालय आवारात फेरफटका मारला असता प्रत्येक ठिकाणी अग्निरोधक यंत्र पाहण्यास मिळत असून त्याचेही नूतनीकरण केल्याचे दिसते.रुग्णालयातील फायर सिस्टीमबाबत आॅडिट करण्यात आले. तसेच संबंधित यंत्रणेबाबत एनओसी घेतलेली आहे. तसेच अग्निरोधक यंत्रांचे नूतनीकरण केले. जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आॅडिट केले आहे की नाही, याची चाचपणी करण्यास सांगितले आहे. काही अग्निरोधक यंत्र-यंत्रणेची गरज असून त्याच्या खरेदीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणेआगीसंदर्भात रुग्णालयात अलीकडेच मॉकड्रील करून येथील यंत्रणा किती सज्ज आहे, याची चाचपणी केली होती. तसेच आग लागल्यावर काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत येथील क र्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. मुंबईतील घटनेत, रुग्ण घाबरल्याचे दिसते. अशा घटना घडल्यास रुग्णांना सुरक्षित बाहेर नेण्यासाठी रुग्णालयातील दरवाजे सुस्थितीत आहेत की नाही, याचीही चाचपणी केली जाते. येथील यंत्रणा सुसज्ज आहे.- डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, कळवा, ठामपा 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका