शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाले- वीणा गवाणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 17:26 IST

‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाल्याची कबुली ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांनी दिली.

डोंबिवली- माझ्या लहानपणी मी कधीही मैदानी खेळ खेळात रमले नाही. खेळाऐवजी पुस्तकांचे वाचन विपुल केले. वाचनांची आवड असल्याने मुलांनाही मी छोटी छोटी चरित्र विकत आणून देत असत. आत्मचरित्र आणि व्यक्ती चित्रण वाचायला मला खूप आवडत असे. कार्व्हर ही एक वृत्ती आहे. कार्व्हर वाचल्यावर तो मुलांना सांगितले पाहिजे असे वाटले. त्यातूनच ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाल्याची कबुली ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांनी दिली.

श्री गणेश मंदिर संस्थान आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्यातर्फे ‘पर्यावरण कट्टा‘ या अंतर्गत वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. श्री गणेश मंदिर संस्थान येथे हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. गवाणकर म्हणाल्या, आजपर्यंत मला अनेक पुरस्कारांने गौरविण्यात आले आहे. पण माझ्यासाठी माझे बोलणे ऐकायला येणारा प्रेक्षक मला पुरस्कारांपेक्षा मोठा वाटतो. ज्यांच्याकडे काहीच नाही त्याला शून्यातून जग निर्माण करायचे असते. ज्यांना आई-वडील नसतात त्यांना कोण सांगणार हे कर किंवा करू नको. त्यांना कोणतीही सबब सांगता येत नाही.

सध्या आईवडील सांगतात त्याप्रमाणे मुले शिक्षण घेतात त्यातही त्यांना करिअरची मोजक्याच वाटा माहित असतात. पण मुलांनी जे काही करियर निवडले आहे. त्यात चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. निर्णय घ्यायला शिका. आपण ही गोष्ट कशासाठी शिकतो हे प्रथम ठरवा. तुमच्या आजूबाजूला देखील एखादा कार्व्हर असू शकतो. त्यामुळे कोणाची ही टिंगल उडवू नका. कोणाला मदतीच्या गरज असेल तर त्याला मदतीचा हात दया, असा सल्ला ही त्यांनी दिला.

शेतक-याविषयी बोलताना गवाणकर म्हणाल्या , आपण डबल स्टॅर्ण्ड जगणारे लोक आहोत. भाजीची जुडी ४० रूपयांवरून १० रूपयांवर आली की आपलेल्या बरे वाटते. पण ती त्या शेतक-याला परवडते का यांचा आपण विचार करीत नाही. शेतीला जोड व्यवसाय नाही. प्रक्रिया उदयोग ही आपल्याकडे कमी आहेत. शेतक-यांच्या श्रमाचे मोल आपण लावत नाही. फुकट सेवा आपल्याला सोपी वाटते.