शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

प्रकल्पांच्या शिळ्या कढीला पुन्हा ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:34 IST

महानगरपालिका निवडणुकांसाठी सरकारचे गाजर : जुन्या व सुरू असलेल्या प्रकल्पांचीच केली घोषणा

ठळक मुद्देठाणे शहरांतर्गत मेट्रोलाईट प्रणालीवर आधारित सात हजार १६५ कोटी खर्चाच्या  वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची पवार यांनी घोषणा केली आहे.

नारायण जाधव

ठाणे : राज्य कोरोनाशी जीवघेणा संघर्ष करीत असताना आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचे सुमारे ९७ हजार कोटी रुपये थकविलेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यातील महापालिकांच्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. परंतु, हे सर्वच प्रकल्प जुनेच असून दादांनी पुन्हा त्यांची घोषणा केल्याने ती शिळ्या कढीला ऊत मानली आहे. कारण येत्या काळात नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारसह पुढच्या वर्षी ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक असून त्यासाठी पवार यांच्या या घोषणांकडे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दाखविलेले गाजर म्हणून पाहिले जात आहे.

ठाणे शहरांतर्गत मेट्रोलाईट प्रणालीवर आधारित सात हजार १६५ कोटी खर्चाच्या  वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची पवार यांनी घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या मूळ प्रस्तावात ठाणे महापालिकेने २९ किमीचे मार्ग आणि २२ स्थानके प्रस्तावित केली असून त्याचा अर्धा खर्च केंद्र सरकार करणार आहे. राज्य सरकार आणि ठाणे महापालिका प्रत्येकी ८४२ कोटींचा खर्च उचलणार असून, उर्वरित निधी कर्जरूपाने उभारण्यात येणार आहे. यामुळे ठाणे शहरासह कळवा-मुंब्रातील वाहतूक गतिमान होऊन रस्त्यांवरील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या शिवाय मूळच्या एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या आणि नुकत्याच रस्ते विकास महामंडळाने हस्तांतरित केलेल्या १२६ किमीच्या बहुचर्चित विरार-अलिबाग कॉरिडोरची पुन्हा एकदा पवार यांनी घोषणा केली असली त्यासाठी किती निधी देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गेली कित्येक वर्षे या मार्गाच्या भूसंपादनास शेतकऱ्याकडून होणाऱ्या विरोधामुळे ते कागदावरच आहे. याशिवाय ठाणे खाडीला समांतर सुमारे १५ किलोमीटर लांबीचा व ४० मीटर रुंदीचा “ठाणे कोस्टल रोड” उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे एक हजार २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

केंद्राच्या प्रकल्पातही सारखेच जलमार्गपर्यावरण खात्याच्या मंजुरीअभावी गंटागळ्या खाणाऱ्या एमएमआर क्षेत्रातील सर्वच शहरांना जोडणाऱ्या जलवाहतूक मार्गांची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्याचे सूतोवाच करून त्यांनी कोलशेत, काल्हेर, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर येथे जेट्टी उभारण्याचे सांगितले आहे. 

केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत हेच जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून, ठाणे महापालिकाच त्यांचे नियोजन करीत आहे. नेरूळ येथील जेट्टीचे कामही जोमाने सुरू आहे. परंतु, वसई-ठाणे-कल्याण-डोंबिवलीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या मार्गांचीही घोषणा करणाऱ्या पवार यांनी निधीविषयी आपल्या भाषणात ब्र शब्द काढलेला नाही.

ठाणे कोस्टल रोडसाठी नवी मुंबई महापालिका आणि सिडको किती वाटा उचलेल, राज्य शासन किती निधी देते, हे सरकारने सांगितले नसले तरी निवडणूक होऊ घातलेल्या नवी मुंबई शहराला महाविकास आघाडी सरकारने हा एक बुस्टर दिल्याचे मानले जात आहे. 

मुंब्रा बायपास जंक्शन, शीळ-कल्याणफाटा येथे दोन उड्डाणपुलांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असून एमएमआरडीएने निविदांना मान्यताही दिली आहे. तरीही कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पवार यांनी घोषणा केली असून, किती निधी देणार हे मात्र सांगितलेले नाही. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका