शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंधकारमय जीवनात आशेचा किरण

By admin | Updated: October 30, 2016 02:35 IST

दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण. अंधाराला मागे टाकून आशेचा किरण पुढे घेऊन जाणारा उत्सव. पण, घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या मुलांना दिवाळी

- प्रज्ञा म्हात्रेदिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण. अंधाराला मागे टाकून आशेचा किरण पुढे घेऊन जाणारा उत्सव. पण, घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या मुलांना दिवाळी म्हणजे काय, हे माहीत नव्हते. अशा मुलांच्या जीवनात बिलिंडा परेरा आशेचा किरण घेऊन आल्या आणि त्यांचे जीवन उजळून गेले... घरी अठरा विश्वे दारिद्रय असल्यामुळे दुसऱ्यांना दिवाळी साजरी करताना ही मुले पाहायची. कोण पैसे देते का, कोण खायला देते का, या आशेने ही मुले रस्त्यांवर भटकत असत. पोटाची खळगी भरण्यासाठी ही मुले घराबाहेर पडत. रस्त्यावर कुणी फटाके फोडले की, ते गोळा करत. आपल्याला इतरांप्रमाणे दिवाळी साजरी करता येत नाही, हे पाहून ढसढसा रडत. अंधकारमय जीवन जगणाऱ्या या मुलांच्या आयुष्यात २००७ मध्ये आशेचा किरण आला. प्रकाशवाट दाखवणारी होती बिलिंडा परेरा. त्यांनी या मुलांची जबाबदारी घेतली. शिक्षणाबरोबर त्यांच्या आयुष्यात प्रत्येक सण, उत्सव आणला. यापूर्वी दुसऱ्यांची दिवाळी पाहणारी ही मुले बिलिंडा यांच्यासमवेत १० वर्षे दिवाळी आनंद, उत्साहाने साजरी करत आहेत. या आनंदापासून आम्ही कोसो दूर होतो. आता मात्र इतरांप्रमाणे आम्हीही दिवाळी साजरी करतो, अशी भावना या मुलांनी व्यक्त केली. ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बिलिंडा या एकदा चहा पित असताना दोन मुले त्यांच्याकडे पैसे मागायला आली. त्या वेळी त्यांनी मी तुम्हाला पैसे नाही तर चहा-बिस्कीट देईन, असे सांगितल्यावर, चालेल आम्हाला असे ती आनंदाने म्हणाली आणि रोज ही मुले त्यांच्याकडे येऊ लागली. तुम्ही माझ्याकडे शिकणार का, असे विचारल्यावर या मुलांनी होकार दिला. २००७ मध्ये उपवन येथील स्वच्छतागृहाच्या जागेवर त्यांनी आपली ‘करुणाघर’ या नावाने शाळा सुरू केली. सुरुवातीच्या काळात बिलिंडा यांनी त्यांना गणित शिकवण्यास सुरुवात केली. स्वत:कडेच वही, पुस्तक नसल्याने माचीसच्या काड्यांच्या मदतीने ते हा विषय शिकवत. बिलिंडा या खाऊ देत असल्याने या दोन मुलांच्या ओळखीने हळूहळू त्यांच्या ओळखीची मुलेही शाळेत येऊ लागली आणि दोन मुलांपासून सुरू झालेली ही शाळा २२ मुलांची झाली. या मुलांना साक्षर करून बिलिंडा यांनी त्यांना शाळेत दाखल केले. सुरुवातीला बिलिंडा यांना या मुलांच्या पालकांनी तीव्र विरोध केला. परंतु, त्यांचीही समजूत काढत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. २०१५ पर्यंत त्यांची शाळा उपवन येथील स्वच्छतागृहाच्या जागेत सुरू होती. परंतु, आता तिथे काम सुरू झाल्याने या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, म्हणून त्यांनी भाडेतत्त्वावर जागा घेतली. बिलिंडा आणि त्यांची ही मुले एका स्पर्धेत जिंकली होती. त्यातून त्यांना जे पैसे पारितोषिकाच्या स्वरूपात मिळाले, त्यातून ही जागा घेतली. नववी, दहावी इयत्तांत शिकणाऱ्या या मुलांना त्यांनी शिकवणीही लावली. लक्ष्मी मोर्या या चिमुकलीला त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. ‘करुणाघर’मध्ये येण्याआधी मी इकडेतिकडे भटकत असे. दिवाळीला कधी वडिलांकडे पैसे मागितले तर ते द्यायचे नाही. उलट, ओरडायचे. मग, मी हताश होऊन दुसऱ्यांना दिवाळी साजरी करताना पाहत बसायचो. आता मात्र दिवाळीत आम्हाला सर्वच मिळते. आज आम्हाला काहीही कमी पडत नाही.- सोनू यादव, विद्यार्थी आता आम्ही दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो. - रोशनी भोये, विद्यार्थिनी आमचे सहा जणांचे कुटुंब. आई सतत आजारी. वडिलांवर सर्व घराची जबाबदारी. घरात पैशांची चणचण असल्याने दिवाळी सणच माहीत नव्हता. इतरांना पाहून मला पण नवीन कपडे मिळावे, असे वाटायचे. ‘करुणाघर’मध्ये आल्यावर आता भरभरून मिळते. - सुप्रिया वाळंज, विद्यार्थिनी