शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

कावळ्यांच्या जीवावर उठले आहेत उंदीर, पक्षिप्रेमी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:51 IST

वेगवेगळ्या भागांत गेल्या काही दिवसांपासून कावळे मृतावस्थेत निदर्शनास येत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागांत गेल्या काही दिवसांपासून कावळे मृतावस्थेत निदर्शनास येत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, उंदरांना मारण्यासाठी विषारी औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे मरणारे मृत उंदीर खाल्ल्याने ते कावळ्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गचक्र आवश्यक असले, तरी तेमोडण्याचा प्रयत्न माणसांकडून होत आल्याचे दिसत आहे.निसर्गाने पशुपक्ष्यांची निर्मिती करताना प्रत्येकाला वेगवेगळेपणा दिला असला, तरी भारतीय संस्कृतीत अनेक सजीवांना त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महत्त्व प्राप्त आहे. यात उंदीर (मूषक) आणि कावळा (काक) यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पितृपक्षात कावळ्यांना पंचपक्वान्ने खायला घातली जातात. कावळा हा निसर्गप्रेमी पक्षी आहे. दिसायला काळा आणि त्याचा आवाजही कर्कश आहे. उपजीविकेसाठी तो लहानलहान उंदीर, मेलेले इतर प्राणी, घरातून फेकले गेलेले पदार्थ खातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील रस्त्यांवर कावळे मृतावस्थेत पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत कोपरीतील परिसरात पाच ते सहा कावळे विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.उंदरांचा त्रास कमी व्हावा, यासाठी बहुतेक वेळा मानवी वस्त्यांमध्ये त्यांना मारण्यासाठी अनेक विषारी औषधे खाण्याच्या पदार्थांमध्ये मिसळून ते उंदरांना खायला देतात. हे पदार्थ खाऊन मेलेले उंदीर कचºयात फेकल्यावर ते कावळे खातात. त्यामुळेच त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता दाट आहे. अशा प्रकारेही यापूर्वी कावळे मृतावस्थेत आढळून आल्याचे पक्षी अभ्यासक सिद्धेश करगुंटकर यांनी सांगितले.दक्ष असलेला पक्षी-कावळ्यांचे नैसर्गिक आयुष्य १२ ते १३ वर्षांचे असते. शिवाय, त्याची नजर अत्यंत दक्ष असल्याने त्याच्यावर दगड वगैरे फेकून त्याला जखमी करणेही कठीण असते.असे असताना दक्ष समजले जाणारे हे कावळे मात्र रस्त्यांवर मृतावस्थेत दिसू लागले आहेत.