शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्यांच्या जीवावर उठले आहेत उंदीर, पक्षिप्रेमी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:51 IST

वेगवेगळ्या भागांत गेल्या काही दिवसांपासून कावळे मृतावस्थेत निदर्शनास येत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागांत गेल्या काही दिवसांपासून कावळे मृतावस्थेत निदर्शनास येत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, उंदरांना मारण्यासाठी विषारी औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे मरणारे मृत उंदीर खाल्ल्याने ते कावळ्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गचक्र आवश्यक असले, तरी तेमोडण्याचा प्रयत्न माणसांकडून होत आल्याचे दिसत आहे.निसर्गाने पशुपक्ष्यांची निर्मिती करताना प्रत्येकाला वेगवेगळेपणा दिला असला, तरी भारतीय संस्कृतीत अनेक सजीवांना त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महत्त्व प्राप्त आहे. यात उंदीर (मूषक) आणि कावळा (काक) यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पितृपक्षात कावळ्यांना पंचपक्वान्ने खायला घातली जातात. कावळा हा निसर्गप्रेमी पक्षी आहे. दिसायला काळा आणि त्याचा आवाजही कर्कश आहे. उपजीविकेसाठी तो लहानलहान उंदीर, मेलेले इतर प्राणी, घरातून फेकले गेलेले पदार्थ खातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील रस्त्यांवर कावळे मृतावस्थेत पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत कोपरीतील परिसरात पाच ते सहा कावळे विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.उंदरांचा त्रास कमी व्हावा, यासाठी बहुतेक वेळा मानवी वस्त्यांमध्ये त्यांना मारण्यासाठी अनेक विषारी औषधे खाण्याच्या पदार्थांमध्ये मिसळून ते उंदरांना खायला देतात. हे पदार्थ खाऊन मेलेले उंदीर कचºयात फेकल्यावर ते कावळे खातात. त्यामुळेच त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता दाट आहे. अशा प्रकारेही यापूर्वी कावळे मृतावस्थेत आढळून आल्याचे पक्षी अभ्यासक सिद्धेश करगुंटकर यांनी सांगितले.दक्ष असलेला पक्षी-कावळ्यांचे नैसर्गिक आयुष्य १२ ते १३ वर्षांचे असते. शिवाय, त्याची नजर अत्यंत दक्ष असल्याने त्याच्यावर दगड वगैरे फेकून त्याला जखमी करणेही कठीण असते.असे असताना दक्ष समजले जाणारे हे कावळे मात्र रस्त्यांवर मृतावस्थेत दिसू लागले आहेत.